पावसा अभावी चार एकर सोयाबीन पिकावर शेतकऱ्यानं फिरवला नांगर.

पाऊसा अभावी हतबल शेतकऱ्यांने सोयाबीन पिकावर फिरवला नांगर



प्रतिनिधी_सतिश फापाळे 

     संगमनेर तालुक्यातील पठार भागात पावसाने पाठ फिरवली असल्याने खरीप हंगामातील विविध पिके कोमेजून गेली आहे.यात प्रामुख्याने काही सोयाबीन पिके करपली आहे.तर काही जळून गेली आहे.तर काही पिकांना शेंगाचं आल्या नाहीत.अशातच पदरी निराशा पडलेल्या नांदूर गावच्या युवा शेतकऱ्याने नाईलाजास्तव चार एकर सोयाबीन पिकावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगर फिरवत सोयाबीन पिक नष्ट केले आहे.

     नांदूर_खंदरमाळ गावचे युवा शेतकरी सुरेश गोपीनाथ भागवत या शेतकऱ्याने जून महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसावर आपल्या शेतीची मशागत करून सोयाबीन पिकाची पेरणी केली होती.हे पीक सुरवातीच्या पावसावर डौलदार उतरून देखील आले होते.सोयाबीन पिकाला उभारी मिळाल्या नंतर त्यात मध्यंतरी दिलासादायक पाऊस झाला.त्यावर सोयाबीन पिकाची खुरपणी करून खते टाकली गेली. कीटक नाशकांची फवारणी केली.मोठ्या काबाड_कष्टाने पिकवलेले हे सोयाबीन पीक मोठ्या जोमात होते.


     सोयाबीन पिक ऐन बहरात आले.फुलाची झडण झाली.थोड्या बहुत प्रमाणात शेंगा देखील दिसू लागल्या होत्या.परंतु वरून राजाने ऐनवेळी पाठ फिरवली.यात होत्याचे नव्हते झाले.पावसा अभावी सोयाबीन पीक करपू लागली.काही सोयाबीन पिकाला शेंगाच आल्या नाही.तर काही जळून गेली.अशातच लाखो रूपये खर्च करूनही पीक हाती न आल्याने हतबल झालेल्या युवा शेतकरी सुरेश गोपीनाथ भागवत यांनी पदरी पडलेल्या नैराशातून चार एकर सोयाबीन पिकावर नांगर फिरवत पिकच नष्ट केले आहे.त्यात उभा झालेला कर्जाचा डोंगर कसा पार करायचा या चिंतेने चिंताग्रस्त झाला आहे.

    यादरम्यान पठार भागातील बहुतांश खरीप हंगामातील पिके जळून खाक झाली आहे.बऱ्याचशा शेतकरी बांधवानवर उभ्या पिकावर रोटर, नांगर फिरवण्याची वेळ आली आहे.तरी देखील या नुकसानग्रस्त झालेल्या पिकांचे प्रशासन विभागाने पंचनामे न केल्याने शेतकऱ्याचे जखमेवर मिठ चोळले असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहे.आता तरी प्रशासने जागे होत.नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांचे पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी.अशी मागणी पठार भागातील शेतकरी बांधव करतं आहे.

       


नांदूर गावचे शिवारात वडिलोपार्जित शेतजमीन कसून माझे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे.सर्वच क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केली होती.लाखो रुपये खर्च करूनही पावसा अभावी सोयाबीन पीक जळून गेले आहे.या पिकासाठी झालेला खर्च निघू शकत नाही.चार एकर सोयाबीन पिक चांगले आले आले होते.परंतु पावसाने दडी मारल्याने उभे पीक जळाले आहे.त्यातून काहीच हाती लागणार नसल्याचे चित्र स्पष्ट दिसून आले.मोठ्या आशेने काबाडकष्ट करून उभे केलेल्या पिकाने पदरी निराशा पडली. उघड्या डोळ्यांन समोर पीक जळत असल्याने पाहवत नव्हते. काळजावर दगड ठेवत ट्रॅक्टरच्या साहाय्याने चार एकर सोयाबीन पीक नांगरून नष्ट केले आहे. शासनाने सर्वच शेतकरी बांधवांचे पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करून दिलासा द्यावा. 

       (_युवा शेतकरी सुरेश गोपीनाथ भागवत नांदूर _खंदरमाळ)

 मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर.. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com


संपादक: सहदेव जाधव

(बी ए डी एल एल अँड एल डब्ल्यू)

संपर्क : rajyogmanas770 @gmail.com

Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच