अग्नितांडवः नगर सिव्हिल हाॅस्पिटल मधील मोठी घटना
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागली आग...११ जण मृत्युमुखी...
जिल्हा रुग्णालय प्रशासन मात्र आता होत आहेत टिकेचे लक्ष्य.. जनतेत नाराजीचा सूर
राजयोग मानस वृत्त
प्रतिनिधी(स्वाती सुंबे): जिल्हा शासकिय रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला मोठी आग लागली असून ११ जणांचा होरपोळून मृत्यु झाला असल्याची बातमी येत आहे. परंतु हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अहमदनगर शहरातील मध्यवर्ती भागात असलेले हे रुग्णालय गरीबांसाठी संजिवनी आहे. परंतु या रुग्णालयाचा गलथान कारभार अनेक वर्षांपासून सुरु आहे. याचाच एक भाग म्हणजे आजची ही घटना.
ही घटना शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी ११ च्या दरम्यान घडला आहे .आगीच्या या दुर्घटनेत आकरा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र आगीची तीव्रता लक्षात घेता हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे . काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर काही काही रुग्ण भाजल्याचे देखील वृत्त आहे . राजयोग मानस च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला असता आगीची दाहकता भयावह असल्याचे लक्षात आले. आता ही आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे.
आगीचे कारण अजून स्पष्ट नाही. मात्र तेथील नागरिकांशी संवाद साधला असताना ही आग गॅसच्या लीकेजमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र प्रशासनाकडून कुणीही माहीती देण्यास समोर आले नाही. शासकीय रुग्णालयातील आग प्रतिबंधक यंत्रणांचा तसेच फायर ऑडिटचा गलथान कारभार यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रुग्णालयात अग्निशमन दल पोहोचले असून आग विझवण्यात यश आले आहे . आयसीयू विभागाला लागलेल्या आगीत अनेक जण भाजले असल्याची शक्यता असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रुग्णालयाच्या आयसीयूला आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं.
यांवेळी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री शंकरराव गडाख, तसेच प्राजक्त तनपुरे यांनीही घटनेची पाहणी केली. परंतु तीन मंत्री पदे जिल्ह्याला लाभलेले असताना जिल्हा वार्यावरच आहे हे सिद्ध झाले. तर पालकमंत्र्यांचा कधी तपासच नाही. अशी दयनिय अवस्था या जिल्ह्याची झाली आहे. यावेळी नगर दक्षिणचे खांसदार सुजय दादा विखे पाटील, नगर शहराचे आमदार संग्रामभैया जगताप तसेच माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी तत्परता दाखवत कुठल्याही परिणामांची चिंता न करता रुग्णांच्या मदतीला धावले यांमुळे जगताप कर्डीले विखे यांचे जनतेतून कौतुक होत होते. या लोकप्रतिनिधींनी देखील तात्काळ घटनास्थळी भेट दिली आहे तर अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तातडीनं कोल्हापूरहून नगरमध्ये दाखल झाले आहेत.
अहमदनगरची अवस्थाथा अतिशय दयनीय श पालकमंत्री कधी तरी मासिक, वार्षीक अशी नगरची फक्त वारी करुन जातात आजच्या घटनेला पालकमंत्र्यांना देखिल दोषी धरुन त्यांचा राजिनामा घेतला पाहिजे. असे नागरिक चुपके चुपके बोलताना दिसत आहे.
सहदेव जाधव
संपादकः साप्ताहिक राजयोग मानस, पोर्टल, राजसत्ता न्युज
Comments
Post a Comment