संगमनेर भाजपात उभी फूट पडण्याची श्यक्यता सर्वसामान्य कार्यकर्ता दुर्लक्षित होत असल्याची खंत

विखे हाच आमचा पक्ष व विखे हेच आमचे सरकार: पण चांडाळ चौकटीला वैतागलो

संपादकीय 

 

भाजप नेतृत्वाला उद्विग्न कार्यकर्त्याची आर्त साद 

         संगमनेर तालुक्यात काही पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीला सर्वसामान्य कार्यकर्ता वैतागून गेला असून लवकरच पर्याय शोधत असल्याचे खात्रीशीर वृत्त राजसत्ता न्यूजच्या हाती लागले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून संगमनेर भाजपात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु काही पदाधिकाऱ्यांच्या चमकोगिरीला कार्यकर्ते पुरते वैतागले आहेत. दिलेले कामे वरिष्ठान पर्यंत जाणून बुजून पोहचवले जात नसल्याचा आरोप काही कार्यकर्ते खाजगीत बोलताना करत आहेत. काही जुने जाणते कार्यकर्ते मात्र या फंदात न पडता अलिप्त राहणे पसंद करत आहेत. संगमनेर तालुक्यात आमदार बाळासाहेब थोरात यांचा एक हुकमी अंमल आहे. तो छेदने इतके ही सोपी गोष्ट नाही. त्यातच राज्याच्या राजकारणात ज्या पद्धतीने उलथापालथ झाली आहे ती बघता तालुक्यात देखील मोठा भूकंप होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. काही पदाधिकारी जनतेत जाऊन पक्ष्याची भूमिका मांडत आहेत तर काही मात्र संगमनेरात ए सी ची हवा खात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मागे ओढण्याचा प्रयत्न करत आहे. 

         या एअर कंडिशन कार्यकर्त्यांचा वरिष्ठानी बंदोबस्थ केला नाही तर पक्षात उभी फूट पडण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. विखे पाटील महसूलमंत्री झाल्यानंतर अनेकांनी नाममात्र भाजपात प्रवेश पडद्या आड करून घेतला. साहेबांच्या मागे पुढे फिरत व कधी कधी आपणच सचे कार्यकर्ते असल्याचे भासवण्यात उत्तीर्ण झाले. साहेब संगमनेरात आल्यावर ऍक्टिव्ह राहणारे व इतर वेळेत ए सी मध्ये जाऊन बसणारे स्वतःला च महसूलमंत्री समजत आहेत, अशी कार्यकर्त्यांची व विखे समर्थकांची भूमिका आहे. पिढ्यानपिढ्या विखे परिवारावर प्रेम करणारा मोठा कार्यकर्त्यांचा संच संगमनेर शहरासह ग्रामीण भागात देखील आहे. विखे हाच आमचा पक्ष व विखे हेच आमचे सरकार असे मानणारा सर्व सामान्य विखे समर्थक आहेत परंतु त्यांना आज या गटबाजीमुळे कपाळावर हाथ मारण्याची वेळ आली आहे. 


          गटबाजीचे खरे सुत्रधार शोधून काढणं वरीष्ठांची कसब पणाला लागणार आहे. काहीजन पूर्वीचे पक्ष सोडून भाजपामध्ये आले. ज्या पक्षात होते तेथेही प्रचंड गटबाजी हे कार्यकर्ते करत होते. हे सगळ्या कार्यकर्त्यास ज्ञात आहे. आता इकडे येऊन ही या लोकांची हीच परिस्थिती दिसते आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मागे खेचने व निष्ठावंत कार्यकर्त्याची वरिष्ठांकडे चुगली लावणं, पक्ष वाढीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांस बदनाम करणं या सर्व कारणांमुळे सर्व साधारण कार्यकर्ते व पदाधिकारी विटलेले आहे. ही चार दिशांची चौघां जणांची चांडाळ चौकडी बाजूला लवकर झाली नाही तर सध्या भाजपा मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर आहे.. आणि लवकरच कुणी अजितदादा पवार तर कुणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता आहे. पठार भागातील एका भाजपा पदाधिकारी तर थेट अजितदादा पवार व धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात भाजपात मोठा भुकंप होणार असल्याचे चित्र दिसत आहे. चांडाळ चौकडी ला मीच महसुलमंत्री असा बडजाव करत असल्याने आम्ही या गटबाजीला कंटाळून गेलो आहोत असे एका पदाधिकारी आमच्याशी संवाद साधताना बोलत होता. 

               आता भाजपाचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर.. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com.. 
संपादक : सहदेव भिकाजी जाधव (B.A.D.L.L & L.W) संपर्क: rajyogmanas770@gmail.com/ 9545529052



Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच