Posts

अजित पवार, सुप्रिया सुळे तसंच आदित्य ठाकरे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार: विजय शिवतारे

Image
सुळे-सत्तार वाद: 'पहाटेच्या शपथविधीला किती खोके मिळाले..? शिंदे आक्रमक कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त केलं. या वादानंतर आता एकनाथ शिंदेंची बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झाली आहे.   मुंबई, 8 ऑक्टोबर :   कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त केलं. सत्तार यांच्या या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. तर पक्षाकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्याबाबत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली. तसंच एकनाथ शिंदेंनी सत्तार यांना माफी मागण्याचे आदेश दिले. यानंतर अब्दुल सत्तार यांनी माफीही मागितली. अब्दुल सत्तार यांच्या या वादानंतरल एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना...

खड्डेमय पुणे-नाशिक हायवेचे खड्डेदुरुस्ती युद्ध पातळीवर सुरु...

Image
शिवप्रतिष्ठाणच्या टोल वसुली बंद करा आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महामार्ग प्रशासनाने घेतली दखल...  मुंबई (महाराष्ट्र):- पुणे-नाशिक हायवेवर आळेफाटा, बोटा, घारगाव याठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून दररोज अपघातामध्ये प्रवाश्यांना आपला जीव गमवावा लागत आहे, वेळोवेळी होणाऱ्या अपघातांमध्ये असंख्य निष्पाप बळी आत्तापर्यंत गेलेले आहेत, जोपर्यंत सदर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे पुणे-नाशिक हायवे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांचेवर दाखल होत नाहीत तोवर दखल घेतली जाईलच कि नाही? असा संतप्त सवाल शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील यांनी उपस्थित केला होता.           सदर अपघात टाळण्यासाठी ताबडतोब पण दीर्घकाळ टिकेल अशी दुरुस्ती व्हावी तसेच अपघातांचे प्रमाण वाढलेल्या खड्डेमय पुणे-नाशिक हायवेचे खड्डे दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करा, अन्यथा असंख्य प्रवासी, वाहनचालक तसेच शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने पुणे-नाशिक हायवेवर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा ...

अग्नितांडवः नगर सिव्हिल हाॅस्पिटल मधील मोठी घटना

Image
  अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागली आग...११  जण मृत्युमुखी...  जिल्हा रुग्णालय प्रशासन मात्र आता होत आहेत टिकेचे लक्ष्य.. जनतेत नाराजीचा सूर राजयोग मानस वृत्त प्रतिनिधी (स्वाती सुंबे) : जिल्हा शासकिय रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला मोठी आग लागली असून ११ जणांचा होरपोळून मृत्यु झाला असल्याची बातमी येत आहे. परंतु हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अहमदनगर शहरातील मध्यवर्ती भागात असलेले हे रुग्णालय गरीबांसाठी संजिवनी आहे. परंतु या रुग्णालयाचा गलथान कारभार अनेक वर्षांपासून सुरु आहे. याचाच एक भाग म्हणजे आजची ही घटना.        ही घटना शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी ११ च्या दरम्यान घडला आहे .आगीच्या या दुर्घटनेत आकरा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र आगीची तीव्रता लक्षात घेता हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे . काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर काही काही रुग्ण भाजल्याचे देखील वृत्त आहे . राजयोग मानस च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला असता आगीची दाहक...

पंतप्रधान उज्वला गॅस मार्फत साकूर पठार भागातील महिलांची दिवाळी गोड

Image
  पंतप्रधान उज्वला गॅस मार्फत साकूर पठार भागातील महिलांची दिवाळी गोड   साकूर प्रतिनिधीः साकुर इंण्डेन्स गॅस ग्रामीण वितरक एजन्सी मार्फत पंतप्रधान उज्वला गॅस योजनेअंतर्गत गरजू व गरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन चे वाटप आज जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास सभापती मीराताई शेटे यांच्या हस्ते देण्यात आले.      सविस्तर वृत्त असे की साकुर ग्रामीण इंडियन्स गॅस वितरण यांच्यामार्फत पंतप्रधान उज्वला गॅस योजना योजने अंतर्गत गरीब कुटुंबांना आज गॅसचे वाटप करण्यात आले. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती सौ.मीराताई शेटे यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी इंडियन गॅस चे संचालक उत्तम पाटील खेमनर मांडवे गावचे माजी सरपंच जगदीश पाटील गागरे, सुधीर जाधव, पारनेर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष पांडुरंग गागरे, तसेच जांबुत गावचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश भागवत, किसन शेटे, पोपट गाढवे, सामाजिक कार्यकर्ते व प्रगतीशील शेतकरी रवी अण्णा वाडेकर, रावसाहेब गागरे, दत्तात्रय खामकर, बाजीराव गागरे आदी मान्यवर उपस्थित होते....

रहीमपूरच्या सोसायटीचे तालुक्यातून होत आहे कौतुकाचा वर्षाव

Image
रहीमपूर सोसायटीनी सभासदांची दिपावली केली गोड.   संगमनेर तालुक्यातील विशेष दर्जा असलेली सोसायटी  संगमनेर प्रतिनिधीः संगमनेर तालुक्यातील रहिमपूर गावची 'रहीमपूर विविध विकास कार्यकारी सोसायटी' ने दिली सभासदांना दिपावलीत नव संजिवनी.       सविस्तर वृत्त असे की, रहीमपूर सोसायटीची दिपावलीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली यांत सभासदांना ५% डेव्हिडंट देण्याचे सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याचे चेअरमन, व्हा.चेअरमन, यांनी सांगितले.      यावेळी सोसायटीच्या सभासदांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सोसायटीचे चेअरमन आबासाहेब एकनाथ शिंदे, व्हा.चेअरमन राजेंद्र आबाजी गाढे पाटील, सेक्रेटरी विलास कोल्हे, सचिव बाळासाहेब गीते यांचे आभार मानले आहे. रहिमपूर सोसायटीचे काम याआधीही नाविन्यपूर्ण होते. सभासदांचे हीत जोपासणे हे एकमेव धोरण लक्षात घेऊन संचालक मंडळ काम करत आहे. त्यामुळे या सोसायटी ची चर्चा तालुक्यात कौतुकाने केली जाते. यावेळी संचालक गणपत बाळासाहेब शिंदे, सिताराम शिंदे, भिमाजी वाळुंज,...

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

Image
  हाॅटेलात चालत होती 'रंगरलिया': दोन अप्सरांसह तीन पोपट  पिंजऱ्यात कैद   पोलीसांच्या कारवाईने निर्माण झालेला "राजयोग" उध्वस्त..! अहमदनगर- नगर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे,येथील एका कुंटणखान्यावर छापा टाकण्यात आला असून ५ जणांविरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        एकीकडे हनी ट्रॅपींगच्या नावाने नगर जिल्हा बदनाम झालेला असतानाच आता मात्र वेश्या व्यवसायही काही हाॅटेलातून सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. काही नामांकित पुढार्यांच्या हाॅटेलवर असे धंदे होतांना दिसत आहे. आता मात्र हे नवीन प्रकरण समोर आल्याने नगर शहरात नवी चर्चा सुरु झाली आहे. पोलीस बेकायदा धंद्यांना आळा घालण्यास सक्षम अपयशी आल्याचे चित्र दिसुन येत आहे. वारंवार होणारे महिला मुलींवरील अत्याचार, बेकायदा गांजा विक्री, सर्रास गुटखा विक्री, अवैध दारू विक्री, गोमांस अशा अनेक गुन्ह्यांनी शहरासह जिल्ह्याला विळखा घातलेला असून कायद्याची भिती या गुन्हेगारांना राहिलेले नाही याचे कारण अर्थपूर्ण सबंध आहे का...?असा सवाल जनसामान्यांत उपस्थित होत आहे. याबाबत सविस्...