Posts

साकूर गावात त्या जादूटोना टोळीला हद्दपार करा

Image
साकूर गावात भूत उतरायच्या नावाखाली धर्मांतर केले जात असल्याची चर्चा  राजसत्ता न्यूज/दि.२७.१.२३ संपादकीय           साकुर  गाव हे पठार भागातील सर्वात मोठी बाजार पेठ आहे. खरेतर साकूर  गाव हे पठार भागाची राजधानी समजली जाते. त्यामुळे साकुर हे गाव कायमच चर्चेत राहत आहे. अश्यातच आता या गावांची चर्चा वेगळ्याच कारणाने सुरु झाली आहे. भुते उतरवण्याच्या नावाखाली दर बुधवारी एक भलताच दरबार साकूर गावात लागत आहे. बुधवारी साकूर गावचा आठवडे बाजार असतो आणि याचेच औचित्य साधत एक महाशय थेट साकूर ग्रामपंचायत पाठीमागे एका आपल्या महिला भक्ताच्या घरात भुते उतरावण्याची ठगगिरी करत आहे.           सविस्तर वृत्त असे कि, संगमनेर तालुक्यातील साकूर गावात दर बुधवारी आठवडे बाजार असतो. या आठवडे बाजारासाठी पठारभागातील सर्व गावचे नागरीक बाजारासाठी येत असतात. याचेच औचित्य साधत साकूर येथे बाहेर गावातून एक ठगांची टीम येथे येत असतेे. या ठगांनी अनेकांकडून आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी आर्थिक लूट केली आहे. या ठगांनी एक विशिष्ट धर्म स्विकारला असून त्या धर्माच्...

काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागणार: राष्ट्रवादी नाराज

Image
  काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी: थोरातांच्या जागी  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सत्यजीत तांबे यांच्या बंडानंतर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी :  सत्यजीत तांबे यांच्या बंडानंतर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणं कठीण झाल्याचं पत्र बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना लिहिलं आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन थोड्याच दिवसांमध्ये सुरू होणार आहे, त्यामुळे नवीन गटनेता ठरवण्यासाठी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. नव्या गटनेते पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे.       पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी अनुकूल असल्याचं स्पष्ट होऊ लागलं आहे. विधिमंडळ गटन...

खळबळजनक: धर्मांतरण करुन महिलेवर सामुदायिक बलात्कार...गुन्हा दाखल

Image
  सिन्नर तालुक्यातील खळबळजनक घटनेने सिन्नर हादरले पिडितेवर बलात्कार   सिन्नर वार्ताहर : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे धर्मांतर करून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिन्नर - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.        ख्रिश्चन या धर्मांतरण प्रकरणातील आरोपी त्याच्या चार साथीदारांसह झोपडपट्ट्यांमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार करीत असे. झोपडपट्टी भागातील रहिवाशांना निरनिराळ्या प्रकारची आमिषे या आरोपींकडून दाखवण्यात येत होती., इतकेच काय तर आरोपी सर्व आजार हे येशूच्या नावाने बरे होतात असा खोटा प्रचारही करीत होता. येशूची प्रार्थना केल्यानं आर्थिक आणि आरोग्य समस्या दूर होतात, त्यामुळे येशूची पूजा करा, असं या आरोपींकडून सांगण्यात येत असे. हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासही लोकांना सांगण्यात येत असे.या संदर्भात सविस्तर गोष्ट अशी की सिन्नर येथील दावत मळा माळेगाव येथे संबंधित फिर्यादी महिला आपला उदरनिर्वाह मोलमजुरी करून भागवते. पीडित महिला मुसळगाव एमआयडीसीमध्ये काम शो...

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे बेताल वक्तव्य

Image
अजित पवार यांच्या त्या वक्तव्या बद्दल भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने तहसीलदाराना निवेदन    महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्या बाबत महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत असे बेताल वक्तव्य करून सबंध हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.  माजी उपमुख्यमंत्री व अत्ताचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनि धर्मासाठी दिलेले बलिदान विसरले आहेत. ज्या औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ केला, धर्म बदला म्हणून ४० दिवस अतोनात त्रास दिला, शरीराचे एक एक अवयव काढून क्रूर अशी हत्या करण्यात आली. तरी देखील त्यांनी धर्म बदला नाही असे एकवचनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज होते. तरीही जाणीवपूर्वक त्यांची हेटाळना करण्याच्या उद्देशाने विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केलेले बेताल वक्तव्य हे हिंदू धर्मियांचे मन दुखावणारे आहे.  भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचा वतीने अजित पवार यांनी केलेल्या धर्मवीर छत्...

बाळासाहेब मुरकुटे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

Image
  मुळा धरणातून आवर्तन सोडण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन.. मा.आ.बाळासाहेब मुरकुटे....    राजसत्ता वृत्तसंस्था  नेवासा प्रतिनिधी: मुळा धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये पाट पाण्याची रब्बी हंगामातील पिकासाठी अत्यंत आवशकता असून, धरणातून मुळा उजव्या कालव्याला आवर्तन तातडीने सोडण्याचा निर्णय घ्यावा. या मागणीसाठी नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.राधाकृष्णजी विखे पाटील यांची भेट घेतल्याचे सांगून शेतीसाठी मुळा धरणातून आवर्तन सोडावे आशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे होते. नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांची आज कांदा, गहू, हरभरा,ऊस लागवड चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्याला पाटपाण्याची आवशकता असून, तालुक्यात ऊसाचे पिक अद्याप मोठ्या प्रमाणात उभा आहे. अशा पिकाला पाणी देण्याचा प्रश्न शेतकऱ्यान समोर उभा राहिल्याने धरणातील आवर्तनास उशीर झाल्यामुळे तातडीने आवर्तन करावे. कारण उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे विहिर व बोरचे पाणी पातळी कमी झाल्याने शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा प्रश्न उभा राहू शकतो.  धरण...

डॉ.भानुदास जी.डेरे शैक्षणिक संस्थेत विविध गुणदर्शन कार्यक्रम साजरा

Image
डॉ.भानुदास जी.डेरे इंग्लिश मिडीयम स्कूल व जुनिअर कॉलेजचा परितोषिक वितरण सोहळा संपन्न.. संगमनेर प्रतिनिधी : दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी डॉ.भानुदास जी. डेरे इंग्लिश मिडीयम स्कूल व जुनिअर कॉलेजचा सहशालेय व क्रिडा महोत्सव चा बक्षीस वितरण कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पालकांना आमंत्रित केले होते. यावेळी संजय उपाध्ये , खंडागळे विजय , गोपाळे रवींद्र , हासे रतन , दिघे कमल , व भवर अश्विनी हे उपस्थित होते. कार्यकमाची सुरवात सरस्वती पूजनाने झाली, पाहुण्याचा सत्कार मुख्यकार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. शाळे मध्ये चार संघा मध्ये स्पर्धा घेण्यात आल्या त्या मध्ये विजेता संघ म्हणून मार्स हाउस याला करंडक देऊन गौरवण्यात आले .प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना श्री उपाध्ये संजय यांनी जिद्द व चिकाटीचे महत्व पटवून देताना यश कसे मिळवायचे याचा कानमंत्र दिला .  खंडागळे विजय यांनी एकाग्रता ,कष्ट ,व निष्टा या गुणांना शालेय जीवनात किती म्हत्वाचे स्थान आहे हे अधोरेखित केले .या प्रसंगी सौ आशालता शेट्टी ,मुख्याध्याप...

चैतन्यपूर गावासह सरपंच बसणार बेमुदत आमरण उपोषणाला

Image
त्या दोन आधिकाऱ्यांची भ्रष्टाचाराची चौकशी करून निलंबित करा. प्रतिनिधी सतिश फापाळे /राजसत्ता न्युज      अकोले तालुक्यातील पठार भागातील चैतन्यपूर गावातील शेतकरी व गावचे सरपंच यांना चोर संबोधून गावचा व सरपंच पदाचा अपमान केला.महावितरन कंपनीचे दोन आधिकारी यांनी आधिकाराचा गैरवापर करून कारवाया केल्या आहेत. आपल्या हुकमी व मनमानी कारभारातून त्यांचे कार्यकाळात अनैतिक माया जमविली.त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांना निलंबित करा.अशा विविध मागण्यांनसाठी गुरुवार दिनांक २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता पासून चैतन्यपूर गावासह परिसरातील नागरिक ,ग्रामपंचायत सरपंच,व  सरपंच नितीन डुंबरे  ते दोन आधिकारी निलंबित करा, त्यांचे भ्रष्टाचाराची चौकशी करा अशा विविध मागण्यानसाठी बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत.        गेल्या पंधरा दिवसापासून चैतन्यपूर गावातील विद्युत रोहित्र (डिपी) खराब झाले होते.त्याबाबत विद्युत रोहित्र (डीपी) साठी बिल पावती भरली होती.चार दिवसापासून विद्युत रोहित्र (डीपी) घेऊन निघालेली गाडी न पोहचल्याने शेतकरी हैराण झाले होते. शेतकऱ्यांची कांद...