Posts

Showing posts with the label राजकीय

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

Image
आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाला समाविष्ट करून घ्यायच्या हालचाली आदिवासींचा तीव्र विरोध    बोटा प्रतिनिधी: सतिश फापाळे:   महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी,धनगर समाजाच्या आरक्षणाचा तीव्र प्रश्न निर्माण होतांना दिसून येत आहे. अशातच गुरूवार दि.२१ सप्टेंबर रोजी अतिथी गृहावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, संबंधित खात्यांचे मंत्री व राज्यातील धनगर समाजाचे लोकप्रतिनिधी यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाला समाविष्ट करून घ्यायच्या हालचाली सरकारच्या दिसत असल्याने महाराष्ट्रतील आदिवासी समाजाने या गोष्टीला तीव्र विरोध केला आहे. आदिवासींमध्ये धनगर समाजाचा समावेश करण्याचा प्रयत्न सरकारने केल्यास मोठ्या संख्येने आदिवासी समाज रस्त्यावर येईल असा इशारा अकोले तालुक्याचे मा. उपसभापती मारुती मेंगाळ यांनी त्यांचे प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.             अवघ्या महाराष्ट्रात सध्या आरक्षणावरून चांगलेच वातावरण पेटतांना दिसत आहे.मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी, धनगर या दोन्ही समाजाने आरक्षणसाठी आंद...

भालचंद्र नेमाडे यांनी ओकलेली गरळ पण बोलवते धनी कोण

Image
भालचंद्र नेमाडे यांचे बेताल वक्तव्य म्हणजे गाढवाने कथन केलेली कथा  संपादक: सहदेव जाधव  दादर येथे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यक्रमात बोलताना भालचंद्र नेमाडे यांची जीभ घसरली. ही जीभ घसरली आणि अखंड हिंदुस्थान चा अवमान झाला. आता त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. औरंगजेब, पेशवे यांच्या संदर्भात नेमाडे यांनी ही वक्तव्य केली. औरंगजेबाला सर्वोच्च दर्जा देताना आपली 'साठी बुद्धी नाटी' झाल्याचे स्पष्टीकरण यावेळी नेमाडे यांनी देऊन टाकले. या माध्यमातून त्यांनी इतिहासाची पाने चुरगळून बीनअकलेचे तारे मोजले.         ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्यावरुन हा मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपाच्या सोशल मीडिया आणि कायदेशीर सल्लागार सेलचे प्रमुख आशुतोष दुबे यांनी सोमवारी भोईवाडा पोलीस ठाण्यात भालचंद्र नेमाडे याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शनिवारी दादर येथे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यक्रमात बोलताना भालचंद्र नेमाडे यानी केलेल्या काही वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.        आशुतोष दुबे यांनी भालचंद्...

मुख्यमंत्री तातडीने दिल्ली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात खळबळ

Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली भेटीला कारण गुलदस्त्यात परंतु मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता: सुत्र  विशेष प्रतिनिधी: विधानभवन  मुंबई|21 जुलै 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रात्री आठ वाजता दिल्लीच्या दिशेला रवाना होणार असल्याची मोठी बातमी सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गेले होते. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आसनव्यवस्था विशेष ठिकाणी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांगेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मधोमध एकनाथ शिंदे यांची बैठकीत बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली. तर अमित शाह यांच्या बाजूला अजित पवार बसले होते.  या बैठकीनंतर मुख्यमंत्री विमानतळाच्या दिशेला निघाल्यानंतर अजित पवार आणि अमित शाह, नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा यांच्यात अर्धा तास बैठक पार पडल्याची माहिती सम...

संगमनेर भाजपात उभी फूट पडण्याची श्यक्यता सर्वसामान्य कार्यकर्ता दुर्लक्षित होत असल्याची खंत

Image
विखे हाच आमचा पक्ष व विखे हेच आमचे सरकार: पण चांडाळ चौकटीला वैतागलो संपादकीय     भाजप नेतृत्वाला उद्विग्न कार्यकर्त्याची आर्त साद           संगमनेर तालुक्यात काही पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीला सर्वसामान्य कार्यकर्ता वैतागून गेला असून लवकरच पर्याय शोधत असल्याचे खात्रीशीर वृत्त राजसत्ता न्यूजच्या हाती लागले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून संगमनेर भाजपात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु काही पदाधिकाऱ्यांच्या चमकोगिरीला कार्यकर्ते पुरते वैतागले आहेत. दिलेले कामे वरिष्ठान पर्यंत जाणून बुजून पोहचवले जात नसल्याचा आरोप काही कार्यकर्ते खाजगीत बोलताना करत आहेत. काही जुने जाणते कार्यकर्ते मात्र या फंदात न पडता अलिप्त राहणे पसंद करत आहेत. संगमनेर तालुक्यात आमदार बाळासाहेब थोरात यांचा एक हुकमी अंमल आहे. तो छेदने इतके ही सोपी गोष्ट नाही. त्यातच राज्याच्या राजकारणात ज्या पद्धतीने उलथापालथ झाली आहे ती बघता तालुक्यात देखील मोठा भूकंप होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. काही पदाधिकारी जनतेत जाऊन पक्ष्याची भूमिका मांडत आहेत तर काही मात...

अकोले तालुक्याचा आमदार होण्यासाठी अनेकांना आतापासूनच डोहाळे

Image
अकोले तालुक्याचा कोण होणार जननायक..? पिचड, लहामटे, भांगरें,  संपादकीय : सहदेव भिकाजी जाधव          राज्याच्या राजकारणात मोठे अवडंबर सुरु असून राष्ट्रवादी व शिवसेना पक्षात मोठी फूट पडली आहे. या दोन्ही पक्षात  कार्यकर्ते मोठे सैरभैर झालेले दिसून येत आहे. नुकतेच अजित दादा पवार यांनी मोठे बंड केलेले सर्व देशाने बघितले. यात एकटे अजितदादांनी बंड केलेले नसून सर्वच जेष्ठ नेत्यांनी यावेळी बाहेर पडत शरद पवार यांना मोठा झटका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात दुफळी निर्माण झाली आहे. आता हीच परिस्थिती अकोले तालुक्यात देखील झाली आहे. आमदारांसह तालुक्याचे प्रमुख नेत्यांची मोठी पंचायत झालेली बघायाला मिळत आहे.          अकोले तालुक्यातील राजकीय क्षेत्रात मोठी उलाढाल सुरु असून अनेकांनी यात आपली पोळी भाजेल का याचा अभ्यास सुरु  केला आहे, अकोले तालुका तसा पुरोगामी तालुका म्हणून संबोधला जातो. जातीयवादी पक्ष्याला कधीही या तालुक्याने स्वीकारले नाही. आजपर्यंत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असाच या तालुक्याची ओळख राहिलेली आहे. हि ओळख त...

विरोधक एकवटले गणेश वर विजय मिळवत शिर्डी विधानसभा काबीज करण्याची दर्पोक्ती:

Image
गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक: पराभव कुणाचा विखेंचा की कोल्हेंचा  संपादकीय विश्लेषण / सहदेव जाधव   गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अखेर विखे विरोधकांची महत्वाकांक्षा पूर्ण झाली. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विखेंचा पराभव म्हणजे थेट जसे काही पांडवांकडून कौरवांनी इंद्रप्रस्थ जिंकल्याचा आनंद आज विखे विरोधकांना झाला. आमदार निलेश लंके तर थेट पारनेर वरून आपली कामे सोडून शिर्डीत दाखल झाले. परंतु हा विजय नक्की कुणाचा समजावा याचे देखील विवेचन होणे गरजेचे आहे.          गणेश सहकारी साखर कारखाना हि निवडणूक तशी कोल्हे आणि विखे यांच्यातील लढाई... परंतु संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात, श्रीरामपूरचे करण ससाणे, सचिन गुजर, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, दंडवते, त्याच बरोबर सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते यांनी कारखान्याचे हीत एका बाजूला ठेऊन फक्त विखेंचे पानिपत हा एकच अजेंडा समोर ठेवला. व याचे सर्व सूत्र हि संगमनेरच्या हाती सोपवण्यात आली. संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी मिळालेल्या संधीचे सोनं करून घेतले व सर्व विखे विरोधकांनी आज राहात्यात दिवाळी...

जिल्ह्यातील काही लोकांनी विकासकामांना अडथळे निर्माण केले:विखे पाटील

Image
महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निझर्णेश्वर येथे कार्यकर्ता शिबीर  संगमनेर दि. ८ प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशिर्वाद, जनता आणि कार्यकर्त्‍यांच्‍या भक्‍कम पाठबळामुळेच राज्‍यात मोठ्या पदावर काम करण्‍याची संधी मिळालेल्‍या संधीतून जनतेच्‍या हिताचे निर्णय आपण करीत आहोत. परंतू आपल्‍या निर्णयाशी आणि परिसराच्‍या विकासाची असुया काहींना वाटत आहे त्‍यामुळेच चांगल्‍या कामात अडथळे निर्माण करण्‍याचे काम सुरु झाले आहे. यापुर्वी सुध्‍दा बाहेरुन आलेली आव्‍हानं परतवून लावण्‍याचे काम कार्यकर्त्‍यांनी संघटीतपणे केले आहे. संघटनेची ताकद हेच आपल्‍या यशाचे बलस्‍थान असल्‍याचे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.        श्री.क्षेत्र निझर्णेश्‍वर येथे जनसेवा मंडळाच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या पदाधिकारी, कार्यकर्त्‍यांच्‍या मेळाव्‍यात मंत्री विखे पाटील यांनी संवाद साधला. नुकत्‍याच संपन्‍न झालेल्‍या प्रवरा सहकारी बॅक, राहाता कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या नवनिर्वाचीत पदाधिकारी आणि संचालकांचा सत्‍कार याप्रसंगी...

आ.बाळासाहेब थोरात गटाच्या विजयाने तालुक्यात उत्साहाचे वातावरण

Image
शिबलापूर

पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच डिसेंबर 2021 मध्ये केलेले निलंबन आदेश मागे

Image
परमबीर सिंग यांची आरोपातून सुटका; म.वि.आ.ला धक्का महाविकास आघाडी सरकारने डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेले निलंबन आदेश रद्द केले आहे आणि ते ऑन-ड्युटी असल्याचे मानले जावे मुंबई, 12 मे :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटर बॉम्ब टाकणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहे. शिंदे सरकारने परमबीर सिंग यांची सर्व आरोपांमधून सुटका केली आहे. याआधीच उपायुक्तपदाचं निलंबन मागे घेतलं होतं. त्यानंतर आरोपातून सुटका केली आहे.            मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंग यांना मदत केल्या प्रकरणी पोलीस उपायुक्ताला निलंबित केले होते. पण, आता शिंदे सरकारने परमबीर सिंग यांना दिलासा दिला आहे. परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहे. डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेले निलंबन आदेश मागे घेतले आणि निलंबनाचा कालावधी कर्तव्यावर वागण्याचा आदेश दिला आहे. याआधी निलंबित पोलीस उपायुक्ताचे निलंबन रद्द केले आह...

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर हे सरकार कदाचित परत आले असते

Image
    मी राजीनामा दिला नसता तर मी पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो:  उद्धव ठाकरे संपादकीय: सहदेव जाधव  जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर कदाचीत सरकार परत आलं असतं. त्यानंतर याच सर्व मुद्द्यावर उद्धव ठाकरेंकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. परंतु वेळ निघून गेलेली आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकार आहे तसेच राहील असे दिसून येत आहे.   मुंबई, 11 मे :   आज राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल हाती आला आहे. सुप्रीम कोर्टाकडून हे प्रकरण विधासभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आलं आहे. आता या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान हा निर्णय देताना सुप्रीम कोर्टानं असंही निरीक्षण नोंदवलं की, जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर कदाचीत सरकार परत आलं असतं. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर हे सरकार कदाचित परत आले असते, असं सुप्रीम कोर्टानं आजचा निर्णय देताना म्हटलं होतं. यावर उद्धव ठाकरे यांनी ...

भारतीय जनता पार्टीची नवीन प्रदेश कार्यकारिणी बुधवारी दुपारी एक वाजता जाहीर होणार

Image
भारतीय जनता पार्टीची नवीन प्रदेश कार्यकारिणी  1200 जणांची टीम:  चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पार्टीची नवीन प्रदेश कार्यकारिणी बुधवारी (ता. 3 मे ) दुपारी एक वाजता जाहीर होत असून, राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्यातील नेते, प्रमुख नेतृत्व, विशेष निमंत्रित या सर्वांची मिळून जवळपास 1200 जणांची टीम होणार आहे.  भाजपाचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज ही माहिती दिली. ते म्हणाले, दर तीन वर्षांनी प्रदेश कार्यकारिणीची नव्याने रचना होत असते. जुन्या कार्यकारिणीला आता साडेतीन वर्षांचा कालावधी झालेला आहे. 12 ऑगस्ट 2022 ला प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नवीन कार्यकारिणी अपेक्षित होती. या कार्यकारिणीच्या माध्यमातून 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत. 48 लोकसभा आणि 200 हून अधिक विधानसभा युतीत जिंकण्याचा आमचा पण आहे  आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. जुनी आणि नवीन कार्यकारिणी मिळून आम्ही एकत्रित हा प्रयत्न करू, त्यामध्ये चांगले यश आम्हाला प्राप्त होईल.  • 288 विधानसभा समन्वयक 288 विधानसभा समन्वयक देखील लवकरच जाहीर करणार. नव्या जिल्हाध्यक्षांची टीम सुद्धा मे ...

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांचे कॉंग्रेसवर शरसंधान

Image
 गांधी कुटुंबाचे पोपट बोलू लागले..राजेंद्र गोंदकरांची जहरी टिका शिर्डी प्रतिनिधी:  नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तीगत टीका करणे व त्यांच्या आडनावावरून पोरकट वक्तव्ये करणे महागात पडते हे आता सोनिया, राहुल गांधी व वाड्रा कुटुंबास पुरेपूर उमगल्याने आता पाळीव पोपटांच्या मुखातून असे उद्योग कॉंग्रेसने सुरू केले आहेत. मात्र यातून कॉंग्रेसचे नैराश्यच उघड होत असून अशा हीन आरोपांना जनता मतदानातूनच पुन्हा कॉंग्रेसला जागा दाखवून देईल, असे प्रत्युत्तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.  पंतप्रधान मोदी हे विषारी साप असल्याचे वक्तव्य करून कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गांधी कुटुंबाची संस्कृती जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे. याआधी गांधी परिवाराने पंतप्रधानांवर व्यक्तिगत चिखलफेक करताना राजकीय संस्कृती खुंटीवर टांगली होती. मौत का सौदागर, खून का दलाल अशा शब्दांत सोनिया गांधींनी पंतप्रधानांवर टीका केली तेव्हा देशातील जनतेनेच कॉंग्रेसला झिडकारले. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांमुळे तर त्यांना कायदेशीर कारवाईस तोंड द्यावे लागले अ...

बेकायदेशीर गुंठेवारी व्यवहारांची विभागीय आयुक्‍तांमार्फत चौकशी

Image
  संगमनेर तालुक्यात शासकीय योजनांची आढावा बैठक संपन्न. थोरातांसह समर्थकांना 'पोटसूळ', मात्र आम जनता 'संतुष्ट'.  संगमनेर दि.२८ प्रतिनिधी  तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात झालेल्‍या बेकायदेशीर गुंठेवारी व्‍यवहारांच्‍या तक्रारी मोठ्या प्राप्‍त झाल्‍या आहेत. यासर्व व्‍यवहारांची विभागीय आयुक्‍तांमार्फत चौकशी करण्‍यात येणार असल्‍याची माहीती महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आढावा बैठकीत दिली.        मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत तालुक्‍यातील जिल्‍हा परिषद गट निहाय बैठकांचे आयोजन होते. घुलेवाडी, संगमनेर खुर्द या जिल्‍हा परिषद गटातील गावांमध्‍ये सुरु असलेल्‍या शासकीय योजनांच्‍या कामांचा आढावाही घेण्‍यात आला. उपस्थित ग्रामस्‍थ आणि पदाधिका-यांनी केलेल्‍या विविध प्रश्‍नांबाबत गांभिर्याने दखल घेण्‍याची सुचना या बैठकीमध्‍ये मंत्र्यांनी दिल्‍या. प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, गटविकास आधिकारी अनिल नागणे यांच्‍यासह सर्व शासकीय विभागाचे वरिष्‍ठ आधिकारी तसेच जेष्‍ठ नेते वसंतराव देशमुख, गुलाबराव सांगळे, भाजपाचे तालुका अध्‍यक्ष सतिष कानवडे...

मराठी तरुणांना दोन लाखा पर्यंत लघू कर्ज उपलब्ध होणार

Image
 एक लाख मराठा युवा उद्योजक तयार करण्याचे लक्ष्य - ना. नरेंद्र पाटील    अकोले ( प्रतिनिधी ) - अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने राज्य सरकारच्या सहकार्याने १ लाख मराठा उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.       भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. बुधवारी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या काही महत्वपूर्ण निर्णयांची माहिती पाटील यांनी यावेळी दिली. पाटील यांनी सांगितले की, महामंडळाच्या ५५६ लाभार्थ्यांना कर्ज आधी मिळाले मात्र प्रमाणपत्र नंतर मिळाले. या लाभार्थ्यांना व्याज परतावा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. आघाडी सरकारने बंद केलेली ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज देण्याची योजना सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही महामंडळाने घेतला आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत असलेली १० लाखांची मर्यादा १५ लाखांपर्यंत...

मविआच्या सभेत बोलणार नाही अजित पवार: अनिल देशमुख आणि जयंत पाटील बोलणार

Image
नागपूरमध्ये महाविकास आघाडीची 'वज्रमूठ सभा' की 'वज्रफूट सभा' अजित दादा नाराज  आज नागपूरमध्ये मविआची सभा होणार आहे. मात्र या सभेत अजित पवार बोलणार नसल्याचं समोर आलं आहे. याबाबत खुद्द अजित पवार यांनीच खुलासा केला आहे.   नागपूर, 16 एप्रिल :  आज नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेला मविआचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या सभेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेमध्ये अजित पवार बोलणा की नाही असा सवाल उपस्थित केला जात होता. अखेर अजित पवार या सभेत बोलणार नसल्याचं समोर आलं आहे. खुद्द अजित पवार यांनीच याबाबत खुलासा केला आहे. आम्ही महाविकास आघाडीमधील सर्व नेत्यांनी बसून ठरवलं होतं की राज्यात सहा ते सात सभा घ्यायच्या. त्याची सुरुवात मराठवाड्यातून झाली. आज नागपूरमध्ये दुसरी सभा आहे. सभांना घेऊन माध्यमं विविध बातम्या चालवत आहेत. पण सगळी माहिती घेऊन बातम्या चालविल्या तर बरं होईल, एका सभेत प्रत्येक पक्षाचे दोनच मान्यवर भाषण करतील असं आधीच ठरलं होतं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.  पुढे बोलताना अजित...

केंद्रीय निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी मोठा धक्का

Image
  राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केल्यानंतर निवडणूक आयोग राष्ट्रवादीबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे. आता पक्षाला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मुंबई, 14 एप्रिल :   केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीसह, ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला. तर दुसरीकडे आपला मात्र राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या धक्क्यातून पक्ष सावरत असतानाच आता निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्लीत देण्यात आलेला बंगला काढून घेतला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचा  राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. त्यानंतर आता  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिल्लीत देण्यात आलेला बंगला देखील काढून घेतला जाण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकारकडून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआयला त...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडे बाळासाहेब मुरकुटे यांची नेवास्यासाठी महत्वाची मागणी

Image
अतिवृष्टी ग्रस्त पाच महसूल मंडलाचा समावेश करुन शेतकऱ्यांना भरपाई द्या:मा.आ.मुरकुटे        मागील वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांचा खरीप व रब्बी हंगाम वाया गेला. राज्य सरकारने अशा बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे केले. त्यानुसार तालुक्यात आठ पैकी तीन महसूल मंडलात भरपाई जाहिर झाली. मात्र पाच महसूल मंडलातील शेतकरी यापासून वंचित राहिले अशा वंचित शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची मा. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भेट घेऊन निवेदन दिले आहे.         नेवासा तालुक्यातील सर्व महसूल मंडलात मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे तालुक्यात आठ महसूल मंडलात सारखाच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे १०० टक्के पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे महसूल व कृषी विभागाकडून रितसर पंचनामे होऊन तालुक्यात ७० हजार शेतकऱ्यांचे ५१ हजार १६५ हेक्टर शेतीवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे अशा बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे काम आठ पैकी तीन म...

काँग्रेसला अडचणीची ठरेल अशी भूमिका आता शरद पवार घेत आहे: राऊतांचं वक्तव्य

Image
शरद पवारांच्या भूमिकेमुळे मविआत फूट? राऊतांचं मोठं वक्तव्य म्हणाले... शरद पवारांच्या जेपीसीसंदर्भातील वक्तव्यामुळे मविआत फूट पडणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.  मुंबई, 8 एप्रिल:   अदानी प्रकरणात जेपीसी स्थापन करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती. मात्र काँग्रेसला अडचणीची ठरेल अशी भूमिका आता शरद पवार घेताना दिसत आहेत. अदानी प्रकरणात जेपीसी स्थापन करण्याची काही गरज नाही, त्यांना जाणून-बाजून टार्गेट केलं जात असावं असं वाटतं असं पवार यांनी म्हटलं आहे. यावर आता काँग्रेस काय भूमिका घेणार ? शरद पवारांच्या वक्तव्यामुळे मविआत फूट पडणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे शरद पवारांच्या भूमिकेत काही नवीन नाही, पवारांच्या भूमिकेमुळे मविआत फूट पडणार नाही. मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. शरद पवारांनी फक्त जेपीसी संदर्भात पर्याय सांगितलल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही जेपीसीचा अग्रह धरला होता असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर देखी...

अकोले बाजार समितीची निवडणूक जाहीर १५९ अर्ज दाखल

Image
आजी माजी आमदार डॉ. किरण लहामटे आणि वैभव पिचड यांच्यात पुन्हा एकदा चुरस    अकोले प्रतिनिधी: अकोले बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. अकोले बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यात आजी माजी आमदार यांच्यात पुन्हा एकदा चुरस अनुभवायला मिळणार आहे. डॉ. किरण लहामटे आणि वैभव पिचड या आजी-माजी आमदारांनी उमेदवारी अर्ज भरल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे. अकोले कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूकीत पहिल्यांदाच शेतकऱ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळाल्याने शेतकरीसुद्धा या निवडणुकीत आपले नशीब आजमावू शकतात. अकोले बाजार समिती निवडणुकीत अखेरच्या दिवशी सोमवारी तब्बल १५९ अर्ज दाखल झाले.        या निवडणुकीतून १८ सदस्य निवडले जाणार आहेत. या निवडणुकीत मतदारांची संख्या ही २ हजार ४७० एवढी आहे. निवडणुकीसाठी ३ एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. या निवडणुकीसाठी एकूण १५९ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जाची छाननी ५ एप्रिल रोजी होणार आहे. तसेच २० एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. ३० एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतमोजणी होऊन निक...

अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले: गंभीर आरोप

Image
दीपाली सय्यद यांच्याबरोबर रामदास आठवले आणि नितीन गडकरी यांचे आर्थिक संबंध   अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे, असा दावा त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांच्याशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. अहमदनगरात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाऊसाहेब शिंदे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी पाकिस्तानच्या बँकेत दीपाली सय्यद यांचे बँक खाते असल्याचा पुरावा त्यांनी दिला आहे. तर भाजपच्या दिग्गज नेत्यांना हे सर्व माहिती असून केवळ आर्थिक हितसंबंधामुळे त्यांना पाठीशी घातले जाते असा आरोप शिंदे यांनी केला आहे. यापुढे दीपाली सय्यद यांच्यावर काही कारवाई करण्यात आली नाही तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात फिरू देणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.   भाऊसाहेब शिंदेंचे आरोप दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानामध्ये एक बँक खाते असल्याचा खळबळजनक दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पा...