Posts

राजेंद्रजी गोंदकर यांचे मार्गदर्शनाखाली'धन्यवाद मोदीजी अभियान'अत्यंत कार्यक्षमतेने

Image
 भाजप उत्तर नगर जिल्हा 'धन्यवाद मोदीजी' अभियान राबविण्यात राज्यात वरच्या क्रमांकावर उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्रजी गोंदकर यांचे मार्गदर्शनाखाली'धन्यवाद मोदीजी अभियान'अत्यंत कार्यक्षमतेने राबवून महाराष्ट्र राज्यात पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये स्थान प्राप्त केले आहे. याबद्दल या अभियानाचे जिल्हा संयोजक श्री.राजेंद्र सांगळे, सह संयोजक अनिल भनगडे व अंकुश काळे यांचे सह भाजयुमो जिल्हा अध्यक्ष श्रीराज डेरे,तसेच नगर(उत्तर)जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात धन्यवाद मोदीजी अभियान जोरदारपणे राबविण्यात आले. उत्तर नगर जिल्हा भाजप कार्यकर्त्यांनी सुमारे 17125 पोस्टकार्ड लाभार्थ्यांच्या घरी जाऊन प्राप्त केले. मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी या अभियानाचे जिल्हा संयोजक श्री.राजेंद्र सांगळे व सहसंयोजक अनिल भनगडे यांच्यासह आनंद बुधेकर व राजेश शर्मा यांनी मुंबई येथे प्रदेश कार्यालयात जाऊन सतरा हजार...

नराधमाने हद पार केली मुलींनो सावधान

Image
श्रद्धा वालकर मर्डर प्रकरणावर अनेक जण आपलं मत मांडत आहे. अभिनेत्री केतकी चितळेनंतर अभिनेत्री आणि गायिकेनं तिचं मत मांडलं आहे.पाहा तिची पोस्ट   मुंबई, 16 नोव्हेंबर :   दिल्लीत झालेल्या   श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर देश चांगलाच हादरून गेला आहे. कामानिमित्त मुंबईला गेलेल्या श्रद्धाची बॉयफ्रेंड आफताबनं गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर नराधमानं श्रद्धाचे 35 तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले. दोघांमध्ये किरकोळ वाद झाले आणि त्या वादातून आफताबनं श्रद्धाची निर्घूण हत्या केली. आफताब पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्वसामान्य नागरिकांपासून सेलिब्रेटी देखील यावर आपलं मत मांडत आहे. काल अभिनेत्री केतकी चितळेनं याविषयी पोस्ट शेअर केली आहे. तर आज अभिनेत्री आणि गायिता केतकी माटेगावकर हिनं पोस्ट शेअर करत मुलींना प्रेमाचा सल्ला दिला आहे. सध्या केतकीची पोस्ट चर्चेत आहे. केतकीनं इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत दिल्ली हत्याप्रकरणावर भाष्य केलं आहे. केतकीनं म्हटलंय, 'एक सुंदर जग आपले आई वडिल आपल्याला देतात. सुख सोयींनी आणि उत्तम सुरक्षित असं. ...

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना धक्का: जिल्हा दूध संघात अपहार

Image
जळगावात दूध संघ अपहार प्रकरणाला नवे वळण,एकनाथ खडसेंना धक्का दुधाच्या भुकटीच्या अपहाराच्या तक्रारी प्रकरणी दूध संघाच्या कार्यकारी संचालकांना पोलिसांनी अटक केली आहे.   जळगाव, 15 नोव्हेंबर :   भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्या दूध संघात लोणी व दुधाच्या भुकटीच्या अपहाराच्या तक्रारी प्रकरणी दूध संघाच्या कार्यकारी संचालकांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना धक्का मानला जात आहे. जिल्हा दूध संघात अपहार नसून चोरी झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी आरोप केला होता व या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी एकनाथ खडसेंनी पोलीस स्टेशन बाहेर या आंदोलन देखील केले होते. खडसे यांनी रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या दिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जयंत पाटील यांनी खडसेंची भेट घेतली, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. मात्र, आता दूध संघाच्या अपहार प्रकरणी शहर पोलिसांनी दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना अटक केल्याने खडसेंना मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ खडसे यांचा मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा दरम्यान, जळगाव जिल...

बिऱ्हाड मोर्चा म्हणजे फक्त स्टंटबाजी: सुहास ब्राम्हणे

Image
  बांधावर जावून धान्य का वाटले नाही..ॽ फक्त चर्चेत राहण्यासाठी उठाठेव- सुहास ब्राम्हणे राहाता दि.१२ प्रतिनिधी - शेतकऱ्यांच्या बांधावर जावू न शकलेल्या स्वयंघोषित पुढाऱ्यांनी काढलेला बिऱ्हाड मोर्चा म्हणजे फक्त स्टंटबाजी होती. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना जे काही देवू शकले नाहीत त्यांना युती सरकरच्या आनंदायी शिध्यावर बोलण्याचा नैतिकही अधिकार नाही. शेतकऱ्यांचा एवढाच कळवळा असेल तर बांधावर जावून धान्य का वाटले नाहीॽ असा सवाल भाजयुमोच्या अनुसूचित जाती जमाती सेलचे सरचिटणीस सुहास ब्राम्हणे यांनी केला.          यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सुहास ब्राम्हणे यांनी म्हणले आहे की, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नूकसान झालेल्या शेती पीकांचे पंचनामे पूर्ण केले आहेत. यापूर्वी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शिंदे फडणवीस सरकारने मदतही जाहीर केली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचा पहिला टप्पा मिळाला आहे. नंतर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचे आश्वासित करण्यात आले असून, सरकारने निकष बदलून सर्व म...

संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला

Image
"कुणाच्या हाती हुकमी पत्ता, यांच्याच नावी दिसते राजसत्ता"..!  तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे अचूक विश्लेषण बघा राजसत्ता न्युज वर        संगमनेर तालुक्यातील साकूर, खराडी, वाघापूर, चिंचोली गुरव, जांभुळवाडी, रणखांबवाडी, दरेवाडी, जांबुत बु., कर्जुले पठार, डोळासणे, पिंपरणे, कोल्हेवाडी, कोळवाडे, मालुंजे, आंभोरे, निंबाळे, जोर्वे, वडझरी बु., निमोण, वडझरी खुर्द., तळेगाव दिघे, हंगेवाडी, कनकापूर, करुले, निळवंडे, पोखरी हवेली, सादतपूर, रहिमपूर, उंबरी बाळापूर, निमगाव जाळी, ओझर खुर्द, धांदरफळ बु., धांदरफळ खुर्द, निमगाव भोजापूर, चिकणी, सायखिंडी व घुलेवाडी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासर्व सदतीस ग्रामपंचायत क्षेत्रात बुधवार पासून आदर्श आचार संहिता लागू झाली असून चालू ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांचे सर्व अधिकार संपुष्टात आले आहे.          आता निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून गावातील पुढारी उमेदवार जुळवा जुळवी करत आहे. उमेदवार जुळवताना पुढाऱ्यांची मोठी कसब पणाला लागणार आहे. आता या ग्रामपंचायत निवडणुकीत मागील सत्ताधार्यांनी काय विकास केला...  कसा...

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन....

Image
  गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना  जामीन  मंजूर गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. मुंबई, 09 नोव्हेंबर :   पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणामध्ये  प्रविण राऊत आणि  संजय राऊत या दोघांच्याही जामीन अर्जावर आज निर्णय देण्यात आला आहे.  संजय राऊत यांना अखेर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला. राऊत यांना पुन्हा एकदा PMLA न्यायालयात हजर केले होते. मागील सुनावणीमध्ये ईडीने लेखी उत्तर सादर केले होते.आज कोर्टामध्ये मोठ्या संख्येनं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.  प्रचंड गर्दी तरी टाचणी पडली तरी आवाज येईल, इतकी शांत...

अजित पवार, सुप्रिया सुळे तसंच आदित्य ठाकरे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार: विजय शिवतारे

Image
सुळे-सत्तार वाद: 'पहाटेच्या शपथविधीला किती खोके मिळाले..? शिंदे आक्रमक कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त केलं. या वादानंतर आता एकनाथ शिंदेंची बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झाली आहे.   मुंबई, 8 ऑक्टोबर :   कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त केलं. सत्तार यांच्या या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. तर पक्षाकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्याबाबत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली. तसंच एकनाथ शिंदेंनी सत्तार यांना माफी मागण्याचे आदेश दिले. यानंतर अब्दुल सत्तार यांनी माफीही मागितली. अब्दुल सत्तार यांच्या या वादानंतरल एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना...