मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडे बाळासाहेब मुरकुटे यांची नेवास्यासाठी महत्वाची मागणी
अतिवृष्टी ग्रस्त पाच महसूल मंडलाचा समावेश करुन शेतकऱ्यांना भरपाई द्या:मा.आ.मुरकुटे
मागील वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांचा खरीप व रब्बी हंगाम वाया गेला. राज्य सरकारने अशा बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे केले. त्यानुसार तालुक्यात आठ पैकी तीन महसूल मंडलात भरपाई जाहिर झाली. मात्र पाच महसूल मंडलातील शेतकरी यापासून वंचित राहिले अशा वंचित शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची मा. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भेट घेऊन निवेदन दिले आहे.
नेवासा तालुक्यातील सर्व महसूल मंडलात मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे तालुक्यात आठ महसूल मंडलात सारखाच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे १०० टक्के पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे महसूल व कृषी विभागाकडून रितसर पंचनामे होऊन तालुक्यात ७० हजार शेतकऱ्यांचे ५१ हजार १६५ हेक्टर शेतीवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे अशा बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे काम आठ पैकी तीन महसूल मंडलात जाहिर झाले. पंरतु उर्वरित पाच महसूल मंडलात देखील १०० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. या पाच महसूल मंडलास 100 टक्के नुकसान भरपाई मिळावी, यासाठी नेवाशाचे भाजपा मा. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन राहिलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी माजी आमदार मुरकुटे यांनी केली आहे.
नेवासा तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान झाल्याने अशा शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावे, असे नेवासा तहसीलदार यांना सांगून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांन संदर्भात मुखमंत्र्याना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी माहिती दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com..
संपादक : सहदेव भिकाजी जाधव (B.A.D.L.L & L.W) संपर्क: rajyogmanas770@gmail.com/ 9545529052
Comments
Post a Comment