Posts

प्रवरामाई ला गंगेचे रुप आणण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी एकत्र या

Image
प्रवरामाई च्या यातना संगमनेरकरांना कधी कळणार..? संपादकीय: सहदेव जाधव  संगमनेर(प्रतिनिधी): सह्याद्रीच्या कुशीतुन उगम पावणारी प्रवरा नदी पुढे येऊन शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरली. दुसरे महायुद्ध सुरू असतांना इंग्रज सरकारने भंडारदरा येथे धरण बांधले. धरणाचे पाणी शेतकऱ्यांना आणि येथील उद्योगांना मिळु लागले. त्यातील डावा आणि उजव्या कालव्यामुळे हे पाणी सर्वत्र फिरले. प्रवरा नदीच्या सर्व गावांना, शेतकऱ्यांना नियमित पाणी मिळु लागले. प्रवरा नदीवर अकोले,संगमनेर,श्रीरामपूर,नेवासा असे तालुक्याची ठिकाणे असुन छोटे मोठे गावे आणि शहरं आहेत. त्यांना नियमित पाणी पुरवठा करणारी प्रवरा आता अमृतवाहिनी झाली आहे. पण याच गंगेला आता गटारीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. वाढत्या आधुनिकतेच्या जगात मानवनिर्मित सांडपाणी, घनकचरा, शहरातील गटारे, साखर कारखान्याचे दूषीत पाणी, दूध कारखान्याचे सडलेले पाणी, नदीच्या कडेला असलेले स्वच्छता गृह यामुळे मोठ्या प्रमाणात  जलप्रदूषण होत आहे.         नदी पात्रातील अमर्याद वाळु उपसामुळे पात्रातील खड्यात गटारीचे डबके निर्माण होत आहे. आणि याच डबक्यातील पाणी ...

सोनू निगमला धक्काबुक्की: ठाकरे गटाच्या नेत्या सुप्रदा फातर्पेकर यांनी मागितली माफी

Image
  ठाकरे गटाच्या नेत्या सुप्रदा फातर्पेकरांनी मागितली माफी; सांगितला धक्काबुक्कीचा घटनाक्रम! सुप्रदा फातर्पेकर व सोनू निगम  मुंबई प्रतिनिधी: चेंबूर येथील एका कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम याला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार सोमवारी रात्री उशीरा घडला. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायल होऊ लागला आहे. ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांचे पुत्र स्वप्नील फातर्पेकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांवर सोनू निगमला धक्काबुक्की करण्याचा आरोप आहे. सोनू निगमनं यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी वातावरण तापत असतानाच आरोपी ठाकरे गटाच्या आमदारांचा मुलगा असल्यावरून राजकीय टीका-टिप्पणीही होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश फातर्पेकर यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुप्रदा फातर्पेकर यांनी घडलेला घटनाक्रम ट्विटरवर सांगितला आहे. २० फेब्रुवारी रोजी चेंबूरमध्ये एका कॉन्सर्टमध्ये सोनू निगम यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर ते स्टेजवरून खाली उतरत असताना त्यांना धक्काबुक्की झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. स्वप्नील फातर्पेकर यांनी सो...

शिवसेना गमावल्यावरही उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या

Image
उद्धव ठाकरे का व कुणामुळे आलेत अडचणीत सविस्तर विश्लेषण  शिवसेना पक्ष आणि त्यांचं धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंच्या पक्षाला द्यायचा निकाल निवडणूक आयोगाने दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत.  मुंबई, 20 फेब्रुवारी :   शिवसेना पक्ष आणि त्यांचं धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंच्या पक्षाला द्यायचा निकाल निवडणूक आयोगाने दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. एवढच नाही तर त्यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली आहे. या पत्रकार परिषदेतून ठाकरे चांगलेच संतापलेले बघायला मिळाले. 'घरफोडी केलेली आहे, दरोडा घातला आहे. जेवढं काही आपल्या खोक्यात घालता येईल तेवढं घातलं आहे. पोलीस चोराला सांगत आहेत, यांची दोन-तृतियांश मालमत्ता तुझ्याकडे आहे, त्यामुळे उरलेली मालमत्ताही तुझीच आहे. याला लोकशाही मानायची का? निवडणूक आयोगाने जो काही निकाल दिला आहे, हा निकाल अत्य...

आत्महत्या: लग्न कर नाहीतर घरी सारी बिरादारी घेऊन येतो

Image
 औरंगाबाद जवळील वाळूंज येथे तृतीयपंथीय च्या जाचास कंटाळून आत्महत्या        औरंगाबाद प्रतिनिधी: तृतीयपंथीय च्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका 29 वर्षीय तरूणाने आत्महत्या  केल्याची घटना औरंगाबादच्या वाळूज परिसरातील सावतानगरमध्ये समोर आली आहे.           पैशांची मागणी करीत लग्न कर नाही, तर तुझ्या घरी माझ्या बिरादरीच्या लोकांना आणून गोंधळ घालून तुझी बदनाम करणार असं ब्लॅकमेल तृतीयपंथीयाकडून करण्यात आलं होतं. त्यामुळे झालेल्या त्रासाला कंटाळून या तरूणाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी रात्री कमळापूर रस्त्यावरील रांजणगाव परिसरातील सावतानगर येथे घडली. सागर बाबुराव कोंगळे (वय 29 वर्षे, रा.न्यू हनुमानगर, गारखेडा) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.         याबाबत अधिक माहिती अशी की, सागर कोंगळे हा वाळूज औद्योगिक परिसरातील एका खाजगी कारखान्यात कामाला होता. दरम्यान दोन महिन्यापूर्वी तो ओएसिस चौकात ज्यूस पित असताना त्याची ओळख एका तृतीयपंथीसोबत झाली होती. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यामुळे गेल्या...

शिवसेना व धनुष्यबाण गेल्यावर उद्धव ठाकरे चा मातोश्रीबाहेर शिंदे व भाजप वर टीकास्र

Image
  उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना व धनुष्यबाण गेल्याने ठाकरे उद्विग्न  संपादकीय : सहदेव भि.जाधव         मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे  शिवसेना पक्ष  अधिकृतरित्या निवडणूक आयोगाने सुपूर्द केली आहे.  यात धनुष्यबाण हे चिन्ह देखील शिंदे ना मिळाले आहे. त्यामुळे शिवसेनेत आनंदाचे वातावरण आहे तर ठाकरे समर्थकांत मात्र मोठी नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज ठाकरे यांनी मातोश्री बाहेर येत आलिशान गाडीतून समर्थकांना संबोधित केले. यावेळी ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पंतप्रधान मोदींवर देखील सडकून टिका केली.          निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी आज मातोश्रीबाहेर गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओपन जीपमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण चोरलं गेलंय, पण त्यांना माहिती नाही त्यांनी मधमाशांच्य...

पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा व महिला मेळावा उत्साहात संपन्न.

Image
  वॉटर शेड ऑर्गनायझेशन संस्थेचे कार्य कृषी विभागाला दिशादर्शक ठरेल- अभिमन्यू काशीद  आष्टी प्रतिनिधी :- वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट पुणे यांच्या वतीने दांडेगाव तालुका भूम हे गाव संस्थेने दत्तक घेऊन कृषी विभाग जिल्हा उस्मानाबाद व भूम तालुक्याच्या कृषी विभागाच्या सहकार्याने गावामध्ये शेतकऱ्यांसाठी जलसंचय कार्यक्रमांतर्गत गावामध्ये माती व पाणी यावरती मोठ्या प्रमाणावर काम केले गेले. गावामध्ये ५० बोरवेलचे पुनर्भरण केले, त्याचबरोबर ५० शेततळे तयार करण्यात आले, ओढ्यावरती सिमेंट बंधारे बांधण्यात आले, तसेच जाळी बंधारे बांधण्यात आलेे, गावांमधील सामाजिक विकासासाठी महिलांना व पुरुषांना प्रशिक्षण देण्यात आले. अनेक बचत गट तयार करण्यात आले. तसेच परिसरातल्या गावाच्या प्रशिक्षण सहली चे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे गावाचा विकास होण्यास मदत झाली. यामध्ये शेतकऱ्यांचा श्रमदानाचा सहभाग होता परंतु या प्रकल्पाची मुदत संपत आल्याने झालेला बदल या वरती आधारित पौष्टिक तृणधान्य पाककृती स्पर्धा व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा कृषी अधीक्षक व नोडल अधिकारी स्मार्ट प्...

मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

Image
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. मुंबई, 12 फेब्रुवारी   :   महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून राजीनाम्यावर अखेर मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्या कित्येक महिन्यांपासून महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. दरम्यान राज्यपालांवर विरोधकांनी टीकाही केली होती.       राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय 13 राज्यांचे राज्यपालही बदलण्यात आले आहेत.      अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, सिक्कीमचे राज्यपाल म्हणून लक्ष्मण प्रसाद आचार्य, झारखंडचे राज्यपाल म्हणून सीपी राधाकृष्णन, आसामच...