Posts

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे बेताल वक्तव्य

Image
अजित पवार यांच्या त्या वक्तव्या बद्दल भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने तहसीलदाराना निवेदन    महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्या बाबत महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत असे बेताल वक्तव्य करून सबंध हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.  माजी उपमुख्यमंत्री व अत्ताचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनि धर्मासाठी दिलेले बलिदान विसरले आहेत. ज्या औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ केला, धर्म बदला म्हणून ४० दिवस अतोनात त्रास दिला, शरीराचे एक एक अवयव काढून क्रूर अशी हत्या करण्यात आली. तरी देखील त्यांनी धर्म बदला नाही असे एकवचनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज होते. तरीही जाणीवपूर्वक त्यांची हेटाळना करण्याच्या उद्देशाने विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केलेले बेताल वक्तव्य हे हिंदू धर्मियांचे मन दुखावणारे आहे.  भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचा वतीने अजित पवार यांनी केलेल्या धर्मवीर छत्...

बाळासाहेब मुरकुटे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

Image
  मुळा धरणातून आवर्तन सोडण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन.. मा.आ.बाळासाहेब मुरकुटे....    राजसत्ता वृत्तसंस्था  नेवासा प्रतिनिधी: मुळा धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये पाट पाण्याची रब्बी हंगामातील पिकासाठी अत्यंत आवशकता असून, धरणातून मुळा उजव्या कालव्याला आवर्तन तातडीने सोडण्याचा निर्णय घ्यावा. या मागणीसाठी नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.राधाकृष्णजी विखे पाटील यांची भेट घेतल्याचे सांगून शेतीसाठी मुळा धरणातून आवर्तन सोडावे आशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे होते. नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांची आज कांदा, गहू, हरभरा,ऊस लागवड चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्याला पाटपाण्याची आवशकता असून, तालुक्यात ऊसाचे पिक अद्याप मोठ्या प्रमाणात उभा आहे. अशा पिकाला पाणी देण्याचा प्रश्न शेतकऱ्यान समोर उभा राहिल्याने धरणातील आवर्तनास उशीर झाल्यामुळे तातडीने आवर्तन करावे. कारण उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे विहिर व बोरचे पाणी पातळी कमी झाल्याने शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा प्रश्न उभा राहू शकतो.  धरण...

डॉ.भानुदास जी.डेरे शैक्षणिक संस्थेत विविध गुणदर्शन कार्यक्रम साजरा

Image
डॉ.भानुदास जी.डेरे इंग्लिश मिडीयम स्कूल व जुनिअर कॉलेजचा परितोषिक वितरण सोहळा संपन्न.. संगमनेर प्रतिनिधी : दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी डॉ.भानुदास जी. डेरे इंग्लिश मिडीयम स्कूल व जुनिअर कॉलेजचा सहशालेय व क्रिडा महोत्सव चा बक्षीस वितरण कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पालकांना आमंत्रित केले होते. यावेळी संजय उपाध्ये , खंडागळे विजय , गोपाळे रवींद्र , हासे रतन , दिघे कमल , व भवर अश्विनी हे उपस्थित होते. कार्यकमाची सुरवात सरस्वती पूजनाने झाली, पाहुण्याचा सत्कार मुख्यकार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. शाळे मध्ये चार संघा मध्ये स्पर्धा घेण्यात आल्या त्या मध्ये विजेता संघ म्हणून मार्स हाउस याला करंडक देऊन गौरवण्यात आले .प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना श्री उपाध्ये संजय यांनी जिद्द व चिकाटीचे महत्व पटवून देताना यश कसे मिळवायचे याचा कानमंत्र दिला .  खंडागळे विजय यांनी एकाग्रता ,कष्ट ,व निष्टा या गुणांना शालेय जीवनात किती म्हत्वाचे स्थान आहे हे अधोरेखित केले .या प्रसंगी सौ आशालता शेट्टी ,मुख्याध्याप...

चैतन्यपूर गावासह सरपंच बसणार बेमुदत आमरण उपोषणाला

Image
त्या दोन आधिकाऱ्यांची भ्रष्टाचाराची चौकशी करून निलंबित करा. प्रतिनिधी सतिश फापाळे /राजसत्ता न्युज      अकोले तालुक्यातील पठार भागातील चैतन्यपूर गावातील शेतकरी व गावचे सरपंच यांना चोर संबोधून गावचा व सरपंच पदाचा अपमान केला.महावितरन कंपनीचे दोन आधिकारी यांनी आधिकाराचा गैरवापर करून कारवाया केल्या आहेत. आपल्या हुकमी व मनमानी कारभारातून त्यांचे कार्यकाळात अनैतिक माया जमविली.त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांना निलंबित करा.अशा विविध मागण्यांनसाठी गुरुवार दिनांक २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता पासून चैतन्यपूर गावासह परिसरातील नागरिक ,ग्रामपंचायत सरपंच,व  सरपंच नितीन डुंबरे  ते दोन आधिकारी निलंबित करा, त्यांचे भ्रष्टाचाराची चौकशी करा अशा विविध मागण्यानसाठी बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत.        गेल्या पंधरा दिवसापासून चैतन्यपूर गावातील विद्युत रोहित्र (डिपी) खराब झाले होते.त्याबाबत विद्युत रोहित्र (डीपी) साठी बिल पावती भरली होती.चार दिवसापासून विद्युत रोहित्र (डीपी) घेऊन निघालेली गाडी न पोहचल्याने शेतकरी हैराण झाले होते. शेतकऱ्यांची कांद...

जांभूळवाडी ग्रा.पं. निवडणूक: बुवाजी खेमनर व महादू कुदनर यांच्या नेत्रुत्वाची सरळ लढत

Image
जांभूळवाडी ग्रुप ग्रामपंचायत निवडणूकीत चुरस वाढली  संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील जांभूळवाडी  ग्रा.पं. ची निवडणूक मोठी प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपचे नेते बुवाजी पाटील खेमनर व काँग्रेसचे महादू पाटील कुदनर यांच्या नेतृत्वात दोन्ही पॅनल उभे आहेत. जांभूळवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत एकूण 20 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहे. ही निवडणूक नात्या गोत्यात अडकल्याने नेमका कोण बाजी मारेल याचा अंदाज सहज लागणार नाही.          एक जागेचा विषय वगळता जवळ जवळ एकास एक उमेदवार असल्याने मोठी काट्याची टक्कर बघायला मिळणार आहे. मागील निवडणुकीत बुवाजी खेमनर व महादू कुदनर यांच्यात सरळ लढत झाली होती. या लढतीने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले होते. त्या निवडणुकीत बुवाजी खेमनर यांनी एकाकी लढत दिली होती. आपले सर्व सहकारी महादू पाटील कुदनर यांच्या सोबत गेल्याने बुवाजी पाटील खेमनर एकाकी पडले होते. आणि त्यांचा त्या निवडणुकीत निसटता पराभव झाला होता. परंतु या निवडणुकीत मात्र सरपंच पद हे महिला आरक्षित असल्याने या निवडणुकीत या दोन्हीही मातब्बरांना नेत्रुत्व करणे हाच पर्याय योग्य ...

जाचकवाडीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न

Image
डॉ बिपिन महाले यांचे स्मरणार्थ भव्य आरोग्य तपासणी शिबिर. (प्रतिनिधी: सतिश फापाळे)      अकोले तालुक्यातील जाचकवाडी गावात स्वर्गीय डॉ बिपिन महाले यांचे स्मरणार्थ गुरुवार दि.८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.       जाचकवाडी गावातील डॉ बिपिन महाले यांचे समाजाप्रती विलक्षण आस्था होती.गोर गरीबांची सेवा करत त्यांनी समाजसेवा केली होती.डॉ बिपिन यांचे स्मरणार्थ आयोजित शिबिरात ब्लड प्रेशर,ब्लड शुगर लेव्हल तपासणी, ई.सी.जी,हृदय तपासणी, पल्स रेट तपासणी, ऑक्सिजन लेव्हल,वजन,उंची तपासणी करून उपचार देखील करण्यात येणार आहे.      हे शिबिर जाचकवाडी, बेलापूर ग्रामस्थ,श्रीराम हॉस्पिटल बेलापुर व मेडिकव्हर हॉस्पिटल संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले असून या शिबिरासाठी डॉ. सुशांत गीते, डॉ.अंतोष हांडे,डॉ सागर फापाळे सारखे नामवंत डॉक्टर या शिबिरात सेवा देणार आहे.

वीजप्रश्नी कायम स्वरुपी तोडगा काढा - बाळासाहेब मुरकुटे

Image
  शेतकऱ्यांच्या वीज प्रश्ना बाबतीत कायम स्वरुपी तोडगा काढावा: मा.आ.मुरकुटे         मुंबई (राजसत्ता वृत्तसंस्था)  मा.आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी 06/12/2022 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंञी देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंञी व उपमुख्यमंञी यांच्या लक्षात आणुन दिले की, आपले वीज कनेक्शन तोडु नये असे आदेश असताना देखील ,शेतकऱ्यांनी थकित वीज बील न भरल्यामुळे वीज तोडणी मोहीम वितरण कंपनीने हाती घेतली आहे.         याअनुषंगाने शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम तात्काळ थांबवावी , मागील वीजबील माफ करुन यापुढे नवीन वीज धोरणाचा अवलंब करावा, शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने १२ तास विद्युत पुरवठा मिळावा,सुधारीत दराने वीजबील आकारणी करावी, सोप्या पध्दतीने शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळावे, तसेच शेतकऱ्यांना वीजेसाठी सबसिडी देऊन वरील सर्व धोरणाची दि.१ जानेवारी २०२३ पासुन अमलबजावणी करावी याकरिता मा.आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले.* बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा संपादक: सहदेव जाधव...