आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाला समाविष्ट करून घ्यायच्या हालचाली आदिवासींचा तीव्र विरोध


  बोटा प्रतिनिधी: सतिश फापाळे:  महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी,धनगर समाजाच्या आरक्षणाचा तीव्र प्रश्न निर्माण होतांना दिसून येत आहे. अशातच गुरूवार दि.२१ सप्टेंबर रोजी अतिथी गृहावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, संबंधित खात्यांचे मंत्री व राज्यातील धनगर समाजाचे लोकप्रतिनिधी यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाला समाविष्ट करून घ्यायच्या हालचाली सरकारच्या दिसत असल्याने महाराष्ट्रतील आदिवासी समाजाने या गोष्टीला तीव्र विरोध केला आहे. आदिवासींमध्ये धनगर समाजाचा समावेश करण्याचा प्रयत्न सरकारने केल्यास मोठ्या संख्येने आदिवासी समाज रस्त्यावर येईल असा इशारा अकोले तालुक्याचे मा. उपसभापती मारुती मेंगाळ यांनी त्यांचे प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे. 


           अवघ्या महाराष्ट्रात सध्या आरक्षणावरून चांगलेच वातावरण पेटतांना दिसत आहे.मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी, धनगर या दोन्ही समाजाने आरक्षणसाठी आंदोलने सुरू केली आहेत. गेली अनेक वर्षापासून आदिवासी, धनगर असा वाद सर्वत्र पाहायला मिळत आहे. धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करा. या मागणीसाठी धनगर समाज वेगवेगळ्या स्तरवर आंदोलने करत आहे. तर आदिवासींमध्ये धनगरांचा समावेश करू नका .या मागणीसाठी आदिवासी समाजाने मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले आहेत. आदिवासी समाजाची जीवन पद्धती आणि त्यांची संसृती रूढी परंपरा चाली_रीती ह्या वेगळ्या असल्याने धनगर समाजाचा कधीच आदिवासी समाजामध्ये समावेश करता येणार नाही .हे वेळोवेळी सिद्ध झाले असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत धनगर समाजाच्या काही नेत्यांसोबत अतिथी गृहावर बैठक झाली या मध्ये धनगर समाजाला आदिवासी समाजाचे आरक्षण लागू करण्या संदर्भात काही निर्णय घेण्यात आले आहे. 


        कर्नाटक ,झारखंड,बिहार, तेलंगणा ,या राज्यांमध्ये धनगर समाजाला कस आरक्षण दिले त्यांचा अभ्यास करणार आहे , समितीद्वारे अभ्यास करून तो अहवाल देशातील अधीवक्त्यांना पाठवला जाणार आहे. देशाच्या अधीवक्त्या कडून मत मागवून घेत. त्यांचा वेगळा अहवाल मागवला जाणार,निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली. आरक्षण मिळेपर्यंत आदिवासी समाजाचे लाभ धनगर समाजाला मिळतील असे काही निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आल्याने महाराष्ट्रतील सर्वच आदिवासी समाजाच्या भावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत. देशभरासहित महाराष्ट्रतील आदिवासी समाज हा वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून संघटित झाला आहे.आदिवासी समाज म्हणून हा समाज जागृत झालेला आहे. मणिपूर राज्यात आदिवासी महिलांवर जो अन्याय,अत्याचार झाला त्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभर आदिवासी समाज रस्त्यावर आला होता. 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने आदिवासी समाज बांधव एकत्र आला होता. हे अनेक वेळा महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे.सरकारने आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर मोठ्या बहुसंख्येने आदिवासी समाज बांधव रस्त्यावर येतील.

   आदिवासी समाज आरक्षणाच्या प्रश्नावर रस्त्यावर आल्यास रज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.अशी परिस्थिती राज्यात निर्माण होईल.महाराष्ट्र सरकारने आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लावावा .आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला.तर लाखोंच्या संख्येने आदिवासी बांधव रस्त्यावर येतील. त्याची सुरुवात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिकारक राया ठाकर यांची जन्म भूमी असलेल्या अकोले तालुक्यातून होईल असा इशारा अकोले येथून मा.उपसभापती मारुती मेंगाळ यांनी दिला आहे. 


आ. गोपीचंद पडळकर यांची मागणी चुकीची.- मारुती मेंगाळ

       धनगर व धनगड या दोन भिन्न जाती आहेत. त्यामुळे धनगरांना अनुसूचित जमातीत आरक्षण देता येणार नाही .असा अहवाल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने शासनाकडे दिलेला आहे. आदिवासी समाजाची संस्कृती,परंपरा, नीतिमूल्ये, राहणीमान, जीवनशैली भौगोलिक परिस्थिती तसेच विशिष्ट भूप्रदेशात वास्तव्यास असलेला व स्वतंत्र बोली भाषा असलेला समाज आहे. आदिवासींची संस्कृती ही धनगर समाजाशी अजिबात मिळती जुळती नाही.आदिवासी समाजाचे रितीरिवाज ,रूढी परंपरा,भाषा,जीवनशैली स्वंतत्र आहे. आदिवासी समाज व धनगर समाज हे दोन वेगवेगळे समाज आहेत.आदिवासी समाजाचा व धनगर समाजाचा कुठल्याही बाबतीत ताळमेळ बसत नाही.धनगर समाजाचा आदिवासी समाजामध्ये कोणत्याही परिस्थितीत समावेश करता येणार नाही.हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस च्या.अहवालातून दिला असून सुद्धा धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे .हे योग्य नसून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम पडळकर करत असल्याची टीका मारुती मेंगाळ यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर.. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com

संपादक: सहदेव जाधव

(बी ए डी एल एल अँड एल डब्ल्यू)

संपर्क : rajyogmanas770 @gmail.com







Comments

Popular posts from this blog

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच