मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडे बाळासाहेब मुरकुटे यांची नेवास्यासाठी महत्वाची मागणी

अतिवृष्टी ग्रस्त पाच महसूल मंडलाचा समावेश करुन शेतकऱ्यांना भरपाई द्या:मा.आ.मुरकुटे मागील वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांचा खरीप व रब्बी हंगाम वाया गेला. राज्य सरकारने अशा बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे केले. त्यानुसार तालुक्यात आठ पैकी तीन महसूल मंडलात भरपाई जाहिर झाली. मात्र पाच महसूल मंडलातील शेतकरी यापासून वंचित राहिले अशा वंचित शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची मा. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भेट घेऊन निवेदन दिले आहे. नेवासा तालुक्यातील सर्व महसूल मंडलात मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे तालुक्यात आठ महसूल मंडलात सारखाच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे १०० टक्के पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे महसूल व कृषी विभागाकडून रितसर पंचनामे होऊन तालुक्यात ७० हजार शेतकऱ्यांचे ५१ हजार १६५ हेक्टर शेतीवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे अशा बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे काम आठ पैकी तीन म...