Posts

राहूरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फुस लाऊन पळविले: आरोपी गजाआड

Image
दोन मुलांच्या बापाने अल्पवयीन मुलीला फुस लाऊन पळविले: पुणे येथून जेरबंद  Google Source  श्रीरामपूर प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्याला पुणे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असून 2 मुलांचा बाप असणाऱ्या आरोपी ताहेर यांच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, दि. 19 तारखेला मालुंजा परिसरातून एक 16 ‘वर्षांची अल्पवयीन मुलगी सकाळी 10 वा. आपल्या राहात्या घरातून बेपत्ता झाली होती. सदर मुलीचा शोध सर्वत्र घेतल्यानंतर ती आढळली नाही म्हणून 20 तारखेला तिच्या घरच्यांनी पोलिसांनी तक्रार दिल्यावरून भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.          सदर मुलीचा शोध घेत असताना पोलिसांना समजले की, 2-3 वर्षांपूर्वी सदर मुलीच्या घरचे हे पुण्याला वीट भट्टीवर काम करायला राहत होते. त्याठिकाणी एक टेम्पो चालक ताहेर शेख, वय – 28 याच्याशी या कुटूंबाची ओळख झाली. त्यानंतर सदर मालुंजे येथील कुटूंब पुण्याहून पुन्हा मालुंजा येथे आले. पुणे येथून हा टेम्पो चालक घटना घडली त्...

केंद्रीय निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी मोठा धक्का

Image
  राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केल्यानंतर निवडणूक आयोग राष्ट्रवादीबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे. आता पक्षाला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मुंबई, 14 एप्रिल :   केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीसह, ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला. तर दुसरीकडे आपला मात्र राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या धक्क्यातून पक्ष सावरत असतानाच आता निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्लीत देण्यात आलेला बंगला काढून घेतला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचा  राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. त्यानंतर आता  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिल्लीत देण्यात आलेला बंगला देखील काढून घेतला जाण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकारकडून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआयला त...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडे बाळासाहेब मुरकुटे यांची नेवास्यासाठी महत्वाची मागणी

Image
अतिवृष्टी ग्रस्त पाच महसूल मंडलाचा समावेश करुन शेतकऱ्यांना भरपाई द्या:मा.आ.मुरकुटे        मागील वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांचा खरीप व रब्बी हंगाम वाया गेला. राज्य सरकारने अशा बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे केले. त्यानुसार तालुक्यात आठ पैकी तीन महसूल मंडलात भरपाई जाहिर झाली. मात्र पाच महसूल मंडलातील शेतकरी यापासून वंचित राहिले अशा वंचित शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची मा. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भेट घेऊन निवेदन दिले आहे.         नेवासा तालुक्यातील सर्व महसूल मंडलात मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे तालुक्यात आठ महसूल मंडलात सारखाच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे १०० टक्के पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे महसूल व कृषी विभागाकडून रितसर पंचनामे होऊन तालुक्यात ७० हजार शेतकऱ्यांचे ५१ हजार १६५ हेक्टर शेतीवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे अशा बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे काम आठ पैकी तीन म...

"लव जिहाद', धर्मांतराचे प्रकार झाल्यास त्या त्या भागातील पोलिस निरीक्षक जबाबदार

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात पालक मंत्र्यांच्या उपस्थित शांतता समितीची  बैठकीचे आयोजन       अहमदनगर प्रतिनिधी:   "लव जिहाद', धर्मांतराचे प्रकार झाल्यास त्या त्या भागातील पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शुक्रवारी ( 7 एप्रिल ) ला दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.        खासदार डॉ. सुजय विखे, आमदार लहू कानडे, आमदार बबनराव पाचपुते, आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी शेखर, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी आदी यावेळी उपस्थित होते..        विखे पाटील म्हणाले की, गुन्हेगारांच्या मिरवणुका काढल्या जातात, अशा गुन्हेगारांच्या मिरवणुका काढण्यापेक्षा गाढवावरून त्यांच्या मिरवणुका काढा त्यामुळे चांगला परिणाम होईल. मोक्का लावलेले गुन्ह...

काँग्रेसला अडचणीची ठरेल अशी भूमिका आता शरद पवार घेत आहे: राऊतांचं वक्तव्य

Image
शरद पवारांच्या भूमिकेमुळे मविआत फूट? राऊतांचं मोठं वक्तव्य म्हणाले... शरद पवारांच्या जेपीसीसंदर्भातील वक्तव्यामुळे मविआत फूट पडणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.  मुंबई, 8 एप्रिल:   अदानी प्रकरणात जेपीसी स्थापन करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती. मात्र काँग्रेसला अडचणीची ठरेल अशी भूमिका आता शरद पवार घेताना दिसत आहेत. अदानी प्रकरणात जेपीसी स्थापन करण्याची काही गरज नाही, त्यांना जाणून-बाजून टार्गेट केलं जात असावं असं वाटतं असं पवार यांनी म्हटलं आहे. यावर आता काँग्रेस काय भूमिका घेणार ? शरद पवारांच्या वक्तव्यामुळे मविआत फूट पडणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे शरद पवारांच्या भूमिकेत काही नवीन नाही, पवारांच्या भूमिकेमुळे मविआत फूट पडणार नाही. मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. शरद पवारांनी फक्त जेपीसी संदर्भात पर्याय सांगितलल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही जेपीसीचा अग्रह धरला होता असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर देखी...

अकोले बाजार समितीची निवडणूक जाहीर १५९ अर्ज दाखल

Image
आजी माजी आमदार डॉ. किरण लहामटे आणि वैभव पिचड यांच्यात पुन्हा एकदा चुरस    अकोले प्रतिनिधी: अकोले बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. अकोले बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यात आजी माजी आमदार यांच्यात पुन्हा एकदा चुरस अनुभवायला मिळणार आहे. डॉ. किरण लहामटे आणि वैभव पिचड या आजी-माजी आमदारांनी उमेदवारी अर्ज भरल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे. अकोले कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूकीत पहिल्यांदाच शेतकऱ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळाल्याने शेतकरीसुद्धा या निवडणुकीत आपले नशीब आजमावू शकतात. अकोले बाजार समिती निवडणुकीत अखेरच्या दिवशी सोमवारी तब्बल १५९ अर्ज दाखल झाले.        या निवडणुकीतून १८ सदस्य निवडले जाणार आहेत. या निवडणुकीत मतदारांची संख्या ही २ हजार ४७० एवढी आहे. निवडणुकीसाठी ३ एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. या निवडणुकीसाठी एकूण १५९ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जाची छाननी ५ एप्रिल रोजी होणार आहे. तसेच २० एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. ३० एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतमोजणी होऊन निक...

अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले: गंभीर आरोप

Image
दीपाली सय्यद यांच्याबरोबर रामदास आठवले आणि नितीन गडकरी यांचे आर्थिक संबंध   अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे, असा दावा त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांच्याशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. अहमदनगरात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाऊसाहेब शिंदे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी पाकिस्तानच्या बँकेत दीपाली सय्यद यांचे बँक खाते असल्याचा पुरावा त्यांनी दिला आहे. तर भाजपच्या दिग्गज नेत्यांना हे सर्व माहिती असून केवळ आर्थिक हितसंबंधामुळे त्यांना पाठीशी घातले जाते असा आरोप शिंदे यांनी केला आहे. यापुढे दीपाली सय्यद यांच्यावर काही कारवाई करण्यात आली नाही तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात फिरू देणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.   भाऊसाहेब शिंदेंचे आरोप दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानामध्ये एक बँक खाते असल्याचा खळबळजनक दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पा...