पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा व महिला मेळावा उत्साहात संपन्न.
वॉटर शेड ऑर्गनायझेशन संस्थेचे कार्य कृषी विभागाला दिशादर्शक ठरेल- अभिमन्यू काशीद
आष्टी प्रतिनिधी:- वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट पुणे यांच्या वतीने दांडेगाव तालुका भूम हे गाव संस्थेने दत्तक घेऊन कृषी विभाग जिल्हा उस्मानाबाद व भूम तालुक्याच्या कृषी विभागाच्या सहकार्याने गावामध्ये शेतकऱ्यांसाठी जलसंचय कार्यक्रमांतर्गत गावामध्ये माती व पाणी यावरती मोठ्या प्रमाणावर काम केले गेले. गावामध्ये ५० बोरवेलचे पुनर्भरण केले, त्याचबरोबर ५० शेततळे तयार करण्यात आले, ओढ्यावरती सिमेंट बंधारे बांधण्यात आले, तसेच जाळी बंधारे बांधण्यात आलेे, गावांमधील सामाजिक विकासासाठी महिलांना व पुरुषांना प्रशिक्षण देण्यात आले. अनेक बचत गट तयार करण्यात आले. तसेच परिसरातल्या गावाच्या प्रशिक्षण सहली चे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे गावाचा विकास होण्यास मदत झाली. यामध्ये शेतकऱ्यांचा श्रमदानाचा सहभाग होता परंतु या प्रकल्पाची मुदत संपत आल्याने झालेला बदल या वरती आधारित पौष्टिक तृणधान्य पाककृती स्पर्धा व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा कृषी अधीक्षक व नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प उस्मानाबाद अभिमन्यू काशीद यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, गटविकास अधिकारी ढवळशंकर साहेब, विस्तार अधिकारी वाघमारे साहेब, ह.भ.प.आसराजी आजबे महाराज, सरपंच पांडुरंग भोगील, प्रोजेक्ट मॅनेजर कांतीलाल गिते, सामाजीक विकास अधिकारी समीना पठाण मॅडम, मंडळ कृषी अधिकारी निखिल रायकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
अभिमन्यू काशीद म्हणाले की वॉटरशेड ऑर्गनायझेशन संस्था ही तीन वर्षापासून या गावांमध्ये काम करत आहे महिला सक्षमीकरणावरती सुंदर काम केलेला आहे महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे यावरून हे लक्षात येते त्याचबरोबर तृणधान्ये हे सुपर फूड आहे ते कुठल्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही तेव्हा त्याचाही उपभोग शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे कारण त्यामुळे आपले आरोग्य व्यवस्थित राहील त्याचबरोबर बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करेल या पुढील काळात सुद्धा संस्थेला सहकार्य करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत
उपविभागीय अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितले की बाजारभाव पिकांचे मूल्यवर्धन करण्याचे काम या स्पर्धेच्या माध्यमातून होईल भारत सरकारने पौष्टिक तृणधान्ये वर्ष घोषित केल्यामुळे तृणधान्ये वर्ष हा फक्त इव्हेंट ठरणार नाही तर त्याचे उत्पादन वाढवून दीर्घकाळासाठी त्याचा आहारातही वापर वाढेल
या कार्यक्रमांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता यावेळेस सहभागी महिलांना बक्षीस देण्यात आले तसेच प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढण्यात आले व त्यांनाही प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दांडेगाव चे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामविकास समिती त्याचबरोबर वॉटरशेड चे सर्व सदस्य व गावकरी यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय ठरली या प्रास्ताविक प्रोजेक्ट मॅनेजर कांतीलाल गिते यांनी केले तर आभार समीना पठाण मॅडम यांनी मानले कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक अमोल जगताप यांनी केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com
संपादक : सहदेव भिकाजी जाधव (B.A.D.L.L & L.W)
संपर्क: rajyogmanas770@gmail.com/ 9545529052
Comments
Post a Comment