बाळासाहेब मुरकुटे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
मुळा धरणातून आवर्तन सोडण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन.. मा.आ.बाळासाहेब मुरकुटे....
राजसत्ता वृत्तसंस्था
नेवासा प्रतिनिधी: मुळा धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये पाट पाण्याची रब्बी हंगामातील पिकासाठी अत्यंत आवशकता असून, धरणातून मुळा उजव्या कालव्याला आवर्तन तातडीने सोडण्याचा निर्णय घ्यावा. या मागणीसाठी नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.राधाकृष्णजी विखे पाटील यांची भेट घेतल्याचे सांगून शेतीसाठी मुळा धरणातून आवर्तन सोडावे आशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे होते.
नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांची आज कांदा, गहू, हरभरा,ऊस लागवड चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्याला पाटपाण्याची आवशकता असून, तालुक्यात ऊसाचे पिक अद्याप मोठ्या प्रमाणात उभा आहे. अशा पिकाला पाणी देण्याचा प्रश्न शेतकऱ्यान समोर उभा राहिल्याने धरणातील आवर्तनास उशीर झाल्यामुळे तातडीने आवर्तन करावे. कारण उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे विहिर व बोरचे पाणी पातळी कमी झाल्याने शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा प्रश्न उभा राहू शकतो.
धरणामध्ये मुबलक पाणी साठा शिल्लक असताना आज शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे पालक मंत्र्यांनी पाट पाण्या संदर्भात लक्ष घालून मुळा धरणातून तातडीने आवर्तन सोडण्यासाठी प्रशासनाला आदेश करावे. त्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंत आवर्तन सोडण्यासाठी अधीक्षक अभियंता जलसंपदा नाशिक, यांना सूचना द्याव्यात आशी मागणी मा.आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी आपल्या निवेदनात केली आहे.
आपल्या भागातील नवीन घडामोडी बघण्यासाठी राजसत्ता न्युज पोर्टल व युट्युब चॅनेल वर अपडेट रहा
Comments
Post a Comment