चैतन्यपूर गावासह सरपंच बसणार बेमुदत आमरण उपोषणाला

त्या दोन आधिकाऱ्यांची भ्रष्टाचाराची चौकशी करून निलंबित करा. प्रतिनिधी सतिश फापाळे /राजसत्ता न्युज अकोले तालुक्यातील पठार भागातील चैतन्यपूर गावातील शेतकरी व गावचे सरपंच यांना चोर संबोधून गावचा व सरपंच पदाचा अपमान केला.महावितरन कंपनीचे दोन आधिकारी यांनी आधिकाराचा गैरवापर करून कारवाया केल्या आहेत. आपल्या हुकमी व मनमानी कारभारातून त्यांचे कार्यकाळात अनैतिक माया जमविली.त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांना निलंबित करा.अशा विविध मागण्यांनसाठी गुरुवार दिनांक २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता पासून चैतन्यपूर गावासह परिसरातील नागरिक ,ग्रामपंचायत सरपंच,व सरपंच नितीन डुंबरे ते दोन आधिकारी निलंबित करा, त्यांचे भ्रष्टाचाराची चौकशी करा अशा विविध मागण्यानसाठी बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून चैतन्यपूर गावातील विद्युत रोहित्र (डिपी) खराब झाले होते.त्याबाबत विद्युत रोहित्र (डीपी) साठी बिल पावती भरली होती.चार दिवसापासून विद्युत रोहित्र (डीपी) घेऊन निघालेली गाडी न पोहचल्याने शेतकरी हैराण झाले होते. शेतकऱ्यांची कांद...