राहत्यात गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायाद्याचे सर्रास उल्लंघन राहाता शहरात तसेच ग्रामीण भागातील एका गावात गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायाद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. राहाता शहरात नगर मनमाड हाय वे वर हे सेन्टर खुलेआम सुरु आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागाचा या सेंटर ला अर्थपूर्ण सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे आरोग्य विभाग या सोनोग्राफी सेंटर कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे समोर येतंय. आम्ही या सर्व सोनोग्राफी सेंटर सह गर्भपात करणाऱ्या हॉस्पिटल चे स्टिंग ऑपरेशन केले असता या डॉक्टर महोदयांचा काळा प्रताप समोर आला. त्याची सविस्तर माहिती अशी... घटना नंबर 1: शेवगाव येथील एका महिलेला डमी कस्टमर म्हणून आम्ही पाठवले... संबंधित महिलेला एजेंट च्या माध्यमातून राहाता येथील एका सोनोग्राफी सेंटर वर पाठवले. सदर महिलेने सोनोग्राफी सेंटरला छुप्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्व घटनाक्रम चेक केला. त्यानंतर डॉक्टर व त्याचा असिस्टंट यांनी मुलगी असल्याचे सांगितले. व त्यानंतर गर्भ खाली करायचा का अशी विचारना केली. परंतु महिला व तिचा पती यांनी हो असे उत्तर दिले असता राहाता येथील एका मोठ्या दवाखान्यात हा...
Posts
आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ
- Get link
- X
- Other Apps

आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाला समाविष्ट करून घ्यायच्या हालचाली आदिवासींचा तीव्र विरोध बोटा प्रतिनिधी: सतिश फापाळे: महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी,धनगर समाजाच्या आरक्षणाचा तीव्र प्रश्न निर्माण होतांना दिसून येत आहे. अशातच गुरूवार दि.२१ सप्टेंबर रोजी अतिथी गृहावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, संबंधित खात्यांचे मंत्री व राज्यातील धनगर समाजाचे लोकप्रतिनिधी यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाला समाविष्ट करून घ्यायच्या हालचाली सरकारच्या दिसत असल्याने महाराष्ट्रतील आदिवासी समाजाने या गोष्टीला तीव्र विरोध केला आहे. आदिवासींमध्ये धनगर समाजाचा समावेश करण्याचा प्रयत्न सरकारने केल्यास मोठ्या संख्येने आदिवासी समाज रस्त्यावर येईल असा इशारा अकोले तालुक्याचे मा. उपसभापती मारुती मेंगाळ यांनी त्यांचे प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे. अवघ्या महाराष्ट्रात सध्या आरक्षणावरून चांगलेच वातावरण पेटतांना दिसत आहे.मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी, धनगर या दोन्ही समाजाने आरक्षणसाठी आंद...
पावसा अभावी चार एकर सोयाबीन पिकावर शेतकऱ्यानं फिरवला नांगर.
- Get link
- X
- Other Apps

पाऊसा अभावी हतबल शेतकऱ्यांने सोयाबीन पिकावर फिरवला नांगर प्रतिनिधी_सतिश फापाळे संगमनेर तालुक्यातील पठार भागात पावसाने पाठ फिरवली असल्याने खरीप हंगामातील विविध पिके कोमेजून गेली आहे.यात प्रामुख्याने काही सोयाबीन पिके करपली आहे.तर काही जळून गेली आहे.तर काही पिकांना शेंगाचं आल्या नाहीत.अशातच पदरी निराशा पडलेल्या नांदूर गावच्या युवा शेतकऱ्याने नाईलाजास्तव चार एकर सोयाबीन पिकावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगर फिरवत सोयाबीन पिक नष्ट केले आहे. नांदूर_खंदरमाळ गावचे युवा शेतकरी सुरेश गोपीनाथ भागवत या शेतकऱ्याने जून महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसावर आपल्या शेतीची मशागत करून सोयाबीन पिकाची पेरणी केली होती.हे पीक सुरवातीच्या पावसावर डौलदार उतरून देखील आले होते.सोयाबीन पिकाला उभारी मिळाल्या नंतर त्यात मध्यंतरी दिलासादायक पाऊस झाला.त्यावर सोयाबीन पिकाची खुरपणी करून खते टाकली गेली. कीटक नाशकांची फवारणी केली.मोठ्या काबाड_कष्टाने पिकवलेले हे सोयाबीन पीक मोठ्या जोमात होते. सोयाबीन पिक ऐन बहरात आले.फुलाची झडण झाली.थोड्या बहुत प्रमाणात...
संगमनेर तालुक्यातील पिंपळे गावात वृक्षारोपण
- Get link
- X
- Other Apps

सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून पिंपळे येथे हजारो वृक्षांचे वृक्षारोपण संगमनेर प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील अतिशय दुर्गम आणि दुष्काळी भागातील पिंपळे येथे सामाजिक कार्यकर्ते श्री ज्ञानेश्वर झाडगे पाटील आणि रेखा कोटकर यांच्यामार्फत सुमारे एक हजार पेक्षा जास्त रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. गावातील प्रत्येक घर, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक शेत येथे किमान एक झाड लावले जावे या संकल्पनेतून हा उपक्रम त्यांनी आपल्या माळरानावर राबवला. माळरानावर निसर्ग सौंदर्य फुलविणाऱ्या या दोन कार्यकर्त्यांची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. अजूनही गरजेनुसार ते रोपांची वाटप पंचक्रोशीत करणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रगतशील शेतकरी व भाजपा कार्यकर्ते ज्ञानेश्वर जाडगे, सामाजिक कार्यकर्त्या रेखा कोटकर, कविता पाटील घुगे, भाजपा तालुका अध्यक्ष सतीश कानवडे, संतोष गुंजाळ, पत्रकार काशिनाथ घुले आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या मुहर्तावर दत्तवाडी येथील महिलांनी सौ रेखाताई कोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाशीची राणी महिला बचत गट सुरू केला...
भालचंद्र नेमाडे यांनी ओकलेली गरळ पण बोलवते धनी कोण
- Get link
- X
- Other Apps
.jpeg)
भालचंद्र नेमाडे यांचे बेताल वक्तव्य म्हणजे गाढवाने कथन केलेली कथा संपादक: सहदेव जाधव दादर येथे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यक्रमात बोलताना भालचंद्र नेमाडे यांची जीभ घसरली. ही जीभ घसरली आणि अखंड हिंदुस्थान चा अवमान झाला. आता त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. औरंगजेब, पेशवे यांच्या संदर्भात नेमाडे यांनी ही वक्तव्य केली. औरंगजेबाला सर्वोच्च दर्जा देताना आपली 'साठी बुद्धी नाटी' झाल्याचे स्पष्टीकरण यावेळी नेमाडे यांनी देऊन टाकले. या माध्यमातून त्यांनी इतिहासाची पाने चुरगळून बीनअकलेचे तारे मोजले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्यावरुन हा मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपाच्या सोशल मीडिया आणि कायदेशीर सल्लागार सेलचे प्रमुख आशुतोष दुबे यांनी सोमवारी भोईवाडा पोलीस ठाण्यात भालचंद्र नेमाडे याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शनिवारी दादर येथे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यक्रमात बोलताना भालचंद्र नेमाडे यानी केलेल्या काही वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. आशुतोष दुबे यांनी भालचंद्...
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर सर्व स्तरांतून टीकेचा भडिमार
- Get link
- X
- Other Apps
.jpeg)
संभाजी भिडे गुरुजी म्हणजे हिंदुत्वाची धगधगता ज्वालामुखी संपादकीय : सहदेव जाधव भिडे गुरुजींना अटक करणे म्हणजे साक्षात सूर्याला गिळायला निघाल्यासारखे शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर सर्व स्तरांतून टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. संभाजी भिडे गुरुजीनी वक्तव्य करण्याचं आणि त्यावरून वाद होण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांनी याआधीही अशी काही वक्तव्यं केली आहेत. मनोहर भिडे यांचा जन्म १० जून १९३३ रोजी सांगली, महाराष्ट्र येथे झाला आणि आज त्यांना संभाजी भिडे किंवा गुरुजी म्हणूनही ओळखले जाते . पुणे, सांगली, कोल्हापूर , बेळगाव, मुंबई आणि सातारा येथे संभाजी भिडे पूजनीय आहेत. आणि त्यांचे अनुयायी मोठे आहेत. संभाजी भिडे गुरुजी सांगलीत राहतात. त्यांचं वय 80 वर्षे आहे. त्यांचे मूळ नाव मनोहर असं आहे. भिडे यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी आहे. भिडे गुरुजी अनेक तरुणांचे हृदय सम्राट आहेत. भिडे गुरुजींना अटक सध्या तरी अश्यक्य आहे. ‘श्र...
राहुरी तालुक्याच्या संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार धसाळ
- Get link
- X
- Other Apps

पत्रकार विनीत धसाळ यांची संजय गांधी निराधार योजना समिती च्या अध्यक्ष पदी निवड. शेख युनूस अ. नगर/ राहूरी तालुक्यातील निर्भीड, पत्रकारितेतील धारदार लेखणीतून अन्यायला वाचा फोडणारे तांदूळवाडी येथील आणि राहूरी तालुका पत्रकार विनीत आनंदराव धसाळ यांची राहूरी तालुका येथील संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की, राज्याचे महसूलमंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिफारशी नुसार व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री पै.शिवाजीराव कर्डीले आणि खासदार. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विनंती नुसार जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी राहूरी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची निवड केली आहे. पत्रकार विनीत धसाळ यांची राहूरी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या (सामाजिक क्षेत्र )अध्यक्ष म्हणून तर सदस्यपदी किरण ससाणे(अनु. जाती ), वैशाली उत्तम खुळे (महिला ), अविनाश बाचकर (विमुक्त जाती /भटक्या जमाती), अजित डावखर (सर्व साधारण ), सर्जेराव घाडगे (अपंग ),...