श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर सर्व स्तरांतून टीकेचा भडिमार
संभाजी भिडे गुरुजी म्हणजे हिंदुत्वाची धगधगता ज्वालामुखी
भिडे गुरुजींना अटक करणे म्हणजे साक्षात सूर्याला गिळायला निघाल्यासारखे
शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर सर्व स्तरांतून टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. संभाजी भिडे गुरुजीनी वक्तव्य करण्याचं आणि त्यावरून वाद होण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांनी याआधीही अशी काही वक्तव्यं केली आहेत. मनोहर भिडे यांचा जन्म १० जून १९३३ रोजी सांगली, महाराष्ट्र येथे झाला आणि आज त्यांना संभाजी भिडे किंवा गुरुजी म्हणूनही ओळखले जाते. पुणे, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, मुंबई आणि सातारा येथे संभाजी भिडे पूजनीय आहेत. आणि त्यांचे अनुयायी मोठे आहेत. संभाजी भिडे गुरुजी सांगलीत राहतात. त्यांचं वय 80 वर्षे आहे. त्यांचे मूळ नाव मनोहर असं आहे. भिडे यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी आहे. भिडे गुरुजी अनेक तरुणांचे हृदय सम्राट आहेत. भिडे गुरुजींना अटक सध्या तरी अश्यक्य आहे.
‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संघटनेची क्रेज सध्या तरुण वर्गात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यातच भिडे गुरुजी यांचे साधेपण तरुणांना भातो आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भिडे गुरुजी यांच्या धारकऱ्यांची संख्या मोठी आहे. भिडे गुरुजी याना प्रखर विरोध काँग्रेस वगळता कोणीही मनापासून करताना दिसत नाही. याआधी सावरकर बंधूंवर देखील काँग्रेस च्या काही नेत्यांनी बरळ ओकली होती, मंग त्यावेळेस त्यांच्यावर गुन्हे दाखल का झाले नाहीत? अशी भावना देखील आज काहींच्या मनात उपस्थित होत आहे. काल उपमुख्यमंत्री यांनी ज्या पद्धतीने दोन्ही सभागृहात उत्तर दिली ती गुरुजींप्रती आत्मियता स्पष्ट करते. आणि असे अनेक हिंदू प्रेमी आहेत कि ज्यांच्या हृदयात भिडे गुरुजीं बद्दल आदरयुक्त सहानुभूती आहे.
- @ भिडे गुरुजी यांनी अद्याप पर्यंत गांधी इतिहास सांगितलं नाही म्हणजे ते देशद्रोही झाले का ?
- @ त्यांनी शिव छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू राजे यांचा इतिहास मराठ्यांच्या मस्तकात घातला तो देशद्रोह आहे का?
- @ आपला देश, आपला धर्म, आपली संस्कृती सांगितली म्हणजे देशद्रोह झाला का ?
- @ माझ्या माता भगिनीला तिच्या मस्तकावर कुंकू (टिकली) लावण्यास सांगितले तो देशद्रोह आहे का?
- @ काही नास्तिकांना गोमाता आहे.. गोहत्या करून गोमांस खाऊ नका हे सांगणं देशद्रोह आहे का ?
भारत स्वातंत्र्या पासून २०१४ पर्यंत हिंदू संस्कृतीला भगवा दहशतवाद दाखवण्याचा प्रयत्न काही नास्तिकांकडून झाला. हिंदू सणवार साजरे करताना संकुचित भावना निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. ती भावना आज नष्ट करत आज हिंदूं जागा झाला आहे. जागा झाला म्हणजे त्याने कोणत्याही दुसऱ्या धर्माला त्रास दिला नाही, पण हिंदू इतिहास मात्र जो लपवला गेला असेल तो ते सांगणार आहे. त्यामुळे भिडे गुरुजींनी कोणा बद्दल काय बोलले हे महत्वाचे नसून ते जे सामाजिक कार्य करतात ते कोणीही नाकारू शकत नाही. त्यांचा हिंदुत्वासाठी त्याग सर्वच बघत आहेत. त्यांनी आखलेली गड किल्ले संवर्धन मोहीम कौतुकास्पद आहे.
" छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ नावाची संघटना, तसेच कट्टर मराठा हिंदू धर्म, स्वतःच्या सनातनी हिंदुत्वावर आधारित संस्था सुरू केली. भिडे गुरुजी साधे अस्तित्व जगतात. ब्रह्मचर्यामध्ये ते मुक्त होतात. त्यांच्या जेवणाची व निवासाची सोय त्यांचे सहकारी (धारकरी) करतात. ते चप्पल घालत नाही आणि पांढरा धोती-कुर्ता घालतात. त्यागीचे जीवन त्यांच्या जीवनासारखेच असते. त्यांचे श्लोक अनेकांना आवडतात. जरी संभाजींचे व्यावहारिकपणे सर्व राजकीय पक्षांतील राजकारण्यांशी संबंध असले तरी, त्यांनी किंवा त्यांच्या संघटनेने कधीही राजकारणात सक्रिय सहभाग घेतला नाही.
संभाजी भिडे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनेकदा एकत्र फोटो काढण्यात आले आहेत. संभाजी भिडे यांचा पंतप्रधान केवळ गुरुजी असा उल्लेख करतात. पंतप्रधान मोदींसोबतच शिवाजी महाराजांचे पुत्र उदयनराजे भोसले यांचाही संभाजींना पाठिंबा आहे.भिडे यांना 2015 मध्ये पद्मश्री पुरस्कारासह शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तथापि, त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर आणि कृतींमुळे विविध स्तरातून टीकाही झाली आहे, अनेकांनी त्यांच्यावर जातीय आणि फुटीरतावादी राजकारणाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. शेवटी, संभाजी भिडे हे भारतीय राजकारणातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे, जे त्यांच्या उजव्या विचारांसाठी आणि जातीय हिंसाचारात कथित सहभागासाठी ओळखले जाते. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही योगदान दिले असले तरी त्यांच्या राजकीय हालचालींमुळे वाद आणि टीका होत आहे.
त्यामुळे असा हा तेजस्वी 'भास्कर' कुणाच्या गुलामांच्या तळहाताने झाकणार नाही. कारण त्याचे लाखों धारकरी तेजाचे किरणे बनून संरक्षणास समर्थ राहतील.
Comments
Post a Comment