Posts

शिव प्रभात सेवाभावी ट्रस्ट अपहार

मांडवे बुद्रुक येथील त्या ट्रस्ट संबंधित आणखी एक धक्कादायक बातमी समोर.. संबंधित ट्रस्ट ची झोलझाल समोर आली आहे. करोडो रुपयाचा निधी शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून लाटल्याचे समोर.. बघुयात सविस्तर वृत्त सुनील इघे यांनी शिव प्रभात सेवाभावी ट्रस्ट च्या विरोधात उपोषण पुकारले आहे. तसे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्री, पालकमंत्री धर्मादाय आयुक्त यांना दिले आहे. सदर उपोषण हे 3 एप्रिल 2025 रोजी होणार आहे. याच निवेदनाची दखल घेत महसूल प्रशासनाने सदर अतिक्रमण केलेल्या जागेची पाहणी केली. जागेवर सदर ट्रस्ट ने मोठे अतिक्रमण केल्याचे महसूल पथकाला निदर्शनास आले आहे. आता महसूल विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे.  या ट्रस्ट चा आणखी एक बोगस कारभार उघड झाला आहे. मांडवे बुद्रुक गावातील गट नंबर 11मध्ये जागा हस्तानातरित नसताना देखील करोडो रुपयाचा निधी पर्यटन खात्याकडून आणला असल्याचे समोर आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे पत्र राजसत्ता न्यूज च्या हाती लागले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अधिकारी यांनी कुठलीही चौकशी न करता या जागेवर टेंडर काढले की खोटे द...
संगमनेर करहो सावधान..! संगमनेर मध्ये आली आहे लेडी डॉन... आधी हाय... मंग काय.... नंतर बाय... पण असे बाय नाही लाखो रुपयांना चुना लावून बाय... पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या या युट्युबर व तोतया पत्रकारावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  सुरुवात कशी होते बघा..हाय काय झाल्यावर सर चला ना चहा घेऊ.. मंग एका हॉटेल मध्ये चहा प्यायला न्यायचे.. नंतर गुपचूप फोटो काढून घ्यायचा... असे एकदा नव्हे तर किमान दोन तीन वेळेस करायचं... भाऊ आहात दादा आहात असे नात्यात गुरफाटायचे आणि नंतर रात्री अपरात्री फोन करायचा अडचणीत आहे आई आजारी आहे.. बाबा आजारी आहे... खूप टेंशन मध्ये आहे.. दहा हजाराची गरज आहे... आत्महत्या करावी वाटते... आशा गप्पा मारायचा... नंतर मी तुझ्या बायकोला हे असे फोटो दाखवेल.. तूझा माझा रात्री दीड दोनला फोन झाला..कश्यासाठी एवढ्या रात्रीला फोन केला.. आपले प्रेम आहे म्हणून ना... अशी सुरुवात होत असते... त्यामुळे दर्शकहो सावधान.. या महिलेने अद्याप पर्यंत सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक, शासकीय अधिकारी, पत्रकारिता क्षेत्रातील नामांकित लोकांना गंडा घातला आहे.  पाच लाख रुपयांची खंडण...
राहत्यात गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायाद्याचे सर्रास उल्लंघन  राहाता शहरात तसेच ग्रामीण भागातील एका गावात गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायाद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. राहाता शहरात नगर मनमाड हाय वे वर हे सेन्टर खुलेआम सुरु आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागाचा या सेंटर ला अर्थपूर्ण सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे आरोग्य विभाग या सोनोग्राफी सेंटर कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे समोर येतंय. आम्ही या सर्व सोनोग्राफी सेंटर सह गर्भपात करणाऱ्या हॉस्पिटल चे स्टिंग ऑपरेशन केले असता या डॉक्टर महोदयांचा काळा प्रताप समोर आला. त्याची सविस्तर माहिती अशी... घटना नंबर 1: शेवगाव येथील एका महिलेला डमी कस्टमर म्हणून आम्ही पाठवले... संबंधित महिलेला एजेंट च्या माध्यमातून राहाता येथील एका सोनोग्राफी सेंटर वर पाठवले. सदर महिलेने सोनोग्राफी सेंटरला छुप्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्व घटनाक्रम चेक केला. त्यानंतर डॉक्टर व त्याचा असिस्टंट यांनी मुलगी असल्याचे सांगितले. व त्यानंतर गर्भ खाली करायचा का अशी विचारना केली. परंतु महिला व तिचा पती यांनी हो असे उत्तर दिले असता राहाता येथील एका मोठ्या दवाखान्यात हा...

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

Image
आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाला समाविष्ट करून घ्यायच्या हालचाली आदिवासींचा तीव्र विरोध    बोटा प्रतिनिधी: सतिश फापाळे:   महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी,धनगर समाजाच्या आरक्षणाचा तीव्र प्रश्न निर्माण होतांना दिसून येत आहे. अशातच गुरूवार दि.२१ सप्टेंबर रोजी अतिथी गृहावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, संबंधित खात्यांचे मंत्री व राज्यातील धनगर समाजाचे लोकप्रतिनिधी यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाला समाविष्ट करून घ्यायच्या हालचाली सरकारच्या दिसत असल्याने महाराष्ट्रतील आदिवासी समाजाने या गोष्टीला तीव्र विरोध केला आहे. आदिवासींमध्ये धनगर समाजाचा समावेश करण्याचा प्रयत्न सरकारने केल्यास मोठ्या संख्येने आदिवासी समाज रस्त्यावर येईल असा इशारा अकोले तालुक्याचे मा. उपसभापती मारुती मेंगाळ यांनी त्यांचे प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.             अवघ्या महाराष्ट्रात सध्या आरक्षणावरून चांगलेच वातावरण पेटतांना दिसत आहे.मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी, धनगर या दोन्ही समाजाने आरक्षणसाठी आंद...

पावसा अभावी चार एकर सोयाबीन पिकावर शेतकऱ्यानं फिरवला नांगर.

Image
पाऊसा अभावी हतबल शेतकऱ्यांने सोयाबीन पिकावर फिरवला नांगर प्रतिनिधी_सतिश फापाळे        संगमनेर तालुक्यातील पठार भागात पावसाने पाठ फिरवली असल्याने खरीप हंगामातील विविध पिके कोमेजून गेली आहे.यात प्रामुख्याने काही सोयाबीन पिके करपली आहे.तर काही जळून गेली आहे.तर काही पिकांना शेंगाचं आल्या नाहीत.अशातच पदरी निराशा पडलेल्या नांदूर गावच्या युवा शेतकऱ्याने नाईलाजास्तव चार एकर सोयाबीन पिकावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगर फिरवत सोयाबीन पिक नष्ट केले आहे.      नांदूर_खंदरमाळ गावचे युवा शेतकरी सुरेश गोपीनाथ भागवत या शेतकऱ्याने जून महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसावर आपल्या शेतीची मशागत करून सोयाबीन पिकाची पेरणी केली होती.हे पीक सुरवातीच्या पावसावर डौलदार उतरून देखील आले होते.सोयाबीन पिकाला उभारी मिळाल्या नंतर त्यात मध्यंतरी दिलासादायक पाऊस झाला.त्यावर सोयाबीन पिकाची खुरपणी करून खते टाकली गेली. कीटक नाशकांची फवारणी केली.मोठ्या काबाड_कष्टाने पिकवलेले हे सोयाबीन पीक मोठ्या जोमात होते.      सोयाबीन पिक ऐन बहरात आले.फुलाची झडण झाली.थोड्या बहुत प्रमाणात...

संगमनेर तालुक्यातील पिंपळे गावात वृक्षारोपण

Image
सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून पिंपळे येथे हजारो वृक्षांचे वृक्षारोपण संगमनेर प्रतिनिधी   संगमनेर तालुक्यातील अतिशय दुर्गम आणि दुष्काळी भागातील पिंपळे येथे सामाजिक कार्यकर्ते श्री ज्ञानेश्वर झाडगे पाटील आणि रेखा कोटकर यांच्यामार्फत सुमारे एक हजार पेक्षा जास्त रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. गावातील प्रत्येक घर, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक शेत येथे किमान एक झाड लावले जावे या संकल्पनेतून हा उपक्रम त्यांनी आपल्या माळरानावर राबवला. माळरानावर निसर्ग सौंदर्य फुलविणाऱ्या या दोन कार्यकर्त्यांची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. अजूनही गरजेनुसार ते रोपांची वाटप पंचक्रोशीत करणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रगतशील शेतकरी व भाजपा कार्यकर्ते ज्ञानेश्वर जाडगे, सामाजिक कार्यकर्त्या रेखा कोटकर, कविता पाटील घुगे, भाजपा तालुका अध्यक्ष सतीश कानवडे, संतोष गुंजाळ, पत्रकार काशिनाथ घुले आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या मुहर्तावर दत्तवाडी येथील महिलांनी सौ रेखाताई कोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाशीची राणी महिला बचत गट सुरू केला...

भालचंद्र नेमाडे यांनी ओकलेली गरळ पण बोलवते धनी कोण

Image
भालचंद्र नेमाडे यांचे बेताल वक्तव्य म्हणजे गाढवाने कथन केलेली कथा  संपादक: सहदेव जाधव  दादर येथे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यक्रमात बोलताना भालचंद्र नेमाडे यांची जीभ घसरली. ही जीभ घसरली आणि अखंड हिंदुस्थान चा अवमान झाला. आता त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. औरंगजेब, पेशवे यांच्या संदर्भात नेमाडे यांनी ही वक्तव्य केली. औरंगजेबाला सर्वोच्च दर्जा देताना आपली 'साठी बुद्धी नाटी' झाल्याचे स्पष्टीकरण यावेळी नेमाडे यांनी देऊन टाकले. या माध्यमातून त्यांनी इतिहासाची पाने चुरगळून बीनअकलेचे तारे मोजले.         ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्यावरुन हा मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपाच्या सोशल मीडिया आणि कायदेशीर सल्लागार सेलचे प्रमुख आशुतोष दुबे यांनी सोमवारी भोईवाडा पोलीस ठाण्यात भालचंद्र नेमाडे याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शनिवारी दादर येथे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यक्रमात बोलताना भालचंद्र नेमाडे यानी केलेल्या काही वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.        आशुतोष दुबे यांनी भालचंद्...