वीजप्रश्नी कायम स्वरुपी तोडगा काढा - बाळासाहेब मुरकुटे
शेतकऱ्यांच्या वीज प्रश्ना बाबतीत कायम स्वरुपी तोडगा काढावा: मा.आ.मुरकुटे
मुंबई (राजसत्ता वृत्तसंस्था) मा.आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी 06/12/2022 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंञी देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली.
यावेळी मुख्यमंञी व उपमुख्यमंञी यांच्या लक्षात आणुन दिले की, आपले वीज कनेक्शन तोडु नये असे आदेश असताना देखील ,शेतकऱ्यांनी थकित वीज बील न भरल्यामुळे वीज तोडणी मोहीम वितरण कंपनीने हाती घेतली आहे.
याअनुषंगाने शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम तात्काळ थांबवावी , मागील वीजबील माफ करुन यापुढे नवीन वीज धोरणाचा अवलंब करावा, शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने १२ तास विद्युत पुरवठा मिळावा,सुधारीत दराने वीजबील आकारणी करावी, सोप्या पध्दतीने शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळावे, तसेच शेतकऱ्यांना वीजेसाठी सबसिडी देऊन वरील सर्व धोरणाची दि.१ जानेवारी २०२३ पासुन अमलबजावणी करावी याकरिता मा.आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले.*
बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा
संपादक: सहदेव जाधव
9545529052
Comments
Post a Comment