Posts

Showing posts with the label गुन्हेगारी

मुंबई ते गोवा प्रवास करताना उर्फी जावेदला एक वाईट अनुभव

Image
पब्लिक फिगर आहे, पब्लिक प्रॉपर्टी नाही... विमान प्रवासात उर्फी जावेदशी तरुणांनी केले गैरवर्तन   उर्फी जावेद अभिनेत्री, इन्फ्लुएन्सर आणि सोशल मीडिया स्टार आहे. नुकताच उर्फीने मुंबई - गोवा विमान प्रवासातीतील वाईट अनुभव शेअर केला आहे. उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत काही पुरुषांनी तिला त्रास दिल्याचे सांगितले आहे. उर्फीने विमानातील व्हिडिओ शेअर करत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या पुरुषांचा चेहरा उघड केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने न देखील शेअर केली आहे. उर्फीने या नोटमध्ये लिहिले आहे की, 'काल एका फ्लाईटमध्ये मुंबई ते गोवा प्रवास करताना मला एक वाईट अनुभव आला. मला खूप त्रास सहन करावा लागला. या व्हिडिओतील पुरुष अश्लील भाषेत काही बोलत आहेत. छेडत होते. वेगवेगळ्या नावांनी हाक देत होते. जेव्हा मी त्यांना टोकले, तेव्हा त्यांच्यापैकी एकाने सांगितले की, त्यांचा मित्र नशेत आहे. 

नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने या त्रासाला वैतागून या महिलेने राहत्या घरात गळफास

Image
एकल महिला सावधान : दोन प्रियेशी असलेल्या मजनूने घेतला एका महिलेचा जीव  शेवगाव प्रतिनिधी: अश्लील व्हिडीओ रेकोर्डिंग प्रसारित करण्याची धमकी प्रियकराने दिल्याने शहरातील एका महिलेने रविवारी (दि. १६ रोजी) सायंकाळी सहा वाजण्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.           हा प्रकार समजल्याने सदर महिलेच्या मुलीने अगोदरच्या दिवशी फिनेल नावाचे विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्रेम संबधातून एका महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटस्फोट झालेल्या एका महिलेचे शहरातील एका व्यक्तीशी प्रेम संबंध जुळल्याने तो तिच्या घरी येत जात होता. मात्र, त्या व्यक्तीचे आणखी एका महिलेशी प्रेमसंबंध होते. आत्महत्या केलेल्या महिलेच्या घरी येता जाताना त्याने तिचे अंघोळ करताना व्हिडीओ रेकॉर्डिंग केले व प्रेमसंबंध असणाऱ्या दुसऱ्या महिलेने हे व्हिडीओ तिच्या भावाच्या मोबाईलवर पाठवले. व त्याला घरी बोलावले.        परंतु घरी जाण्यास त्याने नकार दिल्याने मी तुझ्या बहिणीस...

हैवानालाही लाजवेल असे कृत्य प्रियशीला मिक्सरमध्ये दळले

Image
कटरने केले प्रियेसीच्या धडाचे तुकडे..नंतर मिक्सरमध्ये बारीक केले हैवानाचा चेहरा/पिडीत महिला  मुंबई ब्युरो रिपोर्ट         मुंबईत क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडणारी हत्येची एक भयंकर घटना उजेडात आली आहे. या प्रकरणात आरोपीने आपल्या लिव्ह इन पार्टनरचे लाकूड कापणाऱ्या इलेक्ट्रीक करवतीने तुकडे केले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने आरोपीला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बुधवार दिनांक 7 जून रोजी सायंकाळी पोलिसांचे एक पथक अचानक मीरा रोडवरील गीता आकाश दीप सोसायटीत पोहोचले. तिथे ते दुर्गंधी येत असल्याची तक्रार मिळालेल्या फ्लॅटवर पोहोचले. 7 व्या मजल्यावरील या फ्लॅटमध्ये पोहोचताच पोलिसांना धक्काच बसला. कारण दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरणाबाबत त्यांनी मीडियामध्ये जे काही वाचले व ऐकले होते, ते तिथे त्यांना प्रत्यक्ष पहावसाय मिळाले. रक्ताने माखलेले 3 कटर जप्त पोलिसांना फ्लॅटमधून एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. सरस्वती वैद्य असे या महिलेचे नाव आहे. पोलिसांना घटनास्थळी झाडे तोडण्यासाठी वापरण्यात येणारे 3 कटर आढळले. हे तिन्ही कटर रक्ताने...

शेवगाव दंगलीतील मास्टर माईंड शोधून काढणार:ना.विखे पाटील

Image
शेवगाव येथील दंगल प्रकरणी विखे पाटील अलर्ट मोडवर...शहराची पाहणी   शेवगाव प्रतिनिधी: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. १४) निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत राडा झाला. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. त्यात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. तसेच तीन पोलिस व गृहरक्षक दलाचे चार कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असले, तरी शहरात तणावपूर्ण शांतता होती. याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी ११२ जणांवर गुन्हे दाखल केले असून, २९ जणांना अटक केली आहे.        दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता. १५) तालुक्यात ठिकठिकाणी कडकडीत ‘बंद' पाळण्यात आला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शहरात फिरुन आढावा घेतला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यावेळी उपस्थित होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, प्रशांत खैरे, उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, अजित पाटील हे शेवगाव शहरात तळ ठोकून होते. याप्रकरणी पोलिस कर्मचारी महेश सावंत यांनी फिर्याद दिली.    ...

संगमनेर तालुक्यातील अवैध दारु गांजा ला राज्य उत्पादन शुल्क चा आशिर्वाद

Image
  संगमनेर तालुक्यात अवैध दारु गांजा विक्रेत्यांची मुजोरी वाढली.. संपादकीय: सहदेव जाधव         राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे काम नक्की काय आहे हे संगमनेर येथील कार्यालयातील अधिकार्यांना शिकवणं गरजेचे झाले आहे. कारण अनधिकृत ढाब्यांवर दिवसा ढवळ्या चाललेला मद्याचा महापूर या अधिकार्यांना दिसत नाही. संगमनेर च्या प्रमुख चारही मुख्य रस्त्यावर हा खुलेआम कारभार चालू आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष जात नाही हा विचार करायला लावणारी गोष्ट आहे.           संगमनेर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारु गांजा हातभट्टी ला ऊत आला आहे. परंतु याकडे गांधारीची पट्टी डोळ्याला बांधून बसलेल्या राज्य उत्पादन शुल्क च्या अधिकार्यांना दिसत नाही. वेळोवेळी सुज्ञ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व गावातील त्रस्त झालेले नागरिक काॅल करून माहिती देत असतात. परंतु समोरुन कुठलीही समाधानकारक उत्तर मिळत नाही. 'येतो उद्या, आज राजूर साइटला आहे, आज गाडी नाही, माझी सुट्टी आहे.' असे उडवा उडवी केल्याचे आढळून येत आहे.          संगमनेर तालुक्यातील ...

घारगाव पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल कैलास देशमुख मुंबई पोलीसांच्या रडारवर

Image
 घारगांव पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल कैलास देशमुख फरार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात असताना केला गंभीर गुन्हा, मुंबई पोलीस आरोपींच्या शोधात. मुंबई प्रतिनिधी: जिवंत माणूस मृत दाखवून 'एलआयसी'कडून २ कोटी रुपये लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. हा बोगस विमा मिळवण्यासाठी मदत केल्याच्या संशयावरून मुंबई पोलिसांनी नुकतीच श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल केवारे (मूळ रा. करमाळा, जि. सोलापूर) यांना अटक केली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी यापूर्वी मुख्य आरोपी दिनेश प्रमोद टाकसाळे, त्याचे सहकारी अनिल भीमराव लटके, विजय रामदास माळवदे (सर्व रा. केडगाव) यांना अटक केली.           केडगाव येथील मुख्य आरोपी दिनेश टाकसाळे याने एप्रिल-२०१५ मध्ये 'एलआयसी' च्या दादर (मुंबई) शाखेकडून २ कोटींचा विमा घेतला होता. नंतर त्याने दोन वर्षे विम्याचे वार्षिक हप्ते भरले. दरम्यान, नगर-पुणे महामार्गावर गव्हाणेवाडी (ता. श्रीगोंदे) शिवारात २५ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या चारचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. तो मृतदेह दिनेश टाकसाळे (रा. केडगाव) याचा असल्याचा दावा करण्यात आला. ...

राहूरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फुस लाऊन पळविले: आरोपी गजाआड

Image
दोन मुलांच्या बापाने अल्पवयीन मुलीला फुस लाऊन पळविले: पुणे येथून जेरबंद  Google Source  श्रीरामपूर प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्याला पुणे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असून 2 मुलांचा बाप असणाऱ्या आरोपी ताहेर यांच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, दि. 19 तारखेला मालुंजा परिसरातून एक 16 ‘वर्षांची अल्पवयीन मुलगी सकाळी 10 वा. आपल्या राहात्या घरातून बेपत्ता झाली होती. सदर मुलीचा शोध सर्वत्र घेतल्यानंतर ती आढळली नाही म्हणून 20 तारखेला तिच्या घरच्यांनी पोलिसांनी तक्रार दिल्यावरून भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.          सदर मुलीचा शोध घेत असताना पोलिसांना समजले की, 2-3 वर्षांपूर्वी सदर मुलीच्या घरचे हे पुण्याला वीट भट्टीवर काम करायला राहत होते. त्याठिकाणी एक टेम्पो चालक ताहेर शेख, वय – 28 याच्याशी या कुटूंबाची ओळख झाली. त्यानंतर सदर मालुंजे येथील कुटूंब पुण्याहून पुन्हा मालुंजा येथे आले. पुणे येथून हा टेम्पो चालक घटना घडली त्...

"लव जिहाद', धर्मांतराचे प्रकार झाल्यास त्या त्या भागातील पोलिस निरीक्षक जबाबदार

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात पालक मंत्र्यांच्या उपस्थित शांतता समितीची  बैठकीचे आयोजन       अहमदनगर प्रतिनिधी:   "लव जिहाद', धर्मांतराचे प्रकार झाल्यास त्या त्या भागातील पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शुक्रवारी ( 7 एप्रिल ) ला दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.        खासदार डॉ. सुजय विखे, आमदार लहू कानडे, आमदार बबनराव पाचपुते, आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी शेखर, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी आदी यावेळी उपस्थित होते..        विखे पाटील म्हणाले की, गुन्हेगारांच्या मिरवणुका काढल्या जातात, अशा गुन्हेगारांच्या मिरवणुका काढण्यापेक्षा गाढवावरून त्यांच्या मिरवणुका काढा त्यामुळे चांगला परिणाम होईल. मोक्का लावलेले गुन्ह...

आत्महत्या: लग्न कर नाहीतर घरी सारी बिरादारी घेऊन येतो

Image
 औरंगाबाद जवळील वाळूंज येथे तृतीयपंथीय च्या जाचास कंटाळून आत्महत्या        औरंगाबाद प्रतिनिधी: तृतीयपंथीय च्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका 29 वर्षीय तरूणाने आत्महत्या  केल्याची घटना औरंगाबादच्या वाळूज परिसरातील सावतानगरमध्ये समोर आली आहे.           पैशांची मागणी करीत लग्न कर नाही, तर तुझ्या घरी माझ्या बिरादरीच्या लोकांना आणून गोंधळ घालून तुझी बदनाम करणार असं ब्लॅकमेल तृतीयपंथीयाकडून करण्यात आलं होतं. त्यामुळे झालेल्या त्रासाला कंटाळून या तरूणाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी रात्री कमळापूर रस्त्यावरील रांजणगाव परिसरातील सावतानगर येथे घडली. सागर बाबुराव कोंगळे (वय 29 वर्षे, रा.न्यू हनुमानगर, गारखेडा) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.         याबाबत अधिक माहिती अशी की, सागर कोंगळे हा वाळूज औद्योगिक परिसरातील एका खाजगी कारखान्यात कामाला होता. दरम्यान दोन महिन्यापूर्वी तो ओएसिस चौकात ज्यूस पित असताना त्याची ओळख एका तृतीयपंथीसोबत झाली होती. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यामुळे गेल्या...

साकूर गावात त्या जादूटोना टोळीला हद्दपार करा

Image
साकूर गावात भूत उतरायच्या नावाखाली धर्मांतर केले जात असल्याची चर्चा  राजसत्ता न्यूज/दि.२७.१.२३ संपादकीय           साकुर  गाव हे पठार भागातील सर्वात मोठी बाजार पेठ आहे. खरेतर साकूर  गाव हे पठार भागाची राजधानी समजली जाते. त्यामुळे साकुर हे गाव कायमच चर्चेत राहत आहे. अश्यातच आता या गावांची चर्चा वेगळ्याच कारणाने सुरु झाली आहे. भुते उतरवण्याच्या नावाखाली दर बुधवारी एक भलताच दरबार साकूर गावात लागत आहे. बुधवारी साकूर गावचा आठवडे बाजार असतो आणि याचेच औचित्य साधत एक महाशय थेट साकूर ग्रामपंचायत पाठीमागे एका आपल्या महिला भक्ताच्या घरात भुते उतरावण्याची ठगगिरी करत आहे.           सविस्तर वृत्त असे कि, संगमनेर तालुक्यातील साकूर गावात दर बुधवारी आठवडे बाजार असतो. या आठवडे बाजारासाठी पठारभागातील सर्व गावचे नागरीक बाजारासाठी येत असतात. याचेच औचित्य साधत साकूर येथे बाहेर गावातून एक ठगांची टीम येथे येत असतेे. या ठगांनी अनेकांकडून आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी आर्थिक लूट केली आहे. या ठगांनी एक विशिष्ट धर्म स्विकारला असून त्या धर्माच्...

खळबळजनक: धर्मांतरण करुन महिलेवर सामुदायिक बलात्कार...गुन्हा दाखल

Image
  सिन्नर तालुक्यातील खळबळजनक घटनेने सिन्नर हादरले पिडितेवर बलात्कार   सिन्नर वार्ताहर : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे धर्मांतर करून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिन्नर - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.        ख्रिश्चन या धर्मांतरण प्रकरणातील आरोपी त्याच्या चार साथीदारांसह झोपडपट्ट्यांमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार करीत असे. झोपडपट्टी भागातील रहिवाशांना निरनिराळ्या प्रकारची आमिषे या आरोपींकडून दाखवण्यात येत होती., इतकेच काय तर आरोपी सर्व आजार हे येशूच्या नावाने बरे होतात असा खोटा प्रचारही करीत होता. येशूची प्रार्थना केल्यानं आर्थिक आणि आरोग्य समस्या दूर होतात, त्यामुळे येशूची पूजा करा, असं या आरोपींकडून सांगण्यात येत असे. हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासही लोकांना सांगण्यात येत असे.या संदर्भात सविस्तर गोष्ट अशी की सिन्नर येथील दावत मळा माळेगाव येथे संबंधित फिर्यादी महिला आपला उदरनिर्वाह मोलमजुरी करून भागवते. पीडित महिला मुसळगाव एमआयडीसीमध्ये काम शो...

नराधमाने हद पार केली मुलींनो सावधान

Image
श्रद्धा वालकर मर्डर प्रकरणावर अनेक जण आपलं मत मांडत आहे. अभिनेत्री केतकी चितळेनंतर अभिनेत्री आणि गायिकेनं तिचं मत मांडलं आहे.पाहा तिची पोस्ट   मुंबई, 16 नोव्हेंबर :   दिल्लीत झालेल्या   श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर देश चांगलाच हादरून गेला आहे. कामानिमित्त मुंबईला गेलेल्या श्रद्धाची बॉयफ्रेंड आफताबनं गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर नराधमानं श्रद्धाचे 35 तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले. दोघांमध्ये किरकोळ वाद झाले आणि त्या वादातून आफताबनं श्रद्धाची निर्घूण हत्या केली. आफताब पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्वसामान्य नागरिकांपासून सेलिब्रेटी देखील यावर आपलं मत मांडत आहे. काल अभिनेत्री केतकी चितळेनं याविषयी पोस्ट शेअर केली आहे. तर आज अभिनेत्री आणि गायिता केतकी माटेगावकर हिनं पोस्ट शेअर करत मुलींना प्रेमाचा सल्ला दिला आहे. सध्या केतकीची पोस्ट चर्चेत आहे. केतकीनं इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत दिल्ली हत्याप्रकरणावर भाष्य केलं आहे. केतकीनं म्हटलंय, 'एक सुंदर जग आपले आई वडिल आपल्याला देतात. सुख सोयींनी आणि उत्तम सुरक्षित असं. ...

अग्नितांडवः नगर सिव्हिल हाॅस्पिटल मधील मोठी घटना

Image
  अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागली आग...११  जण मृत्युमुखी...  जिल्हा रुग्णालय प्रशासन मात्र आता होत आहेत टिकेचे लक्ष्य.. जनतेत नाराजीचा सूर राजयोग मानस वृत्त प्रतिनिधी (स्वाती सुंबे) : जिल्हा शासकिय रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला मोठी आग लागली असून ११ जणांचा होरपोळून मृत्यु झाला असल्याची बातमी येत आहे. परंतु हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अहमदनगर शहरातील मध्यवर्ती भागात असलेले हे रुग्णालय गरीबांसाठी संजिवनी आहे. परंतु या रुग्णालयाचा गलथान कारभार अनेक वर्षांपासून सुरु आहे. याचाच एक भाग म्हणजे आजची ही घटना.        ही घटना शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी ११ च्या दरम्यान घडला आहे .आगीच्या या दुर्घटनेत आकरा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र आगीची तीव्रता लक्षात घेता हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे . काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर काही काही रुग्ण भाजल्याचे देखील वृत्त आहे . राजयोग मानस च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला असता आगीची दाहक...

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

Image
  हाॅटेलात चालत होती 'रंगरलिया': दोन अप्सरांसह तीन पोपट  पिंजऱ्यात कैद   पोलीसांच्या कारवाईने निर्माण झालेला "राजयोग" उध्वस्त..! अहमदनगर- नगर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे,येथील एका कुंटणखान्यावर छापा टाकण्यात आला असून ५ जणांविरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        एकीकडे हनी ट्रॅपींगच्या नावाने नगर जिल्हा बदनाम झालेला असतानाच आता मात्र वेश्या व्यवसायही काही हाॅटेलातून सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. काही नामांकित पुढार्यांच्या हाॅटेलवर असे धंदे होतांना दिसत आहे. आता मात्र हे नवीन प्रकरण समोर आल्याने नगर शहरात नवी चर्चा सुरु झाली आहे. पोलीस बेकायदा धंद्यांना आळा घालण्यास सक्षम अपयशी आल्याचे चित्र दिसुन येत आहे. वारंवार होणारे महिला मुलींवरील अत्याचार, बेकायदा गांजा विक्री, सर्रास गुटखा विक्री, अवैध दारू विक्री, गोमांस अशा अनेक गुन्ह्यांनी शहरासह जिल्ह्याला विळखा घातलेला असून कायद्याची भिती या गुन्हेगारांना राहिलेले नाही याचे कारण अर्थपूर्ण सबंध आहे का...?असा सवाल जनसामान्यांत उपस्थित होत आहे. याबाबत सविस्...