विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच

गणेश सहकारी साखर कारखाना कोल्हेंचे नामोहरण करण्यासाठी आहे..? संपादकीय : सहदेव जाधव अहमदनगर जिल्ह्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याचा प्रचार शिगेला पोहचला असून अगस्ती कारखान्याच्या धरतीवर थोरातांनी व्यूहरचना आखलेली दिसत आहे. परंतु यात नुकसान कुणाचे हे जनतेला माहिती होणे देखील गरजेचे आहे. म्हणून हे स्पष्टीकरण गणेश परिवारासाठी मांडत आहोत. गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक ही आपापसातील सूड उगविण्यासाठी घेतली का..? हा प्रश्न प्रथम उभा राहतो. या निवडणुकीच्या आडून थोरातांकडुन विवेक कोल्हेंना बोटाशी धरून भाजपात फुट पाडण्याचा प्रयत्न आहे आणि हा डाव थोरातांचा यशस्वी झालेला दिसत आहे. तसेही कोल्हे राष्ट्रवादी सोडुन भाजपात गेल्या नंतर मागील विधानसभा सोडल्यास त्यांच्या पदरात हवे तसे यश पडलेले दिसत नाही. मागिल जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये पराभव, विजय वहाडणे कडुन नगरपरिषदेत पराभव व त्यानंतर विधानसभेत पराभव अशी पराभवाची मालिका कोल्हेंच्या नशिबी आली आहे. पक्षात देखील विखेंच्या पक्ष प्रवेशाने नाराज झालेले कोल्हे हे पिछाडीवर गेले ते पिछाडीवरच राहि...