संगमनेर पठार भागाची "दशा" ओळखून "दिशा" देणारा अवलिया माणूस म्हणजे रविंद्र बिरोले
पठार भागातील बेरोजगारांसाठी माळरानावर फुलविली नवी बाग
संपादकीय सहदेव जाधव
कौठेमलकापुर येथील खडकाळ माळरानावर आपल्या अथक प्रयत्नातुन तसेच मानवनिर्मित संकटांना सामोरे जात उभा राहिलेला अद्वितीय असा कारखाना म्हणजे श्री गजानन महाराज शुगर लि. (पुर्वीचे नाव युटेक शुगर लि.) या साखर कारखान्याचे अपरिमीत कष्टाने व मेहनतीने नियोजनपुर्वक प्रयत्न करून सहा गाळप हंगाम यशस्वीरित्या पुर्ण केले. हे गाळप पूर्ण करताना अनेक संकटे 'आ' वासून समोर होते. अशा ही परिस्थिती मध्ये मात करत हा कारखाना उभा आहे. याचे सर्व श्रेय या कारखान्याचे सर्वे सर्वा रविंद्र बिरोले यांना जाते. रविंद्र बिरोले हे एक असाधारण नेत्रुत्व. आज त्यांचा वाढदिवस म्हणून मुद्दामून केलेला हा लेखप्रपंच...
रविंद्र बिरोले यांनी साकूर पठार भागाला ऊसाचे आगार बनविण्याचे स्वप्न पाहिले..परिसराचा भौगोलिक अभ्यास केला..पठारभागाला मुळामाईचे वरदान असल्याने त्यांच्या दुरदृष्टी या भागावर स्थिरावली. आणि त्याच वेळेस संकल्प केला. एक दिवस मी या पठार भागाला "शुगर केन हब" बनवेल. पठार भागावर अनेक पांढरपेशींनी स्वप्ने दाखवली, परंतु नाही येथे शेती फुलली, ना येथे रोजगार निर्मीती झाली. एकीकडे तरुण शिकलेला परंतु नोकरी नाही, म्हणून हतबल झाला होता. खाजगी सावकारांचा बळी बनला होता, व्यसनाधीन बनला होता अशातच या देवमाणसाने येथील तरुणांसाठी एक आशेचा किरण जागवला.
त्याचप्रमाणे संगमनेर तालुक्यास कृषी, औद्योगिक, सामाजिक, अध्यात्मिक व सांस्कृतीक विकासाच्या वाटचालीवर नेण्यास मोलाचा हातभार लावला. असे असामान्य कर्तुत्व लाभलेले, रविंद्र पुरुषोत्तम बिरोले साहेब यांचे बुधवार, दि. ०३.०५.२०२३ रोजी ५६ व्या वर्षात पर्दापन होत आहे. अशा या उत्तुंग कर्तुत्व लाभलेल्या व्यक्तीस परमपुज्य श्री गजानन महाराज यांचे फार मोठे आर्शिवाद लाभलेला आहे. सन २०१२-१३ मध्ये कौठेमलकापुर च्या उजाड माळरानावर कारखान्याची उभारणी करण्याचे ध्येय घेवुन संगमनेर तालुक्यात पर्दापन केले. असंख्य मानवनिर्मीत व नैसर्गिक अडचणीचा सामना करत सन २०१७-१८ मध्ये कारखान्याचा पहिला ट्रायल हंगाम तत्कालीन केंद्रीय मंत्री, नामदार नितीनजी गडकरी साहेब, भुपृष्ट वाहतुक, जहाज बांधणी, जलसंधारण, नदी सुधार, गंगा स्वच्छता, भारत सरकार. तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, श्री. श्यामजी जाजु, मा.ना.पंकजाताई मुंडे, मा. ना. राम शिंदे, मा.ना.सुभाषजी देशमुख इ. मान्यवराचे शुभहस्ते संपन्न केला. व संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागातील कौठेमलकापुरच्या उजाड माळरानावर सोनेरी पहाट उजाडली.
ही पण लिंक ओपन करा: https://youtu.be/Ce8BhaVt1zA
अशक्यप्राय वाटणारी गोष्ट श्री गजानन महाराजाच्या कृपाआर्शिवादाने शक्य झाली. ध्येय, चिकाटी, जिद्द व अथक परीश्रमानंतर अखेर कृषीपुरक व्यवसाय सुरु होण्याचे स्वप्न पुर्ण झाले. तद्नंतर पुढील प्रत्येक हंगामामध्ये येणाऱ्या अडअडचणीचा सामना करत तेही हंगाम यशस्वी पार पाडले. आजकाल कारखानदारी ज्या पद्धतीने चालविली जाते त्या पद्धतीने श्री गजानन महाराज साखर कारखाना चालवायाचा नसून तो सर्वसामन्य शेतकरी, ऊस उत्पादक, शेतमजुर, ऊस तोडणी मजुर व साखर कामगार यांच्यासाठी चालवायाचा आहे, असे व्रत उरी घेवून वाटचाल सुरु असताना संघर्षाच्या काळात व कठीण समयी अनेक घडामोडी घडत असताना काही गोष्टी चांगल्या घडल्यात. पहिल्याच ट्रायल हंगामात साखर कारखाना व सहविज निर्मिती प्रकल्प एकाच वेळी सुरु करुन महाराष्ट्राच्या साखर कारखानादारीच्या इतिहासात त्याची नोंद झाली.
प्रत्येक साखर कारखाना चांगल्या गळीत हंगामासाठी प्रयत्न करीत असतो. त्याचप्रमाणे श्री गजानन महाराज साखर कारखाना हा ही नियोजनात्मक वाटचालीत सुरु आहे. सर्व साखर कारखाना हे चालले पाहिजे व त्यातील स्पर्धा निकोप आणि सक्षम व्हायला हवी अशी सातत्याने मनोभावना ही रविंद्रजी बिरोले यांची राहिली आहे. साकूर पठार भागाला ऊसाचे कोकण बनविण्याचा मनोदय व्यक्त करुन त्या भागात पाणी आणणे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने ऊस शेतीस चालना देणे, परिसरातील ऊस उत्पादक व शेतकरी यांचा विश्वास संपादन करुन सर्वांना समवेत घेवुन हा प्रकल्प पूर्ण करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. सामुहीक विकासातुन गावचा व परिसराच्या ग्रामीण विकासाला जोड देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. आज मितीस श्री गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या., डिस्टलरी व इथेनॉल प्रकल्पाची उभारणी करुन साखर कारखानदारीतील पुढचा टप्पा सुरु केला आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक वाटचालीमध्ये परिसरात पोषक व पुरक वातावरण निर्मीती करण्याचे प्रयत्न सुरु आहे. लोकसहभागातुन विविध सामाजिक, अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देवुन त्यांना उत्तेजन व प्रेरणा दिली जाते.
अशा असामन्य कर्तुत्ववान व्यक्तीस उदंड आयुष्य व निरोगी जीवन लाभो अशी समस्त पठार भागातील ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी, तसेच श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड या उद्योगसमुहातील सर्व संचालक, आधकारी, कर्मचारी, कामगार यांची मनोमन सद्भावना आहे. आई तुळजाभवानी साहेब आपणास उदंड आयुष्य देवो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना....वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com..
संपादक : सहदेव भिकाजी जाधव (B.A.D.L.L & L.W) संपर्क: rajyogmanas770@gmail.com/ 9545529052
Comments
Post a Comment