विरोधक एकवटले गणेश वर विजय मिळवत शिर्डी विधानसभा काबीज करण्याची दर्पोक्ती:

गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक: पराभव कुणाचा विखेंचा की कोल्हेंचा 



संपादकीय विश्लेषण / सहदेव जाधव  

गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अखेर विखे विरोधकांची महत्वाकांक्षा पूर्ण झाली. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विखेंचा पराभव म्हणजे थेट जसे काही पांडवांकडून कौरवांनी इंद्रप्रस्थ जिंकल्याचा आनंद आज विखे विरोधकांना झाला. आमदार निलेश लंके तर थेट पारनेर वरून आपली कामे सोडून शिर्डीत दाखल झाले. परंतु हा विजय नक्की कुणाचा समजावा याचे देखील विवेचन होणे गरजेचे आहे. 

        गणेश सहकारी साखर कारखाना हि निवडणूक तशी कोल्हे आणि विखे यांच्यातील लढाई... परंतु संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात, श्रीरामपूरचे करण ससाणे, सचिन गुजर, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, दंडवते, त्याच बरोबर सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते यांनी कारखान्याचे हीत एका बाजूला ठेऊन फक्त विखेंचे पानिपत हा एकच अजेंडा समोर ठेवला. व याचे सर्व सूत्र हि संगमनेरच्या हाती सोपवण्यात आली. संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी मिळालेल्या संधीचे सोनं करून घेतले व सर्व विखे विरोधकांनी आज राहात्यात दिवाळी साजरी केली. ही दिवाळी साजरी होत असताना विखे पिता पुत्रांना एक अंदाज नक्की आले असेल की 'बेगानी शादी मे, अब्दुल्ला दिवाना' आपला पराभव करण्यासाठी एक दोन तीन नव्हे तर स्वकीयांसह तब्बल जिल्ह्यातील डझनभर नेते उभे होते, यात पडद्याच्या आडून बरेच जण दोर ओढायला सावध होते. पण आज खरे तर विखे पॅटर्न अपयशी ठरला का..?  गणेश सहकारी साखर कारखाना हा २०२४ विधानसभेची रंगीत तालीम होती. यात थोरातांनी विखे विरोधकांची चाचपणी केली, तर विखेंनी त्यांच्या निष्ठावंतांची चाचपणी केली जी चूक झाली ती सावरण्याची संधी गणेश ने विखेंना दिली आहे. 

       निलेश लंके हे दक्षिणेला काबीज करण्याची तयारी करत आहे. यासाठी ते दक्षिणेला देखील भविष्यात हाच पॅटर्न राबवणार असे दिसते आहे. गणेश कारखान्याच्या निवडणुकीत सोशल मिडिया च्या माध्यमातून कोल्हे थोरातांच्या पॅनलने आघाडी घेतली होती. सोशल मिडियाचा वापर ज्यास्तीत ज्यास्त प्रमाणात झाला. यात गणेश कारखाना आम्हीच कसे चालवू शकतो हे भासविण्याचा प्रयत्न झाला. यासाठी संगमनेर व संजिवनी कारखाना आम्ही किती उत्कृष्ठ पणे चालवतो तसा कारखाना कुणीच या जिल्ह्यात कारखाना चालवत नाही हे दाखवत सभासदांची दिशाभूल देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली. सोशल माध्यमांवर सर्व सामान्य सभासदांनी विश्वास दाखवत कोल्हेवर सहानुभूती दाखवली गेली. गाव बैठका घेताना देखील मोठी जाहिरात थोरात कोल्हेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून करुन आणली. या यशात स्थानिक पोर्टल व युट्युब चॅनल चा देखील खारीचा वाटा आहे. एकीकडे सोशल मिडियाचा वापर करत प्रभाताई घोगरे व विवेक कोल्हे यांना हिरो दाखविण्याचा प्रयत्न झाला तर विखे परीवारास मात्र मोठा हुकुमशहा असल्यासारखे व्हिलन दाखवून आम जनतेला मुळ विषयापासून बाजूला करण्यास यश मिळवले आहे.



        प्रथमच जनसेवा कार्यालय निवडणूकीच्या नियोजनातुन अपयशी ठरले आहे. तर यशोधनची व संजीवनी ची यंत्रणा शेवट पर्यंत सक्रीय राहत यश खेचून आणले आहे. एकंदरीत ही सर्व निवडणूक बाळासाहेब थोरात यांनी विखे परिवाराचे राज्यात वाढलेले वर्चस्वाला कानखीळ बसविण्यासाठी घडू घातली. तर कोल्हेंना काॅंग्रेसचा हात देऊन भाजपापासून दूर नेण्याचा कुटील डाव थोरातांचा होता. त्यात ते संपूर्ण पणे यशस्वी झाले. विखे पाटील प्रथमच मोठ्या पराभवाला सामोरे गेले आहे. यात विखे पाटील नक्कीच चुक सुधरुण घेऊन विरोधकांचे दात घशात घालतील. विखे विरोधकांना विखे परिवाराबाबत किती पोटसुळ होता हे कालच्या विजयी सभेत सर्व महाराष्ट्राने बघितले आहे. 

        यावेळी थोरात कोल्हे गटाच्या प्रत्येक सभेत हुकुमशहा, दहशत, दहशतीचे झाकण, असे मुद्दे मांडण्यात आले. हे मुद्दे खोडण्यासाठी विखे गटाकडून कुणीही प्रयत्न केला नाही. किंबहुना विखे यंत्रणेने विरोधकांना गंभीरतेने घेतले नाही. राज्यात विखे पॅटर्न चा बोलबाला आहे आणि या यंत्रणेला प्रथमच पराभावाची नामुष्की पत्करावी लागली आहे. यात चूकीची सुधारणा करणं देखील गरजेचे आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघासाठी भविष्यात स्वकियांसह विरोधक देखील विखें विरोधात ताकद देऊ शकतात हे कालच्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे.

        आता या पराभवाचा अभ्यास नक्की केला जाणार सर्वच्या सर्व चुका दुरुस्त होणार परंतु भविष्यात याचा त्रास ठरल्याप्रमाणे कोल्हेंना नक्की होणार. गणेश कारखान्याची निवडणूक ही कोल्हेंची राजकीय आत्महत्या ठरणार आहे तर थोरातांना देखील यापुढील काळ संघर्षाविना नाही. त्यामुळे गणेश चा पराभव विखे पचवतील देखील पण विखे विरोधकांना हा विजय पचनी पडेल असे वाटत नाही. कालच्या विजयी सभेवरुन एकच लक्षात येते की विखे विरोधक 'बलून' मधून अंतराळात झेप घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे. तो बलून किती दिवस हवेत लहरत ठेवेल हे संगमनेरकरांनाच माहिती आहे. त्यामुळे कोल्हे ना आता थोरातांचा बलून किती दिवस साथ देईल हा देखील विश्लेषणाचा विषय ठरणार आहे. त्यामुळे कोल्हें चा या निवडणुकीत विजयी रुपी पराभव झाला आहे. असो या गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या माध्यमातून विखे यंत्रणेला चुका सुधारून घेण्याची संधी मिळाली आहे.  

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर.. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com.. 

संपादक : सहदेव भिकाजी जाधव (B.A.D.L.L & L.W) संपर्क: rajyogmanas770@gmail.com/ 95455290

52

Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच