Posts

पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच डिसेंबर 2021 मध्ये केलेले निलंबन आदेश मागे

Image
परमबीर सिंग यांची आरोपातून सुटका; म.वि.आ.ला धक्का महाविकास आघाडी सरकारने डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेले निलंबन आदेश रद्द केले आहे आणि ते ऑन-ड्युटी असल्याचे मानले जावे मुंबई, 12 मे :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटर बॉम्ब टाकणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहे. शिंदे सरकारने परमबीर सिंग यांची सर्व आरोपांमधून सुटका केली आहे. याआधीच उपायुक्तपदाचं निलंबन मागे घेतलं होतं. त्यानंतर आरोपातून सुटका केली आहे.            मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंग यांना मदत केल्या प्रकरणी पोलीस उपायुक्ताला निलंबित केले होते. पण, आता शिंदे सरकारने परमबीर सिंग यांना दिलासा दिला आहे. परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहे. डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेले निलंबन आदेश मागे घेतले आणि निलंबनाचा कालावधी कर्तव्यावर वागण्याचा आदेश दिला आहे. याआधी निलंबित पोलीस उपायुक्ताचे निलंबन रद्द केले आह...

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर हे सरकार कदाचित परत आले असते

Image
    मी राजीनामा दिला नसता तर मी पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो:  उद्धव ठाकरे संपादकीय: सहदेव जाधव  जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर कदाचीत सरकार परत आलं असतं. त्यानंतर याच सर्व मुद्द्यावर उद्धव ठाकरेंकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. परंतु वेळ निघून गेलेली आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकार आहे तसेच राहील असे दिसून येत आहे.   मुंबई, 11 मे :   आज राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल हाती आला आहे. सुप्रीम कोर्टाकडून हे प्रकरण विधासभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आलं आहे. आता या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान हा निर्णय देताना सुप्रीम कोर्टानं असंही निरीक्षण नोंदवलं की, जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर कदाचीत सरकार परत आलं असतं. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर हे सरकार कदाचित परत आले असते, असं सुप्रीम कोर्टानं आजचा निर्णय देताना म्हटलं होतं. यावर उद्धव ठाकरे यांनी ...

भारतीय जनता पार्टीची नवीन प्रदेश कार्यकारिणी बुधवारी दुपारी एक वाजता जाहीर होणार

Image
भारतीय जनता पार्टीची नवीन प्रदेश कार्यकारिणी  1200 जणांची टीम:  चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पार्टीची नवीन प्रदेश कार्यकारिणी बुधवारी (ता. 3 मे ) दुपारी एक वाजता जाहीर होत असून, राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्यातील नेते, प्रमुख नेतृत्व, विशेष निमंत्रित या सर्वांची मिळून जवळपास 1200 जणांची टीम होणार आहे.  भाजपाचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज ही माहिती दिली. ते म्हणाले, दर तीन वर्षांनी प्रदेश कार्यकारिणीची नव्याने रचना होत असते. जुन्या कार्यकारिणीला आता साडेतीन वर्षांचा कालावधी झालेला आहे. 12 ऑगस्ट 2022 ला प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नवीन कार्यकारिणी अपेक्षित होती. या कार्यकारिणीच्या माध्यमातून 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत. 48 लोकसभा आणि 200 हून अधिक विधानसभा युतीत जिंकण्याचा आमचा पण आहे  आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. जुनी आणि नवीन कार्यकारिणी मिळून आम्ही एकत्रित हा प्रयत्न करू, त्यामध्ये चांगले यश आम्हाला प्राप्त होईल.  • 288 विधानसभा समन्वयक 288 विधानसभा समन्वयक देखील लवकरच जाहीर करणार. नव्या जिल्हाध्यक्षांची टीम सुद्धा मे ...

संगमनेर पठार भागाची "दशा" ओळखून "दिशा" देणारा अवलिया माणूस म्हणजे रविंद्र बिरोले

Image
पठार भागातील बेरोजगारांसाठी माळरानावर फुलविली नवी बाग रविंद्र पुरुषोत्तम बिरोले यांचा अभिष्टचिंतनानिमीत्त विशेष  संपादकीय सहदेव जाधव          कौठेमलकापुर येथील खडकाळ माळरानावर आपल्या अथक प्रयत्नातुन तसेच मानवनिर्मित संकटांना सामोरे जात उभा राहिलेला अद्वितीय असा कारखाना म्हणजे श्री गजानन महाराज शुगर लि. (पुर्वीचे नाव युटेक शुगर लि.) या साखर कारखान्याचे अपरिमीत कष्टाने व मेहनतीने नियोजनपुर्वक प्रयत्न करून सहा गाळप हंगाम यशस्वीरित्या पुर्ण केले. हे गाळप पूर्ण करताना अनेक संकटे 'आ' वासून समोर होते. अशा ही परिस्थिती मध्ये मात करत हा कारखाना उभा आहे. याचे सर्व श्रेय या कारखान्याचे सर्वे सर्वा रविंद्र बिरोले यांना जाते. रविंद्र बिरोले हे एक असाधारण नेत्रुत्व. आज त्यांचा वाढदिवस म्हणून मुद्दामून केलेला हा लेखप्रपंच...        रविंद्र बिरोले यांनी साकूर पठार भागाला ऊसाचे आगार बनविण्याचे स्वप्न पाहिले..परिसराचा भौगोलिक अभ्यास केला..पठारभागाला मुळामाईचे वरदान असल्याने त्यांच्या दुरदृष्टी या भागावर स्थिरावली. आणि त्याच वेळेस संकल्प केला. एक दिवस मी ...

महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव सेवानिवृत्त

Image
 प्रशासकीय सेवेतील 'कोहिनुर' म्हणून ओळख: सेवा हमी कायद्याच्या आयुक्तपदी नियुक्ती.    "एकमेवाद्वितीय"  'झाले बहु, होतील बहु,  परंतु यासम हा..!'       राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेचे सर्वोच्च अधिकारी असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव  नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. सुमारे सदतीस वर्षाच्या प्रदीर्घ सनदी सेवेनंतर श्रीवास्तव सेवानिवृत्त होत आहेत. प्रशासकीय सेवेतील हे असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी आपल्या कामातून उच्च प्रतीचे प्राविण्य सिद्ध केलेच, पण या परिघाबाहेर आपल्या कलासक्त, स्थितप्रज्ञता, क्षमाशीलता, सुसंस्कृतता, सहनशीलतेच्या परमोच्च गुणांचं विलोभनीय दर्शन देवून आपले वेगळेपण एकमेवाद्वितीयत्व सिद्ध केले आहे. सरांचे पिताश्री भारतीय पोलीस प्रशासन सेवेतील कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याने प्रशासनाचे बाळकडू त्यांना जन्मतःच मिळालेले होते. एक सदाबहार, चिरतरुण ,राजबिंड व्यक्तिमत्व असलेले सर प्रशासनातील एक दंतकथा बनलेले आहेत.     यावेळी अजीत देशमुख यांनी आपल्या शब्दात मनुकुमार श्रीवास्तव यांचे बद्दल काढ...

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांचे कॉंग्रेसवर शरसंधान

Image
 गांधी कुटुंबाचे पोपट बोलू लागले..राजेंद्र गोंदकरांची जहरी टिका शिर्डी प्रतिनिधी:  नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तीगत टीका करणे व त्यांच्या आडनावावरून पोरकट वक्तव्ये करणे महागात पडते हे आता सोनिया, राहुल गांधी व वाड्रा कुटुंबास पुरेपूर उमगल्याने आता पाळीव पोपटांच्या मुखातून असे उद्योग कॉंग्रेसने सुरू केले आहेत. मात्र यातून कॉंग्रेसचे नैराश्यच उघड होत असून अशा हीन आरोपांना जनता मतदानातूनच पुन्हा कॉंग्रेसला जागा दाखवून देईल, असे प्रत्युत्तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.  पंतप्रधान मोदी हे विषारी साप असल्याचे वक्तव्य करून कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गांधी कुटुंबाची संस्कृती जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे. याआधी गांधी परिवाराने पंतप्रधानांवर व्यक्तिगत चिखलफेक करताना राजकीय संस्कृती खुंटीवर टांगली होती. मौत का सौदागर, खून का दलाल अशा शब्दांत सोनिया गांधींनी पंतप्रधानांवर टीका केली तेव्हा देशातील जनतेनेच कॉंग्रेसला झिडकारले. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांमुळे तर त्यांना कायदेशीर कारवाईस तोंड द्यावे लागले अ...

बेकायदेशीर गुंठेवारी व्यवहारांची विभागीय आयुक्‍तांमार्फत चौकशी

Image
  संगमनेर तालुक्यात शासकीय योजनांची आढावा बैठक संपन्न. थोरातांसह समर्थकांना 'पोटसूळ', मात्र आम जनता 'संतुष्ट'.  संगमनेर दि.२८ प्रतिनिधी  तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात झालेल्‍या बेकायदेशीर गुंठेवारी व्‍यवहारांच्‍या तक्रारी मोठ्या प्राप्‍त झाल्‍या आहेत. यासर्व व्‍यवहारांची विभागीय आयुक्‍तांमार्फत चौकशी करण्‍यात येणार असल्‍याची माहीती महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आढावा बैठकीत दिली.        मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत तालुक्‍यातील जिल्‍हा परिषद गट निहाय बैठकांचे आयोजन होते. घुलेवाडी, संगमनेर खुर्द या जिल्‍हा परिषद गटातील गावांमध्‍ये सुरु असलेल्‍या शासकीय योजनांच्‍या कामांचा आढावाही घेण्‍यात आला. उपस्थित ग्रामस्‍थ आणि पदाधिका-यांनी केलेल्‍या विविध प्रश्‍नांबाबत गांभिर्याने दखल घेण्‍याची सुचना या बैठकीमध्‍ये मंत्र्यांनी दिल्‍या. प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, गटविकास आधिकारी अनिल नागणे यांच्‍यासह सर्व शासकीय विभागाचे वरिष्‍ठ आधिकारी तसेच जेष्‍ठ नेते वसंतराव देशमुख, गुलाबराव सांगळे, भाजपाचे तालुका अध्‍यक्ष सतिष कानवडे...