Posts

अकोले बाजार समितीची निवडणूक जाहीर १५९ अर्ज दाखल

Image
आजी माजी आमदार डॉ. किरण लहामटे आणि वैभव पिचड यांच्यात पुन्हा एकदा चुरस    अकोले प्रतिनिधी: अकोले बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. अकोले बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यात आजी माजी आमदार यांच्यात पुन्हा एकदा चुरस अनुभवायला मिळणार आहे. डॉ. किरण लहामटे आणि वैभव पिचड या आजी-माजी आमदारांनी उमेदवारी अर्ज भरल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे. अकोले कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूकीत पहिल्यांदाच शेतकऱ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळाल्याने शेतकरीसुद्धा या निवडणुकीत आपले नशीब आजमावू शकतात. अकोले बाजार समिती निवडणुकीत अखेरच्या दिवशी सोमवारी तब्बल १५९ अर्ज दाखल झाले.        या निवडणुकीतून १८ सदस्य निवडले जाणार आहेत. या निवडणुकीत मतदारांची संख्या ही २ हजार ४७० एवढी आहे. निवडणुकीसाठी ३ एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. या निवडणुकीसाठी एकूण १५९ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जाची छाननी ५ एप्रिल रोजी होणार आहे. तसेच २० एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. ३० एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतमोजणी होऊन निक...

अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले: गंभीर आरोप

Image
दीपाली सय्यद यांच्याबरोबर रामदास आठवले आणि नितीन गडकरी यांचे आर्थिक संबंध   अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे, असा दावा त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांच्याशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. अहमदनगरात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाऊसाहेब शिंदे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी पाकिस्तानच्या बँकेत दीपाली सय्यद यांचे बँक खाते असल्याचा पुरावा त्यांनी दिला आहे. तर भाजपच्या दिग्गज नेत्यांना हे सर्व माहिती असून केवळ आर्थिक हितसंबंधामुळे त्यांना पाठीशी घातले जाते असा आरोप शिंदे यांनी केला आहे. यापुढे दीपाली सय्यद यांच्यावर काही कारवाई करण्यात आली नाही तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात फिरू देणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.   भाऊसाहेब शिंदेंचे आरोप दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानामध्ये एक बँक खाते असल्याचा खळबळजनक दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पा...

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी उपलब्ध केला नेवाशासाठी मोठा निधी

Image
  नेवासा नगरपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्स साठी दोन कोटी निधी मंजूर.      नेवासा प्रतिनिधी: (सलमान शेख) नेवासा शहरामध्ये नवीन व्यापारी संकुल उभे करावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून वारंवार माजी आमदार मुरकुटे यांच्याकडे करण्यात येत होती. नेवासा एक तीर्थक्षेत्र आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग नेवासा तालुक्यातून जात असल्याने नेवास्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात विस्तृत होत आहे. या विस्तारीकरणामुळे व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी जागेची तसेच संकुलाची आवश्यकता होती. व्यापारी संकुल नसल्याने व्यापाऱ्यांना अडचणी निर्माण होत आहे. या अडचणी व्यापाऱ्यांनी वेळोवेळी माजी आमदार मुरकुटे यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवासा येथे नवीन व्यापारी संकुलाची मागणी केली 2018 मध्ये केली होती.         नेवाशामध्ये 110 गाळे व्यापारी संकुला करिता सव्वातीन कोटी रु.निधी मंजूर केला होता यापैकी 44 गाळ्यांचेच काम पूर्ण झाले. उर्वरित निधी सत्ता बदल झाल्या नंतर इतर ठिकाणी वापरण्यात आला..असा आरोप काही व्यापारी वर्ग करत होता. त्यामुळे हे व्यापारी सं...

संगमनेर येथे जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा

Image
जिल्हास्तरीय जागतिक ग्राहक दिन समारंभ संगमनेर येथे साजरा संगमनेर प्रतिनिधी: आज दिनांक १५/०३/२०२३ रोजी श्रीमती जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर, किशोर कदम सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर यांचे प्रमुख उपस्थितीत व ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य संगमनेर तालुका अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर राक्षे यांचे अध्यक्षतेखाली संगमनेर तहसिल कार्यालयामध्ये जागतिक ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.        याप्रसंगी अमोल निकम, तहसीलदार संगमनेर, शीतल घावटे, परिविक्षाधीन तहसीलदार, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव सुरेश राहणे, दिनेश थोरात, संगमनेर तालुका अध्यक्ष विनायक वाडेकर, सर्जेराव वाघ, सचिन गिरी, सौरभ म्हाळस ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य संगमनेर तालुका सचिव, कारभारी देव्हारे, कायदेशीर सल्लागार गोडसे सर, तसेच वजनमापे निरीक्षक फटांगरे, व संगमनेर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार आणि मोठ्या संख्येने ग्राहक व नागरिक उपस्थित होते.       कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून व मान्यवरांचा सत्कार करून करण्...

शहापूर घोटी विशाखापट्टणम महामार्गाला मान्यता मिळणार

Image
शिंदे फडणवीस सरकारने शहापूर विशाखापट्टणम हायवेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला  नेवासा प्रतिनिधी : शहापूर घोटी विशाखापट्टणम या राज्य मार्गाला ( राज्यमार्ग क्रमांक 50 ) राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करून या मार्गाचे चौपदरीकरण व्हावे असा प्रस्ताव राज्य शासनाच्या वतीने केंद्राकडे सादर करण्यात आला आहे. नेवासा तालुक्यातील कुकाना हे गाव राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर येणार आहे.           याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहापूर घोटी  विशाखापट्टणम( व्हाया अकोले - संगमनेर - श्रीरामपूर - नेवासा -  शेवगाव - गेवराई ) या राज्य मार्गाला केंद्र सरकारकडून 2017 मध्ये नवीन राष्ट्रीय महामार्ग म्हणून तत्वतः मान्यता मिळाली होती. या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित होण्यासाठी स्व. माजी खासदार दिलीप गांधी, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यामुळे  सार्वजनिक बांधकाम खात्याने यावर योग्य ती कार्यवाही करून दि २०/०९/२२ रोजी  सार्वजनिक बांधकाम खात्याकडून  राज्य शासनाकडे प्...

नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी शिंदे फडणवीस सरकारची मोठी घोषणा

Image
नाभिक समाजासाठी श्री संत सेना महाराज केश शिल्पी महामंडळाची स्थापना      समनापूर प्रतिनिधी -: महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाने राज्य सरकारकडे वंचित नाभिक(न्हावी) समाजासाठी श्री संत सेना महाराज केश कला शिल्प मंडळाची तसेच विविध मागण्यांसाठी सरकारकडे वेळोवेळी निवेदन देऊन मागणी केली होती. गुरुवार दि.9 मार्च रोजी महाराष्ट्र सरकारने विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत सेना महाराज केश कला शिल्पी मंडळाची घोषणा करून 50 कोटी रु. तरतूद केली. महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष दत्ता शेठ अनारसे, नागपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व भाजपचे ज्येष्ठ नेते बंडूभाऊ उर्फ सुधीर राऊत, दिलीप अनर्थे, विकास मदने, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे, दक्षिण जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब व्यवहारे, जिल्हा उपाध्यक्ष संजय कदम, महिला जिल्हाध्यक्षा प्रियंकाताई जाधव, यांनी शासनाकडे वेळोवेळी मागणी केली होती. नाभिक समाजाच्या विविध मागण्यांची दखल घेऊन राज्य सरकारने केश कला शिल्पी मंडळाला मान्यता दिली.  ...

प्रवरामाई ला गंगेचे रुप आणण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी एकत्र या

Image
प्रवरामाई च्या यातना संगमनेरकरांना कधी कळणार..? संपादकीय: सहदेव जाधव  संगमनेर(प्रतिनिधी): सह्याद्रीच्या कुशीतुन उगम पावणारी प्रवरा नदी पुढे येऊन शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरली. दुसरे महायुद्ध सुरू असतांना इंग्रज सरकारने भंडारदरा येथे धरण बांधले. धरणाचे पाणी शेतकऱ्यांना आणि येथील उद्योगांना मिळु लागले. त्यातील डावा आणि उजव्या कालव्यामुळे हे पाणी सर्वत्र फिरले. प्रवरा नदीच्या सर्व गावांना, शेतकऱ्यांना नियमित पाणी मिळु लागले. प्रवरा नदीवर अकोले,संगमनेर,श्रीरामपूर,नेवासा असे तालुक्याची ठिकाणे असुन छोटे मोठे गावे आणि शहरं आहेत. त्यांना नियमित पाणी पुरवठा करणारी प्रवरा आता अमृतवाहिनी झाली आहे. पण याच गंगेला आता गटारीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. वाढत्या आधुनिकतेच्या जगात मानवनिर्मित सांडपाणी, घनकचरा, शहरातील गटारे, साखर कारखान्याचे दूषीत पाणी, दूध कारखान्याचे सडलेले पाणी, नदीच्या कडेला असलेले स्वच्छता गृह यामुळे मोठ्या प्रमाणात  जलप्रदूषण होत आहे.         नदी पात्रातील अमर्याद वाळु उपसामुळे पात्रातील खड्यात गटारीचे डबके निर्माण होत आहे. आणि याच डबक्यातील पाणी ...