बिऱ्हाड मोर्चा म्हणजे फक्त स्टंटबाजी: सुहास ब्राम्हणे

बांधावर जावून धान्य का वाटले नाही..ॽ फक्त चर्चेत राहण्यासाठी उठाठेव- सुहास ब्राम्हणे राहाता दि.१२ प्रतिनिधी - शेतकऱ्यांच्या बांधावर जावू न शकलेल्या स्वयंघोषित पुढाऱ्यांनी काढलेला बिऱ्हाड मोर्चा म्हणजे फक्त स्टंटबाजी होती. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना जे काही देवू शकले नाहीत त्यांना युती सरकरच्या आनंदायी शिध्यावर बोलण्याचा नैतिकही अधिकार नाही. शेतकऱ्यांचा एवढाच कळवळा असेल तर बांधावर जावून धान्य का वाटले नाहीॽ असा सवाल भाजयुमोच्या अनुसूचित जाती जमाती सेलचे सरचिटणीस सुहास ब्राम्हणे यांनी केला. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सुहास ब्राम्हणे यांनी म्हणले आहे की, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नूकसान झालेल्या शेती पीकांचे पंचनामे पूर्ण केले आहेत. यापूर्वी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शिंदे फडणवीस सरकारने मदतही जाहीर केली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचा पहिला टप्पा मिळाला आहे. नंतर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचे आश्वासित करण्यात आले असून, सरकारने निकष बदलून सर्व म...