Posts

आषाढी एकादशी निमित्त अंभोरे मुस्लीम तरुणांचा अनोखा निर्णय

Image
  संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील मुस्लिम बांधवांचा स्तुत्य उपक्रम  संगमनेर प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील अंभोरे गावातील मुस्लिम बांधवानी एकत्र येत हिंदू मुस्लिम जातीय सलोखा राखण्यासाठी बकरी ईद च्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळेस ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद असल्याने हा निर्णय अंभोरे येथील मुस्लिम बांधवानी घेतला आहे.  अंभोरे येथे मुस्लिम समाज यांनी बकरी ईद च्या दिवशी एकादशी असल्याने कुर्बानी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर गावातील चिकन मटण शॉप देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी अंभोरे गावात शांतता कमिटीची बैठक पार पडली. यावेळी काही मुस्लिम तरुणांनी हा निर्णय ग्रामस्थांना कळवला असता त्यास सर्व मुस्लिम बांधवानी त्यास उत्स्फुर्द प्रतिसाद दिला. यावेळी अंभोरे गावचे सरपंच उपसरपंच त्याचबरोबर गावातील ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा निर्णय घेण्यासाठी गावातील शोएब मणियार, आरिफ मणियार, खलील मणियार, समीर मणियार, इम्रान मणियार, मन्सूर मणियार यांनी पुढाकार घेतला आहे.  जोर्वे गावातील तरुणांना हकनाक मारहाण झाल्यान...

शिवशाही फाऊंडेशन भारत च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ. प्रा.डाॅ.रिता मालचे सिनेटच्या उमेदवार

Image
प्रा.डाॅ.रिता मालचे मुबंई विद्यापीठ शिक्षक सिनेट निवडणूकीत अपक्ष रिंगणात  मुंबई प्रतिनिधी: शिवशाही फाऊंडेशन भारत च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.डाॅ.रिता मालचे हे मुबंई विद्यापीठ शिक्षक सिनेट निवडणूकीत अपक्ष रिंगणात उतरले आहेत. डाॅ.रिता मालचे मुंबई विद्यापीठात समाजशास्त्र हा विषय गेली 16 वर्षांपासून मुलांना शिकवत आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय सामाजिक संस्थामध्ये मोठया पदावर काम केले आहे. त्या संशोधक व लेखिका आहेत. गेली 20 वर्षे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्या काम करत आहेत. आदिवासी लोकांसाठी त्यांचे मोठे काम आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करणे व कोणतेही काम उत्कृष्ट रित्या पार पाडणे यात त्यांचा हातखंडा आहे.  समाजासाठी काम करणे हा त्याचा स्वभावगुण आहे. समाजात राष्ट्रीयत्व, बंधुता ,न्याय, समता या भावना निर्माण करणे व उपेक्षित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्या सदैव प्रयत्नशील असतात. डाॅ. रिता जी प्राध्यापकांच्या हितासाठी व उन्नतीसाठी, विविध प्रश्नांवर आंदोलन व निवेदन देऊन मागण्या विद्यापीठाकडून मान्य करून घेतल्या आहेत. प्राध्यापकांच्या प्रश्नांवर न्याय हक्कासा...

बेलापुर धरण भविष्यातील धोक्याची घंटा. पाटबंधारे विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

Image
बेलापूर धरणाच्या इंटेक वेलची दुरुस्तीची मागणी. प्रतिनिधि_सतीश फापाळे       (बेलापूर) अकोले तालुक्यातील पठार भागासाठी जीवनदायनी म्हणून संबोधले जाणारे बेलापुर येथील धरणाच्या मोरिवरिल इंटेक वेलची दुरवस्था झालेली आहे.येथील धरणातील पाणी सोडण्याच्या मोरीच्या इंटेक वेलची संरक्षण भिंत पडली असल्याने भविष्यात पाणी प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असून भविष्यात बेलापूर धरण धोक्याची घंटा बनले आहे.     पठार भागातील बेलापूर येथील धरण जाचकवाडी, पवारवाडी , गोपाळवाडी, बेलापुर, चैतन्यपुर, भक्ताचीवाडी, बदगी, जांभळे, ब्राम्हणवाडा,काळेवाडी अशा विविध गावांच्या शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाचे मानले जात असून हे पठार भागासाठी जीवनदायनी म्हणून संबोधले जाते आहे.पावसाळा ऋतू सुरू झाला आहे.मात्र पावसाने दडी मारली असली तरी बेलापुर धरणावरील पाणी सोडण्याच्या मोरीवरील इंटेक वेलची संरक्षक भिंत कोसळली आहे. वारंवार पाटबंधारे विभागास या बाबत माहिती ग्रामपंचायतच्या माध्यमातून देण्यात आली आहे.पत्र व्यवहार देखील करण्यात आले आहे.परंतु पाटबंधारे विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्य...

विरोधक एकवटले गणेश वर विजय मिळवत शिर्डी विधानसभा काबीज करण्याची दर्पोक्ती:

Image
गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक: पराभव कुणाचा विखेंचा की कोल्हेंचा  संपादकीय विश्लेषण / सहदेव जाधव   गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अखेर विखे विरोधकांची महत्वाकांक्षा पूर्ण झाली. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विखेंचा पराभव म्हणजे थेट जसे काही पांडवांकडून कौरवांनी इंद्रप्रस्थ जिंकल्याचा आनंद आज विखे विरोधकांना झाला. आमदार निलेश लंके तर थेट पारनेर वरून आपली कामे सोडून शिर्डीत दाखल झाले. परंतु हा विजय नक्की कुणाचा समजावा याचे देखील विवेचन होणे गरजेचे आहे.          गणेश सहकारी साखर कारखाना हि निवडणूक तशी कोल्हे आणि विखे यांच्यातील लढाई... परंतु संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात, श्रीरामपूरचे करण ससाणे, सचिन गुजर, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, दंडवते, त्याच बरोबर सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते यांनी कारखान्याचे हीत एका बाजूला ठेऊन फक्त विखेंचे पानिपत हा एकच अजेंडा समोर ठेवला. व याचे सर्व सूत्र हि संगमनेरच्या हाती सोपवण्यात आली. संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी मिळालेल्या संधीचे सोनं करून घेतले व सर्व विखे विरोधकांनी आज राहात्यात दिवाळी...

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच

Image
गणेश सहकारी साखर कारखाना कोल्हेंचे नामोहरण करण्यासाठी आहे..?  संपादकीय : सहदेव जाधव  अहमदनगर जिल्ह्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याचा प्रचार शिगेला पोहचला असून अगस्ती कारखान्याच्या धरतीवर थोरातांनी व्यूहरचना आखलेली दिसत आहे. परंतु यात नुकसान कुणाचे हे जनतेला माहिती होणे देखील गरजेचे आहे. म्हणून हे स्पष्टीकरण गणेश परिवारासाठी मांडत आहोत. गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक ही आपापसातील सूड उगविण्यासाठी घेतली का..? हा प्रश्न प्रथम उभा राहतो.            या निवडणुकीच्या आडून थोरातांकडुन विवेक कोल्हेंना बोटाशी धरून भाजपात फुट पाडण्याचा प्रयत्न आहे आणि हा डाव थोरातांचा यशस्वी झालेला दिसत आहे. तसेही कोल्हे राष्ट्रवादी सोडुन भाजपात गेल्या नंतर मागील  विधानसभा सोडल्यास त्यांच्या पदरात हवे तसे यश पडलेले दिसत नाही. मागिल जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये पराभव, विजय वहाडणे कडुन नगरपरिषदेत पराभव व त्यानंतर विधानसभेत पराभव अशी पराभवाची मालिका कोल्हेंच्या नशिबी आली आहे. पक्षात देखील विखेंच्या पक्ष प्रवेशाने नाराज झालेले कोल्हे हे पिछाडीवर गेले ते पिछाडीवरच राहि...

गणेश कारखाना निवडणूक: थोरातांची महत्वकांक्षा पण कोल्हेंची राजकीय सुसाईड

Image
गणेश कारखाना निवडणुक: विखे - थोरात वादात कोल्हेंचे राजकारण संपुष्टात..? संपादकीय: सहदेव जाधव  राहाता : गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत असून गेली कित्येक दिवसांपासून कोल्हेंचे वर्चस्व असलेला हा कारखाना मागील काही वर्षांपासून विखे पाटील यांनी चालवायला घेतला आहे. आता या कारखान्यावर थोरातांचा डोळा असून त्यांनी कोल्हेंच्या माध्यमातून विखेंना शह देण्याचे ठरविले आहे. यात आता थोरातांनी प्रथमच थेट सीमोल्लंघन करण्याचे धाडस दाखवले आहे. यात थोरातांचा राजकीय सुड उगविण्याचा नाममात्र इच्छाकांक्षा असून खरे नुकसान मात्र कोल्हेंचेच होणार आहे.            काही काळापुर्वी गणेश वर शंकरराव कोल्हे यांचे वर्चस्व होते. मात्र आजची परिस्थिती ही वेगळी आहे. आता संगमनेर वगळता सर्व तालुक्यांमध्ये विखे पॅटर्न सक्सेस ठरलेला आहे. त्यामुळे आता कोल्हे यांनी विखेंशी धरलेले वैर हे राजकीय आत्महत्या ठरणार नाही ना..? असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. विखे आणि थोरात यांच्यात विळा कणीसाचे नाते आहे. त्यातच आता गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक त्यात थोरातांनी केलेली घुसखोरी ही नक्कीच...

हैवानालाही लाजवेल असे कृत्य प्रियशीला मिक्सरमध्ये दळले

Image
कटरने केले प्रियेसीच्या धडाचे तुकडे..नंतर मिक्सरमध्ये बारीक केले हैवानाचा चेहरा/पिडीत महिला  मुंबई ब्युरो रिपोर्ट         मुंबईत क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडणारी हत्येची एक भयंकर घटना उजेडात आली आहे. या प्रकरणात आरोपीने आपल्या लिव्ह इन पार्टनरचे लाकूड कापणाऱ्या इलेक्ट्रीक करवतीने तुकडे केले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने आरोपीला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बुधवार दिनांक 7 जून रोजी सायंकाळी पोलिसांचे एक पथक अचानक मीरा रोडवरील गीता आकाश दीप सोसायटीत पोहोचले. तिथे ते दुर्गंधी येत असल्याची तक्रार मिळालेल्या फ्लॅटवर पोहोचले. 7 व्या मजल्यावरील या फ्लॅटमध्ये पोहोचताच पोलिसांना धक्काच बसला. कारण दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरणाबाबत त्यांनी मीडियामध्ये जे काही वाचले व ऐकले होते, ते तिथे त्यांना प्रत्यक्ष पहावसाय मिळाले. रक्ताने माखलेले 3 कटर जप्त पोलिसांना फ्लॅटमधून एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. सरस्वती वैद्य असे या महिलेचे नाव आहे. पोलिसांना घटनास्थळी झाडे तोडण्यासाठी वापरण्यात येणारे 3 कटर आढळले. हे तिन्ही कटर रक्ताने...