Posts

शेवगाव दंगलीतील मास्टर माईंड शोधून काढणार:ना.विखे पाटील

Image
शेवगाव येथील दंगल प्रकरणी विखे पाटील अलर्ट मोडवर...शहराची पाहणी   शेवगाव प्रतिनिधी: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. १४) निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत राडा झाला. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. त्यात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. तसेच तीन पोलिस व गृहरक्षक दलाचे चार कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असले, तरी शहरात तणावपूर्ण शांतता होती. याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी ११२ जणांवर गुन्हे दाखल केले असून, २९ जणांना अटक केली आहे.        दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता. १५) तालुक्यात ठिकठिकाणी कडकडीत ‘बंद' पाळण्यात आला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शहरात फिरुन आढावा घेतला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यावेळी उपस्थित होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, प्रशांत खैरे, उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, अजित पाटील हे शेवगाव शहरात तळ ठोकून होते. याप्रकरणी पोलिस कर्मचारी महेश सावंत यांनी फिर्याद दिली.    ...

संगमनेर तालुक्यातील अवैध दारु गांजा ला राज्य उत्पादन शुल्क चा आशिर्वाद

Image
  संगमनेर तालुक्यात अवैध दारु गांजा विक्रेत्यांची मुजोरी वाढली.. संपादकीय: सहदेव जाधव         राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे काम नक्की काय आहे हे संगमनेर येथील कार्यालयातील अधिकार्यांना शिकवणं गरजेचे झाले आहे. कारण अनधिकृत ढाब्यांवर दिवसा ढवळ्या चाललेला मद्याचा महापूर या अधिकार्यांना दिसत नाही. संगमनेर च्या प्रमुख चारही मुख्य रस्त्यावर हा खुलेआम कारभार चालू आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष जात नाही हा विचार करायला लावणारी गोष्ट आहे.           संगमनेर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारु गांजा हातभट्टी ला ऊत आला आहे. परंतु याकडे गांधारीची पट्टी डोळ्याला बांधून बसलेल्या राज्य उत्पादन शुल्क च्या अधिकार्यांना दिसत नाही. वेळोवेळी सुज्ञ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व गावातील त्रस्त झालेले नागरिक काॅल करून माहिती देत असतात. परंतु समोरुन कुठलीही समाधानकारक उत्तर मिळत नाही. 'येतो उद्या, आज राजूर साइटला आहे, आज गाडी नाही, माझी सुट्टी आहे.' असे उडवा उडवी केल्याचे आढळून येत आहे.          संगमनेर तालुक्यातील ...

पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच डिसेंबर 2021 मध्ये केलेले निलंबन आदेश मागे

Image
परमबीर सिंग यांची आरोपातून सुटका; म.वि.आ.ला धक्का महाविकास आघाडी सरकारने डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेले निलंबन आदेश रद्द केले आहे आणि ते ऑन-ड्युटी असल्याचे मानले जावे मुंबई, 12 मे :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटर बॉम्ब टाकणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहे. शिंदे सरकारने परमबीर सिंग यांची सर्व आरोपांमधून सुटका केली आहे. याआधीच उपायुक्तपदाचं निलंबन मागे घेतलं होतं. त्यानंतर आरोपातून सुटका केली आहे.            मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंग यांना मदत केल्या प्रकरणी पोलीस उपायुक्ताला निलंबित केले होते. पण, आता शिंदे सरकारने परमबीर सिंग यांना दिलासा दिला आहे. परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहे. डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेले निलंबन आदेश मागे घेतले आणि निलंबनाचा कालावधी कर्तव्यावर वागण्याचा आदेश दिला आहे. याआधी निलंबित पोलीस उपायुक्ताचे निलंबन रद्द केले आह...

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर हे सरकार कदाचित परत आले असते

Image
    मी राजीनामा दिला नसता तर मी पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो:  उद्धव ठाकरे संपादकीय: सहदेव जाधव  जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर कदाचीत सरकार परत आलं असतं. त्यानंतर याच सर्व मुद्द्यावर उद्धव ठाकरेंकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. परंतु वेळ निघून गेलेली आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकार आहे तसेच राहील असे दिसून येत आहे.   मुंबई, 11 मे :   आज राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल हाती आला आहे. सुप्रीम कोर्टाकडून हे प्रकरण विधासभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आलं आहे. आता या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान हा निर्णय देताना सुप्रीम कोर्टानं असंही निरीक्षण नोंदवलं की, जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर कदाचीत सरकार परत आलं असतं. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर हे सरकार कदाचित परत आले असते, असं सुप्रीम कोर्टानं आजचा निर्णय देताना म्हटलं होतं. यावर उद्धव ठाकरे यांनी ...

भारतीय जनता पार्टीची नवीन प्रदेश कार्यकारिणी बुधवारी दुपारी एक वाजता जाहीर होणार

Image
भारतीय जनता पार्टीची नवीन प्रदेश कार्यकारिणी  1200 जणांची टीम:  चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पार्टीची नवीन प्रदेश कार्यकारिणी बुधवारी (ता. 3 मे ) दुपारी एक वाजता जाहीर होत असून, राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्यातील नेते, प्रमुख नेतृत्व, विशेष निमंत्रित या सर्वांची मिळून जवळपास 1200 जणांची टीम होणार आहे.  भाजपाचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज ही माहिती दिली. ते म्हणाले, दर तीन वर्षांनी प्रदेश कार्यकारिणीची नव्याने रचना होत असते. जुन्या कार्यकारिणीला आता साडेतीन वर्षांचा कालावधी झालेला आहे. 12 ऑगस्ट 2022 ला प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नवीन कार्यकारिणी अपेक्षित होती. या कार्यकारिणीच्या माध्यमातून 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत. 48 लोकसभा आणि 200 हून अधिक विधानसभा युतीत जिंकण्याचा आमचा पण आहे  आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. जुनी आणि नवीन कार्यकारिणी मिळून आम्ही एकत्रित हा प्रयत्न करू, त्यामध्ये चांगले यश आम्हाला प्राप्त होईल.  • 288 विधानसभा समन्वयक 288 विधानसभा समन्वयक देखील लवकरच जाहीर करणार. नव्या जिल्हाध्यक्षांची टीम सुद्धा मे ...

संगमनेर पठार भागाची "दशा" ओळखून "दिशा" देणारा अवलिया माणूस म्हणजे रविंद्र बिरोले

Image
पठार भागातील बेरोजगारांसाठी माळरानावर फुलविली नवी बाग रविंद्र पुरुषोत्तम बिरोले यांचा अभिष्टचिंतनानिमीत्त विशेष  संपादकीय सहदेव जाधव          कौठेमलकापुर येथील खडकाळ माळरानावर आपल्या अथक प्रयत्नातुन तसेच मानवनिर्मित संकटांना सामोरे जात उभा राहिलेला अद्वितीय असा कारखाना म्हणजे श्री गजानन महाराज शुगर लि. (पुर्वीचे नाव युटेक शुगर लि.) या साखर कारखान्याचे अपरिमीत कष्टाने व मेहनतीने नियोजनपुर्वक प्रयत्न करून सहा गाळप हंगाम यशस्वीरित्या पुर्ण केले. हे गाळप पूर्ण करताना अनेक संकटे 'आ' वासून समोर होते. अशा ही परिस्थिती मध्ये मात करत हा कारखाना उभा आहे. याचे सर्व श्रेय या कारखान्याचे सर्वे सर्वा रविंद्र बिरोले यांना जाते. रविंद्र बिरोले हे एक असाधारण नेत्रुत्व. आज त्यांचा वाढदिवस म्हणून मुद्दामून केलेला हा लेखप्रपंच...        रविंद्र बिरोले यांनी साकूर पठार भागाला ऊसाचे आगार बनविण्याचे स्वप्न पाहिले..परिसराचा भौगोलिक अभ्यास केला..पठारभागाला मुळामाईचे वरदान असल्याने त्यांच्या दुरदृष्टी या भागावर स्थिरावली. आणि त्याच वेळेस संकल्प केला. एक दिवस मी ...

महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव सेवानिवृत्त

Image
 प्रशासकीय सेवेतील 'कोहिनुर' म्हणून ओळख: सेवा हमी कायद्याच्या आयुक्तपदी नियुक्ती.    "एकमेवाद्वितीय"  'झाले बहु, होतील बहु,  परंतु यासम हा..!'       राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेचे सर्वोच्च अधिकारी असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव  नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. सुमारे सदतीस वर्षाच्या प्रदीर्घ सनदी सेवेनंतर श्रीवास्तव सेवानिवृत्त होत आहेत. प्रशासकीय सेवेतील हे असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी आपल्या कामातून उच्च प्रतीचे प्राविण्य सिद्ध केलेच, पण या परिघाबाहेर आपल्या कलासक्त, स्थितप्रज्ञता, क्षमाशीलता, सुसंस्कृतता, सहनशीलतेच्या परमोच्च गुणांचं विलोभनीय दर्शन देवून आपले वेगळेपण एकमेवाद्वितीयत्व सिद्ध केले आहे. सरांचे पिताश्री भारतीय पोलीस प्रशासन सेवेतील कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याने प्रशासनाचे बाळकडू त्यांना जन्मतःच मिळालेले होते. एक सदाबहार, चिरतरुण ,राजबिंड व्यक्तिमत्व असलेले सर प्रशासनातील एक दंतकथा बनलेले आहेत.     यावेळी अजीत देशमुख यांनी आपल्या शब्दात मनुकुमार श्रीवास्तव यांचे बद्दल काढ...