Posts

Showing posts with the label सामाजिक

संगमनेर तालुक्यातील पिंपळे गावात वृक्षारोपण

Image
सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून पिंपळे येथे हजारो वृक्षांचे वृक्षारोपण संगमनेर प्रतिनिधी   संगमनेर तालुक्यातील अतिशय दुर्गम आणि दुष्काळी भागातील पिंपळे येथे सामाजिक कार्यकर्ते श्री ज्ञानेश्वर झाडगे पाटील आणि रेखा कोटकर यांच्यामार्फत सुमारे एक हजार पेक्षा जास्त रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. गावातील प्रत्येक घर, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक शेत येथे किमान एक झाड लावले जावे या संकल्पनेतून हा उपक्रम त्यांनी आपल्या माळरानावर राबवला. माळरानावर निसर्ग सौंदर्य फुलविणाऱ्या या दोन कार्यकर्त्यांची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. अजूनही गरजेनुसार ते रोपांची वाटप पंचक्रोशीत करणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रगतशील शेतकरी व भाजपा कार्यकर्ते ज्ञानेश्वर जाडगे, सामाजिक कार्यकर्त्या रेखा कोटकर, कविता पाटील घुगे, भाजपा तालुका अध्यक्ष सतीश कानवडे, संतोष गुंजाळ, पत्रकार काशिनाथ घुले आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या मुहर्तावर दत्तवाडी येथील महिलांनी सौ रेखाताई कोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाशीची राणी महिला बचत गट सुरू केला...

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर सर्व स्तरांतून टीकेचा भडिमार

Image
  संभाजी भिडे गुरुजी म्हणजे हिंदुत्वाची धगधगता ज्वालामुखी संपादकीय : सहदेव जाधव    भिडे गुरुजींना अटक करणे म्हणजे साक्षात सूर्याला गिळायला निघाल्यासारखे            शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर  सर्व स्तरांतून टीकेचा भडिमार सुरू झाला आहे.   संभाजी भिडे गुरुजीनी वक्तव्य करण्याचं आणि त्यावरून वाद होण्याची ही पहिली वेळ नाही.  त्यांनी याआधीही अशी काही वक्तव्यं केली आहेत.  मनोहर भिडे यांचा जन्म १० जून १९३३ रोजी सांगली, महाराष्ट्र येथे झाला आणि आज त्यांना संभाजी भिडे किंवा गुरुजी म्हणूनही ओळखले जाते . पुणे, सांगली,  कोल्हापूर , बेळगाव, मुंबई आणि सातारा येथे संभाजी भिडे पूजनीय आहेत. आणि त्यांचे अनुयायी मोठे आहेत.  संभाजी भिडे गुरुजी सांगलीत राहतात. त्यांचं वय 80 वर्षे आहे. त्यांचे मूळ नाव मनोहर असं आहे. भिडे यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी आहे. भिडे गुरुजी अनेक तरुणांचे हृदय सम्राट आहेत. भिडे गुरुजींना अटक सध्या तरी अश्यक्य आहे.             ‘श्र...

राहुरी तालुक्याच्या संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार धसाळ

Image
पत्रकार विनीत धसाळ यांची संजय गांधी निराधार योजना समिती च्या अध्यक्ष पदी निवड.  शेख युनूस अ. नगर/  राहूरी तालुक्यातील निर्भीड, पत्रकारितेतील धारदार लेखणीतून अन्यायला वाचा फोडणारे तांदूळवाडी येथील आणि राहूरी तालुका पत्रकार विनीत आनंदराव धसाळ यांची राहूरी तालुका येथील संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.     सविस्तर माहिती अशी की, राज्याचे महसूलमंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिफारशी नुसार व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री पै.शिवाजीराव कर्डीले आणि खासदार. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विनंती नुसार जिल्हाधिकारी  सिद्धराम सालीमठ यांनी राहूरी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची निवड केली आहे.  पत्रकार विनीत धसाळ यांची राहूरी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या (सामाजिक क्षेत्र )अध्यक्ष म्हणून तर सदस्यपदी किरण ससाणे(अनु. जाती ), वैशाली उत्तम खुळे (महिला ), अविनाश बाचकर (विमुक्त जाती /भटक्या जमाती), अजित डावखर (सर्व साधारण ), सर्जेराव घाडगे (अपंग ),...

आषाढी एकादशी निमित्त अंभोरे मुस्लीम तरुणांचा अनोखा निर्णय

Image
  संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील मुस्लिम बांधवांचा स्तुत्य उपक्रम  संगमनेर प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील अंभोरे गावातील मुस्लिम बांधवानी एकत्र येत हिंदू मुस्लिम जातीय सलोखा राखण्यासाठी बकरी ईद च्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळेस ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद असल्याने हा निर्णय अंभोरे येथील मुस्लिम बांधवानी घेतला आहे.  अंभोरे येथे मुस्लिम समाज यांनी बकरी ईद च्या दिवशी एकादशी असल्याने कुर्बानी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर गावातील चिकन मटण शॉप देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी अंभोरे गावात शांतता कमिटीची बैठक पार पडली. यावेळी काही मुस्लिम तरुणांनी हा निर्णय ग्रामस्थांना कळवला असता त्यास सर्व मुस्लिम बांधवानी त्यास उत्स्फुर्द प्रतिसाद दिला. यावेळी अंभोरे गावचे सरपंच उपसरपंच त्याचबरोबर गावातील ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा निर्णय घेण्यासाठी गावातील शोएब मणियार, आरिफ मणियार, खलील मणियार, समीर मणियार, इम्रान मणियार, मन्सूर मणियार यांनी पुढाकार घेतला आहे.  जोर्वे गावातील तरुणांना हकनाक मारहाण झाल्यान...

बेलापुर धरण भविष्यातील धोक्याची घंटा. पाटबंधारे विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

Image
बेलापूर धरणाच्या इंटेक वेलची दुरुस्तीची मागणी. प्रतिनिधि_सतीश फापाळे       (बेलापूर) अकोले तालुक्यातील पठार भागासाठी जीवनदायनी म्हणून संबोधले जाणारे बेलापुर येथील धरणाच्या मोरिवरिल इंटेक वेलची दुरवस्था झालेली आहे.येथील धरणातील पाणी सोडण्याच्या मोरीच्या इंटेक वेलची संरक्षण भिंत पडली असल्याने भविष्यात पाणी प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असून भविष्यात बेलापूर धरण धोक्याची घंटा बनले आहे.     पठार भागातील बेलापूर येथील धरण जाचकवाडी, पवारवाडी , गोपाळवाडी, बेलापुर, चैतन्यपुर, भक्ताचीवाडी, बदगी, जांभळे, ब्राम्हणवाडा,काळेवाडी अशा विविध गावांच्या शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाचे मानले जात असून हे पठार भागासाठी जीवनदायनी म्हणून संबोधले जाते आहे.पावसाळा ऋतू सुरू झाला आहे.मात्र पावसाने दडी मारली असली तरी बेलापुर धरणावरील पाणी सोडण्याच्या मोरीवरील इंटेक वेलची संरक्षक भिंत कोसळली आहे. वारंवार पाटबंधारे विभागास या बाबत माहिती ग्रामपंचायतच्या माध्यमातून देण्यात आली आहे.पत्र व्यवहार देखील करण्यात आले आहे.परंतु पाटबंधारे विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्य...

संगमनेर पठार भागाची "दशा" ओळखून "दिशा" देणारा अवलिया माणूस म्हणजे रविंद्र बिरोले

Image
पठार भागातील बेरोजगारांसाठी माळरानावर फुलविली नवी बाग रविंद्र पुरुषोत्तम बिरोले यांचा अभिष्टचिंतनानिमीत्त विशेष  संपादकीय सहदेव जाधव          कौठेमलकापुर येथील खडकाळ माळरानावर आपल्या अथक प्रयत्नातुन तसेच मानवनिर्मित संकटांना सामोरे जात उभा राहिलेला अद्वितीय असा कारखाना म्हणजे श्री गजानन महाराज शुगर लि. (पुर्वीचे नाव युटेक शुगर लि.) या साखर कारखान्याचे अपरिमीत कष्टाने व मेहनतीने नियोजनपुर्वक प्रयत्न करून सहा गाळप हंगाम यशस्वीरित्या पुर्ण केले. हे गाळप पूर्ण करताना अनेक संकटे 'आ' वासून समोर होते. अशा ही परिस्थिती मध्ये मात करत हा कारखाना उभा आहे. याचे सर्व श्रेय या कारखान्याचे सर्वे सर्वा रविंद्र बिरोले यांना जाते. रविंद्र बिरोले हे एक असाधारण नेत्रुत्व. आज त्यांचा वाढदिवस म्हणून मुद्दामून केलेला हा लेखप्रपंच...        रविंद्र बिरोले यांनी साकूर पठार भागाला ऊसाचे आगार बनविण्याचे स्वप्न पाहिले..परिसराचा भौगोलिक अभ्यास केला..पठारभागाला मुळामाईचे वरदान असल्याने त्यांच्या दुरदृष्टी या भागावर स्थिरावली. आणि त्याच वेळेस संकल्प केला. एक दिवस मी ...

महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव सेवानिवृत्त

Image
 प्रशासकीय सेवेतील 'कोहिनुर' म्हणून ओळख: सेवा हमी कायद्याच्या आयुक्तपदी नियुक्ती.    "एकमेवाद्वितीय"  'झाले बहु, होतील बहु,  परंतु यासम हा..!'       राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेचे सर्वोच्च अधिकारी असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव  नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. सुमारे सदतीस वर्षाच्या प्रदीर्घ सनदी सेवेनंतर श्रीवास्तव सेवानिवृत्त होत आहेत. प्रशासकीय सेवेतील हे असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी आपल्या कामातून उच्च प्रतीचे प्राविण्य सिद्ध केलेच, पण या परिघाबाहेर आपल्या कलासक्त, स्थितप्रज्ञता, क्षमाशीलता, सुसंस्कृतता, सहनशीलतेच्या परमोच्च गुणांचं विलोभनीय दर्शन देवून आपले वेगळेपण एकमेवाद्वितीयत्व सिद्ध केले आहे. सरांचे पिताश्री भारतीय पोलीस प्रशासन सेवेतील कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याने प्रशासनाचे बाळकडू त्यांना जन्मतःच मिळालेले होते. एक सदाबहार, चिरतरुण ,राजबिंड व्यक्तिमत्व असलेले सर प्रशासनातील एक दंतकथा बनलेले आहेत.     यावेळी अजीत देशमुख यांनी आपल्या शब्दात मनुकुमार श्रीवास्तव यांचे बद्दल काढ...

संगमनेर येथे जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा

Image
जिल्हास्तरीय जागतिक ग्राहक दिन समारंभ संगमनेर येथे साजरा संगमनेर प्रतिनिधी: आज दिनांक १५/०३/२०२३ रोजी श्रीमती जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर, किशोर कदम सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर यांचे प्रमुख उपस्थितीत व ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य संगमनेर तालुका अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर राक्षे यांचे अध्यक्षतेखाली संगमनेर तहसिल कार्यालयामध्ये जागतिक ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.        याप्रसंगी अमोल निकम, तहसीलदार संगमनेर, शीतल घावटे, परिविक्षाधीन तहसीलदार, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव सुरेश राहणे, दिनेश थोरात, संगमनेर तालुका अध्यक्ष विनायक वाडेकर, सर्जेराव वाघ, सचिन गिरी, सौरभ म्हाळस ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य संगमनेर तालुका सचिव, कारभारी देव्हारे, कायदेशीर सल्लागार गोडसे सर, तसेच वजनमापे निरीक्षक फटांगरे, व संगमनेर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार आणि मोठ्या संख्येने ग्राहक व नागरिक उपस्थित होते.       कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून व मान्यवरांचा सत्कार करून करण्...

नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी शिंदे फडणवीस सरकारची मोठी घोषणा

Image
नाभिक समाजासाठी श्री संत सेना महाराज केश शिल्पी महामंडळाची स्थापना      समनापूर प्रतिनिधी -: महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाने राज्य सरकारकडे वंचित नाभिक(न्हावी) समाजासाठी श्री संत सेना महाराज केश कला शिल्प मंडळाची तसेच विविध मागण्यांसाठी सरकारकडे वेळोवेळी निवेदन देऊन मागणी केली होती. गुरुवार दि.9 मार्च रोजी महाराष्ट्र सरकारने विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत सेना महाराज केश कला शिल्पी मंडळाची घोषणा करून 50 कोटी रु. तरतूद केली. महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष दत्ता शेठ अनारसे, नागपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व भाजपचे ज्येष्ठ नेते बंडूभाऊ उर्फ सुधीर राऊत, दिलीप अनर्थे, विकास मदने, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे, दक्षिण जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब व्यवहारे, जिल्हा उपाध्यक्ष संजय कदम, महिला जिल्हाध्यक्षा प्रियंकाताई जाधव, यांनी शासनाकडे वेळोवेळी मागणी केली होती. नाभिक समाजाच्या विविध मागण्यांची दखल घेऊन राज्य सरकारने केश कला शिल्पी मंडळाला मान्यता दिली.  ...

प्रवरामाई ला गंगेचे रुप आणण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी एकत्र या

Image
प्रवरामाई च्या यातना संगमनेरकरांना कधी कळणार..? संपादकीय: सहदेव जाधव  संगमनेर(प्रतिनिधी): सह्याद्रीच्या कुशीतुन उगम पावणारी प्रवरा नदी पुढे येऊन शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरली. दुसरे महायुद्ध सुरू असतांना इंग्रज सरकारने भंडारदरा येथे धरण बांधले. धरणाचे पाणी शेतकऱ्यांना आणि येथील उद्योगांना मिळु लागले. त्यातील डावा आणि उजव्या कालव्यामुळे हे पाणी सर्वत्र फिरले. प्रवरा नदीच्या सर्व गावांना, शेतकऱ्यांना नियमित पाणी मिळु लागले. प्रवरा नदीवर अकोले,संगमनेर,श्रीरामपूर,नेवासा असे तालुक्याची ठिकाणे असुन छोटे मोठे गावे आणि शहरं आहेत. त्यांना नियमित पाणी पुरवठा करणारी प्रवरा आता अमृतवाहिनी झाली आहे. पण याच गंगेला आता गटारीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. वाढत्या आधुनिकतेच्या जगात मानवनिर्मित सांडपाणी, घनकचरा, शहरातील गटारे, साखर कारखान्याचे दूषीत पाणी, दूध कारखान्याचे सडलेले पाणी, नदीच्या कडेला असलेले स्वच्छता गृह यामुळे मोठ्या प्रमाणात  जलप्रदूषण होत आहे.         नदी पात्रातील अमर्याद वाळु उपसामुळे पात्रातील खड्यात गटारीचे डबके निर्माण होत आहे. आणि याच डबक्यातील पाणी ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा "जिवन साधना गौरव" पुरस्कार

Image
 केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या उपसमितीचे सदस्य दादा इदाते यांचे हस्ते पुरस्कार प्रदान अकोले- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा "जिवन साधना गौरव" पुरस्कार माजी आदिवासी विकासमंञी मधुकरराव पिचड यांना प्रदान करण्यात आला.       सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या उपसमितीचे सदस्य श्री. भिकूजी (दादा) इदाते यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुलगुरू डाॅ.कारभारी काळे हे होते. प्र.कुलगुरू डाॅ.संजीव सोनवणे आणि कुसचिव डाॅ.प्रुफुल्ल पवार, सुनेत्राताई पवार, माजी आमदार नंदकुमार झावरे, सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी, नृत्य दिग्दर्शिका मनीषा साठे, माजी आमदार वैभवराव पिचड हे उपस्थित होते.   माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना दिलेल्या गौरव पत्रात म्हटले आहे कि, कळसूबाईचे  शिखरयात्री, अहमदनगर जिल्ह्यातील जलक्रांतीचे आधुनिक भगीरथ, अकोले तालुक्याचे पितामह भाग्यविधाते, माळरानावर हिरवाई फुलविणारे जलक्रांतीचे द्रष्टा नेते, तरुणांचे आधारस्तंभ, आदिवासी विकासाचे शिल्पक...

गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे अपघातात जागीच ठार

Image
 संगमनेर तालुक्यात मोठी हळहळ: अंमळनेर येथील बीडीओ जागीच ठार संगमनेर (राजसत्ता न्युज): संगमनेर तालुक्यात काही दिवसांपूर्वी कार्यरत असलेले बिडिओ एकनाथ चौधरी हे सध्या यावल तालुक्यात कार्यरत होते. अमळनेर येथे झालेल्या भीषण अपघातात यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे ठार झाले आहेत. तर चालक जखमी झाला आहेत. चौधरी हे चालकासह नाशिक येथे शासकीय कामांसाठी चालले होते. यावल येथून निघाल्यानंतर बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले आहे. एकनाथ चौधरी हे एक कार्यक्षम अधिकारी आहेत. त्यांनी याआधी संगमनेर पंचायत समितीत अतिशय समाधान कारक काम केले. लोकप्रतिनिधी व प्रशासक यांच्यातील समतोल राखण्यासाठी त्यांचा हातखंडा होता. अशी माहिती पंचायत समितीचे सदस्य किरण मिंडे यांनी दिली. यावेळी त्यांनी दु:ख व्यक्त केले. तसेच एक सुसंस्कृत व कर्तव्यनिष्ठ अधिकारी गेल्याने प्रशासनाची मोठी हानी झाली आहे. असे उद्गार मिंडे यांनी काढले आहेत.  ‌‌‌‌.               किरण मिंडे(पंचायत समिती सदस्य, संगमनेर)    सविस्तर वृत्त अ...

पंतप्रधान उज्वला गॅस मार्फत साकूर पठार भागातील महिलांची दिवाळी गोड

Image
  पंतप्रधान उज्वला गॅस मार्फत साकूर पठार भागातील महिलांची दिवाळी गोड   साकूर प्रतिनिधीः साकुर इंण्डेन्स गॅस ग्रामीण वितरक एजन्सी मार्फत पंतप्रधान उज्वला गॅस योजनेअंतर्गत गरजू व गरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन चे वाटप आज जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास सभापती मीराताई शेटे यांच्या हस्ते देण्यात आले.      सविस्तर वृत्त असे की साकुर ग्रामीण इंडियन्स गॅस वितरण यांच्यामार्फत पंतप्रधान उज्वला गॅस योजना योजने अंतर्गत गरीब कुटुंबांना आज गॅसचे वाटप करण्यात आले. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती सौ.मीराताई शेटे यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी इंडियन गॅस चे संचालक उत्तम पाटील खेमनर मांडवे गावचे माजी सरपंच जगदीश पाटील गागरे, सुधीर जाधव, पारनेर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष पांडुरंग गागरे, तसेच जांबुत गावचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश भागवत, किसन शेटे, पोपट गाढवे, सामाजिक कार्यकर्ते व प्रगतीशील शेतकरी रवी अण्णा वाडेकर, रावसाहेब गागरे, दत्तात्रय खामकर, बाजीराव गागरे आदी मान्यवर उपस्थित होते....