साकूर ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी २०२२ कोण मिळवेल राजसत्ता
ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी २०२२: साकुर ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस वाढली, 'अफवाना ऊत'
संगमनेर वृत्तसंस्था: तालुक्यातील ३७ ग्रामपंचायत च्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या सर्व गावांचे गाव पुढारी आता निवडणुकीला सज्ज झाले आहेत. जो तो आपल्या गावात आपलाच पॅनल कसा लागेल यासाठी जीवाचं रान करत आहे. साकुर ग्रामपंचायत मध्ये मात्र सत्ताधारी व विरोधक यांच्यात चढाओढ बघायला मिळत आहे. उद्या म्हणजे दिनांक २८/११/२०२२ रोजी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. यात कोण कोण अर्ज भरेल हे कळेल पण पूर्ण चित्र हे ७/११/२०२२ रोजी स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत मात्र फक्त मी उभा राहील, नाही राहणार... याच चर्चा सुरु राहणार आहेत. काहीजण मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. तर काही जण मात्र उगाच आव आणत आकडून बसले आहेत. म्हणजे त्यांची अवस्था ही 'मी नाही त्यातली, आणि काडी लाव आतली'. अशी आहे. वेळेला मात्र सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. जवळ जवळ दोन्ही पॅनलचे सीट तयार झाले असून पुन्हा एकदा साकुर ग्रामपंचायत ही काका पुतण्यातील लढाई समजली जाणार आहे.
साकुर ग्रामपंचायत वर गेली ३० वर्षांपासून शंकर पाटील खेमनर व स्व. अशोक पाटील खेमनर यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यांच्या माध्यमातून गावाचा मोठा विकास झाला असल्याचे मत नागरिक मांडत आहेत. तर विरोधक देखील या विकासकामांना वरवरची मलमपट्टी असल्याचा आरोप करत आहेत. यामुळे ही निवडणूक मोठी प्रतिष्ठेची होणार आहे. आरोप प्रत्यारोपात हि निवडणूक गाजणार आहे. साकूरकरांचे देखील या निवडणुकीत कोण बाजी मारेल याकडे लक्ष लागून आहे.
साकूरकर या निवडणुकीत चुरस होणार हे मान्य करत आहेत. परंतु यासाठी सुभाष पाटील खेमनर यांनी स्वतः या निवडणुकीत उतरावे अशी मागणी काही ग्रामस्थ करत आहेत. शंकर पाटील खेमनर याना मात द्यायची असेल तर फक्त सुभाष पाटील खेमनर हेच एकमेव पर्याय असल्याचे बोलले जात आहे. स्वतः सुभाष पाटील असले तर नक्कीच फरक दिसेल असा विश्वास एका सुज्ञ मतदाराने बोलून दाखवला आहे.
पारावरच्या गप्पा देखील वाढल्या आहे. उलट्या सुलट्या चर्चा देखील ऐकायला मिळत आहे. अफवांचे पेव रोज फुटत आहे. संगमनेर तालुक्यातील बर्याच ग्रामपंचायत या आ. बाळासाहेब थोरात यांच्या गटाच्या ताब्यात आहे. परंतु किती ग्रामपंचायतींचा विकास झाला. व किती ग्रामपंचायती विकासाच्या नावाखाली फक्त डागडूजी केली हे जनता बघत आहे. विकासाची कामे जनतेसमोर सत्ताधारी मंडळींना मांडावीच लागतील पण विरोधकांना देखिल कोणती कामे किती उत्कृष्ट की निकृष्ट झालीत ते दाखवा लागेल. तशी जनता सुज्ञ आहे. योग्य प्रतिनिधी ते निवडून देतील. येत्या ७ डिसेंबर पर्यंत कोण कोण आपले भवितव्य आजमावणार आहे याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
राजसत्ता न्युज प्रत्येक गावातून विकास कामांचा पंचनामा मांडत आहे. यासाठी प्रत्येक गावातून इच्छुक उमेदवारांचे सामाजिक कार्य काय आहे ? आणि गावांसाठी काय योगदान आहे.? आपला जाहिरनामा काय आहे..? या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आपल्या समोर येत आहे. तेव्हा सज्ज रहा... 'कोण मिळवेल आपल्या गावातील राजसत्ता..!'
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे
उमेदवारी दाखल - 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर
छाननी - 5 डिसेंबर
अर्ज माघारी अंतिम मुदत - 7 डिसेंबर
चिन्हांचे वाटप - 7 डिसेंबर
मतदान - 18 डिसेंबर 2022
मतमोजणी - 20 डिसेंबर 2022
संपादक:सहदेव जाधव
9545529052
Comments
Post a Comment