Posts

बिऱ्हाड मोर्चा म्हणजे फक्त स्टंटबाजी: सुहास ब्राम्हणे

Image
  बांधावर जावून धान्य का वाटले नाही..ॽ फक्त चर्चेत राहण्यासाठी उठाठेव- सुहास ब्राम्हणे राहाता दि.१२ प्रतिनिधी - शेतकऱ्यांच्या बांधावर जावू न शकलेल्या स्वयंघोषित पुढाऱ्यांनी काढलेला बिऱ्हाड मोर्चा म्हणजे फक्त स्टंटबाजी होती. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना जे काही देवू शकले नाहीत त्यांना युती सरकरच्या आनंदायी शिध्यावर बोलण्याचा नैतिकही अधिकार नाही. शेतकऱ्यांचा एवढाच कळवळा असेल तर बांधावर जावून धान्य का वाटले नाहीॽ असा सवाल भाजयुमोच्या अनुसूचित जाती जमाती सेलचे सरचिटणीस सुहास ब्राम्हणे यांनी केला.          यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सुहास ब्राम्हणे यांनी म्हणले आहे की, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नूकसान झालेल्या शेती पीकांचे पंचनामे पूर्ण केले आहेत. यापूर्वी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शिंदे फडणवीस सरकारने मदतही जाहीर केली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचा पहिला टप्पा मिळाला आहे. नंतर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचे आश्वासित करण्यात आले असून, सरकारने निकष बदलून सर्व म...

संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला

Image
"कुणाच्या हाती हुकमी पत्ता, यांच्याच नावी दिसते राजसत्ता"..!  तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे अचूक विश्लेषण बघा राजसत्ता न्युज वर        संगमनेर तालुक्यातील साकूर, खराडी, वाघापूर, चिंचोली गुरव, जांभुळवाडी, रणखांबवाडी, दरेवाडी, जांबुत बु., कर्जुले पठार, डोळासणे, पिंपरणे, कोल्हेवाडी, कोळवाडे, मालुंजे, आंभोरे, निंबाळे, जोर्वे, वडझरी बु., निमोण, वडझरी खुर्द., तळेगाव दिघे, हंगेवाडी, कनकापूर, करुले, निळवंडे, पोखरी हवेली, सादतपूर, रहिमपूर, उंबरी बाळापूर, निमगाव जाळी, ओझर खुर्द, धांदरफळ बु., धांदरफळ खुर्द, निमगाव भोजापूर, चिकणी, सायखिंडी व घुलेवाडी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासर्व सदतीस ग्रामपंचायत क्षेत्रात बुधवार पासून आदर्श आचार संहिता लागू झाली असून चालू ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांचे सर्व अधिकार संपुष्टात आले आहे.          आता निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून गावातील पुढारी उमेदवार जुळवा जुळवी करत आहे. उमेदवार जुळवताना पुढाऱ्यांची मोठी कसब पणाला लागणार आहे. आता या ग्रामपंचायत निवडणुकीत मागील सत्ताधार्यांनी काय विकास केला...  कसा...

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन....

Image
  गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना  जामीन  मंजूर गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. मुंबई, 09 नोव्हेंबर :   पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणामध्ये  प्रविण राऊत आणि  संजय राऊत या दोघांच्याही जामीन अर्जावर आज निर्णय देण्यात आला आहे.  संजय राऊत यांना अखेर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला. राऊत यांना पुन्हा एकदा PMLA न्यायालयात हजर केले होते. मागील सुनावणीमध्ये ईडीने लेखी उत्तर सादर केले होते.आज कोर्टामध्ये मोठ्या संख्येनं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.  प्रचंड गर्दी तरी टाचणी पडली तरी आवाज येईल, इतकी शांत...

अजित पवार, सुप्रिया सुळे तसंच आदित्य ठाकरे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार: विजय शिवतारे

Image
सुळे-सत्तार वाद: 'पहाटेच्या शपथविधीला किती खोके मिळाले..? शिंदे आक्रमक कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त केलं. या वादानंतर आता एकनाथ शिंदेंची बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झाली आहे.   मुंबई, 8 ऑक्टोबर :   कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त केलं. सत्तार यांच्या या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. तर पक्षाकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्याबाबत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली. तसंच एकनाथ शिंदेंनी सत्तार यांना माफी मागण्याचे आदेश दिले. यानंतर अब्दुल सत्तार यांनी माफीही मागितली. अब्दुल सत्तार यांच्या या वादानंतरल एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना...

खड्डेमय पुणे-नाशिक हायवेचे खड्डेदुरुस्ती युद्ध पातळीवर सुरु...

Image
शिवप्रतिष्ठाणच्या टोल वसुली बंद करा आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महामार्ग प्रशासनाने घेतली दखल...  मुंबई (महाराष्ट्र):- पुणे-नाशिक हायवेवर आळेफाटा, बोटा, घारगाव याठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून दररोज अपघातामध्ये प्रवाश्यांना आपला जीव गमवावा लागत आहे, वेळोवेळी होणाऱ्या अपघातांमध्ये असंख्य निष्पाप बळी आत्तापर्यंत गेलेले आहेत, जोपर्यंत सदर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे पुणे-नाशिक हायवे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांचेवर दाखल होत नाहीत तोवर दखल घेतली जाईलच कि नाही? असा संतप्त सवाल शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील यांनी उपस्थित केला होता.           सदर अपघात टाळण्यासाठी ताबडतोब पण दीर्घकाळ टिकेल अशी दुरुस्ती व्हावी तसेच अपघातांचे प्रमाण वाढलेल्या खड्डेमय पुणे-नाशिक हायवेचे खड्डे दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करा, अन्यथा असंख्य प्रवासी, वाहनचालक तसेच शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने पुणे-नाशिक हायवेवर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा ...

अग्नितांडवः नगर सिव्हिल हाॅस्पिटल मधील मोठी घटना

Image
  अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागली आग...११  जण मृत्युमुखी...  जिल्हा रुग्णालय प्रशासन मात्र आता होत आहेत टिकेचे लक्ष्य.. जनतेत नाराजीचा सूर राजयोग मानस वृत्त प्रतिनिधी (स्वाती सुंबे) : जिल्हा शासकिय रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला मोठी आग लागली असून ११ जणांचा होरपोळून मृत्यु झाला असल्याची बातमी येत आहे. परंतु हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अहमदनगर शहरातील मध्यवर्ती भागात असलेले हे रुग्णालय गरीबांसाठी संजिवनी आहे. परंतु या रुग्णालयाचा गलथान कारभार अनेक वर्षांपासून सुरु आहे. याचाच एक भाग म्हणजे आजची ही घटना.        ही घटना शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी ११ च्या दरम्यान घडला आहे .आगीच्या या दुर्घटनेत आकरा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र आगीची तीव्रता लक्षात घेता हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे . काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर काही काही रुग्ण भाजल्याचे देखील वृत्त आहे . राजयोग मानस च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला असता आगीची दाहक...

पंतप्रधान उज्वला गॅस मार्फत साकूर पठार भागातील महिलांची दिवाळी गोड

Image
  पंतप्रधान उज्वला गॅस मार्फत साकूर पठार भागातील महिलांची दिवाळी गोड   साकूर प्रतिनिधीः साकुर इंण्डेन्स गॅस ग्रामीण वितरक एजन्सी मार्फत पंतप्रधान उज्वला गॅस योजनेअंतर्गत गरजू व गरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन चे वाटप आज जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास सभापती मीराताई शेटे यांच्या हस्ते देण्यात आले.      सविस्तर वृत्त असे की साकुर ग्रामीण इंडियन्स गॅस वितरण यांच्यामार्फत पंतप्रधान उज्वला गॅस योजना योजने अंतर्गत गरीब कुटुंबांना आज गॅसचे वाटप करण्यात आले. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती सौ.मीराताई शेटे यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी इंडियन गॅस चे संचालक उत्तम पाटील खेमनर मांडवे गावचे माजी सरपंच जगदीश पाटील गागरे, सुधीर जाधव, पारनेर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष पांडुरंग गागरे, तसेच जांबुत गावचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश भागवत, किसन शेटे, पोपट गाढवे, सामाजिक कार्यकर्ते व प्रगतीशील शेतकरी रवी अण्णा वाडेकर, रावसाहेब गागरे, दत्तात्रय खामकर, बाजीराव गागरे आदी मान्यवर उपस्थित होते....