बेलापुर धरण भविष्यातील धोक्याची घंटा. पाटबंधारे विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

बेलापूर धरणाच्या इंटेक वेलची दुरुस्तीची मागणी.

प्रतिनिधि_सतीश फापाळे 

    (बेलापूर) अकोले तालुक्यातील पठार भागासाठी जीवनदायनी म्हणून संबोधले जाणारे बेलापुर येथील धरणाच्या मोरिवरिल इंटेक वेलची दुरवस्था झालेली आहे.येथील धरणातील पाणी सोडण्याच्या मोरीच्या इंटेक वेलची संरक्षण भिंत पडली असल्याने भविष्यात पाणी प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असून भविष्यात बेलापूर धरण धोक्याची घंटा बनले आहे.

    पठार भागातील बेलापूर येथील धरण जाचकवाडी, पवारवाडी , गोपाळवाडी, बेलापुर, चैतन्यपुर, भक्ताचीवाडी, बदगी, जांभळे, ब्राम्हणवाडा,काळेवाडी अशा विविध गावांच्या शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाचे मानले जात असून हे पठार भागासाठी जीवनदायनी म्हणून संबोधले जाते आहे.पावसाळा ऋतू सुरू झाला आहे.मात्र पावसाने दडी मारली असली तरी बेलापुर धरणावरील पाणी सोडण्याच्या मोरीवरील इंटेक वेलची संरक्षक भिंत कोसळली आहे. वारंवार पाटबंधारे विभागास या बाबत माहिती ग्रामपंचायतच्या माध्यमातून देण्यात आली आहे.पत्र व्यवहार देखील करण्यात आले आहे.परंतु पाटबंधारे विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची नागरिक चर्चा करत आहे.


     या विभागाच्या पाणलोट क्षेत्रात वनविभाग तसेच कृषी विभागाच्या माध्यामतून उत्तम प्रतीची विविध कामे झाली असल्याने पर्जन्यमान देखील या विभागात चांगल्या प्रतीचे आहे. हे धरण पावसाळा सुरू झाला की लवकरात भरून ओसंडून वाहत असते.तर उन्हाळा ऋतूमध्ये याच धरणातून या मोरीद्वारे व इंटेक वेलच्या सहाय्याने दोन तीन वेळा खालील गावांसाठी रोटेशनद्वारे पाणी सोडले जाते.या पाण्यावर शेतीपिके जगविली जातात तर नागरीकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील मिटवला जातो.परंतु हा इंटेक वेल नादुरुस्त आहे.तर यांची संरक्षक भिंत कोसळली असल्याने भविष्यात धरणात पाणी आल्यानंतर संपूर्ण भिंत कोसळू शकते.तर ही इंटेक वेलची मोरी बंद होण्याचा शक्यता आहे.त्यामुळे भविष्यात पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्तिथी निर्माण होऊन पाणी संकट निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

वारंवार पाट बंधारे विभागास धरणावरील मोरीच्या पाणी सोडण्याच्या इंटेक वेलची भिंत पडली असल्याचे कळविले आहे.विनंती अर्ज देखील केले आहे.परंतु सबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.भविष्यात धरणाखालील गावांना पाण्याचा तुटवडा निर्माण होईल.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊन पिकांचे नुकसान होईल.सबंधित संरक्षक भिंतीचे दुरुस्तीचे काम होणे गरजेचे आहे.पावसाने सद्ध्या जरी दडी मारली असली तरी पाऊस पडणार आहे.पाऊस पडल्यावर धरण भरणार आहे.सबंधित भिंत नादुरुस्त असली तर पुढे पाणी सोडता येणार नाही.पाण्याच्या लाटेने उरलेली भिंत देखील खोसळनार आहे.त्यामुळे अडचणींचा सामोरा करावा लागणार आहे. जर हे काम न झाल्यास तीव्र आंदोलने करून जबाबदार आधिकारी निलंबित करण्याची मागणी करण्यात येणारं आहे.
          (ग्रा. प.सदस्य.राहुल लांडे_युवासेना अकोले)

     पाटबंधारे विभागाने पाऊस सुरू होण्यापूर्वी या पाणी सोडण्याच्या मोरीवरील इंटेक वेलच्या यंत्राच्या संरक्षण भिंतीची दुरुस्ती करावी करावी अशी मागणी सरपंच ज्योतिताई जगताप, म्हतू जगताप ,रभाजीनाना फापाळे, प्रकाश फापाळे, हौशिराम गोपाळे,राहुल लांडे,सतीश गाजरे,अजित फापाळे,सुरेश खेबडे,सुभाष महाले ,प्रवीण महाले,सुधीर काळे,नामदेव काळे,सुरेश फापाळे,बाळासाहेब फापाळे , प्रविण महाले,गणेश फापाळे आदी ग्रामस्थांनी केली आहे.तर या मोरीच्या इंटेक वेलच्या संरक्षक भिंतीचे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर न झाल्यास आंदोलनाचा ईशारा प्रकाश फापाळे यांनी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर.. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com.. 

संपादक : सहदेव भिकाजी जाधव (B.A.D.L.L & L.W) संपर्क: rajyogmanas770@gmail.com/ 9545529052



Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच