Posts

जांभूळवाडी ग्रा.पं. निवडणूक: बुवाजी खेमनर व महादू कुदनर यांच्या नेत्रुत्वाची सरळ लढत

Image
जांभूळवाडी ग्रुप ग्रामपंचायत निवडणूकीत चुरस वाढली  संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील जांभूळवाडी  ग्रा.पं. ची निवडणूक मोठी प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपचे नेते बुवाजी पाटील खेमनर व काँग्रेसचे महादू पाटील कुदनर यांच्या नेतृत्वात दोन्ही पॅनल उभे आहेत. जांभूळवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत एकूण 20 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहे. ही निवडणूक नात्या गोत्यात अडकल्याने नेमका कोण बाजी मारेल याचा अंदाज सहज लागणार नाही.          एक जागेचा विषय वगळता जवळ जवळ एकास एक उमेदवार असल्याने मोठी काट्याची टक्कर बघायला मिळणार आहे. मागील निवडणुकीत बुवाजी खेमनर व महादू कुदनर यांच्यात सरळ लढत झाली होती. या लढतीने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले होते. त्या निवडणुकीत बुवाजी खेमनर यांनी एकाकी लढत दिली होती. आपले सर्व सहकारी महादू पाटील कुदनर यांच्या सोबत गेल्याने बुवाजी पाटील खेमनर एकाकी पडले होते. आणि त्यांचा त्या निवडणुकीत निसटता पराभव झाला होता. परंतु या निवडणुकीत मात्र सरपंच पद हे महिला आरक्षित असल्याने या निवडणुकीत या दोन्हीही मातब्बरांना नेत्रुत्व करणे हाच पर्याय योग्य ...

जाचकवाडीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न

Image
डॉ बिपिन महाले यांचे स्मरणार्थ भव्य आरोग्य तपासणी शिबिर. (प्रतिनिधी: सतिश फापाळे)      अकोले तालुक्यातील जाचकवाडी गावात स्वर्गीय डॉ बिपिन महाले यांचे स्मरणार्थ गुरुवार दि.८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.       जाचकवाडी गावातील डॉ बिपिन महाले यांचे समाजाप्रती विलक्षण आस्था होती.गोर गरीबांची सेवा करत त्यांनी समाजसेवा केली होती.डॉ बिपिन यांचे स्मरणार्थ आयोजित शिबिरात ब्लड प्रेशर,ब्लड शुगर लेव्हल तपासणी, ई.सी.जी,हृदय तपासणी, पल्स रेट तपासणी, ऑक्सिजन लेव्हल,वजन,उंची तपासणी करून उपचार देखील करण्यात येणार आहे.      हे शिबिर जाचकवाडी, बेलापूर ग्रामस्थ,श्रीराम हॉस्पिटल बेलापुर व मेडिकव्हर हॉस्पिटल संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले असून या शिबिरासाठी डॉ. सुशांत गीते, डॉ.अंतोष हांडे,डॉ सागर फापाळे सारखे नामवंत डॉक्टर या शिबिरात सेवा देणार आहे.

वीजप्रश्नी कायम स्वरुपी तोडगा काढा - बाळासाहेब मुरकुटे

Image
  शेतकऱ्यांच्या वीज प्रश्ना बाबतीत कायम स्वरुपी तोडगा काढावा: मा.आ.मुरकुटे         मुंबई (राजसत्ता वृत्तसंस्था)  मा.आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी 06/12/2022 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंञी देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंञी व उपमुख्यमंञी यांच्या लक्षात आणुन दिले की, आपले वीज कनेक्शन तोडु नये असे आदेश असताना देखील ,शेतकऱ्यांनी थकित वीज बील न भरल्यामुळे वीज तोडणी मोहीम वितरण कंपनीने हाती घेतली आहे.         याअनुषंगाने शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम तात्काळ थांबवावी , मागील वीजबील माफ करुन यापुढे नवीन वीज धोरणाचा अवलंब करावा, शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने १२ तास विद्युत पुरवठा मिळावा,सुधारीत दराने वीजबील आकारणी करावी, सोप्या पध्दतीने शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळावे, तसेच शेतकऱ्यांना वीजेसाठी सबसिडी देऊन वरील सर्व धोरणाची दि.१ जानेवारी २०२३ पासुन अमलबजावणी करावी याकरिता मा.आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले.* बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा संपादक: सहदेव जाधव...

गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे अपघातात जागीच ठार

Image
 संगमनेर तालुक्यात मोठी हळहळ: अंमळनेर येथील बीडीओ जागीच ठार संगमनेर (राजसत्ता न्युज): संगमनेर तालुक्यात काही दिवसांपूर्वी कार्यरत असलेले बिडिओ एकनाथ चौधरी हे सध्या यावल तालुक्यात कार्यरत होते. अमळनेर येथे झालेल्या भीषण अपघातात यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे ठार झाले आहेत. तर चालक जखमी झाला आहेत. चौधरी हे चालकासह नाशिक येथे शासकीय कामांसाठी चालले होते. यावल येथून निघाल्यानंतर बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले आहे. एकनाथ चौधरी हे एक कार्यक्षम अधिकारी आहेत. त्यांनी याआधी संगमनेर पंचायत समितीत अतिशय समाधान कारक काम केले. लोकप्रतिनिधी व प्रशासक यांच्यातील समतोल राखण्यासाठी त्यांचा हातखंडा होता. अशी माहिती पंचायत समितीचे सदस्य किरण मिंडे यांनी दिली. यावेळी त्यांनी दु:ख व्यक्त केले. तसेच एक सुसंस्कृत व कर्तव्यनिष्ठ अधिकारी गेल्याने प्रशासनाची मोठी हानी झाली आहे. असे उद्गार मिंडे यांनी काढले आहेत.  ‌‌‌‌.               किरण मिंडे(पंचायत समिती सदस्य, संगमनेर)    सविस्तर वृत्त अ...

साकूर ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी २०२२ कोण मिळवेल राजसत्ता

Image
ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी २०२२: साकुर ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस वाढली, 'अफवाना ऊत'  संगमनेर वृत्तसंस्था: तालुक्यातील ३७ ग्रामपंचायत च्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या सर्व गावांचे गाव पुढारी आता निवडणुकीला सज्ज झाले आहेत. जो तो आपल्या गावात आपलाच पॅनल कसा लागेल यासाठी जीवाचं रान करत आहे. साकुर ग्रामपंचायत मध्ये मात्र सत्ताधारी व विरोधक यांच्यात चढाओढ बघायला मिळत आहे. उद्या म्हणजे दिनांक २८/११/२०२२ रोजी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. यात कोण कोण अर्ज भरेल हे कळेल पण पूर्ण चित्र हे ७/११/२०२२ रोजी स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत मात्र फक्त मी उभा राहील, नाही राहणार...  याच चर्चा सुरु राहणार आहेत. काहीजण मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. तर काही जण मात्र उगाच आव आणत आकडून बसले आहेत. म्हणजे त्यांची अवस्था ही  'मी नाही त्यातली, आणि काडी लाव आतली'. अशी आहे.   वेळेला मात्र सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. जवळ जवळ दोन्ही पॅनलचे सीट तयार झाले असून पुन्हा एकदा साकुर ग्रामपंचायत ही काका पुतण्यातील लढाई समजली जाणार आहे.           साकुर ...

राजेंद्रजी गोंदकर यांचे मार्गदर्शनाखाली'धन्यवाद मोदीजी अभियान'अत्यंत कार्यक्षमतेने

Image
 भाजप उत्तर नगर जिल्हा 'धन्यवाद मोदीजी' अभियान राबविण्यात राज्यात वरच्या क्रमांकावर उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्रजी गोंदकर यांचे मार्गदर्शनाखाली'धन्यवाद मोदीजी अभियान'अत्यंत कार्यक्षमतेने राबवून महाराष्ट्र राज्यात पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये स्थान प्राप्त केले आहे. याबद्दल या अभियानाचे जिल्हा संयोजक श्री.राजेंद्र सांगळे, सह संयोजक अनिल भनगडे व अंकुश काळे यांचे सह भाजयुमो जिल्हा अध्यक्ष श्रीराज डेरे,तसेच नगर(उत्तर)जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात धन्यवाद मोदीजी अभियान जोरदारपणे राबविण्यात आले. उत्तर नगर जिल्हा भाजप कार्यकर्त्यांनी सुमारे 17125 पोस्टकार्ड लाभार्थ्यांच्या घरी जाऊन प्राप्त केले. मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी या अभियानाचे जिल्हा संयोजक श्री.राजेंद्र सांगळे व सहसंयोजक अनिल भनगडे यांच्यासह आनंद बुधेकर व राजेश शर्मा यांनी मुंबई येथे प्रदेश कार्यालयात जाऊन सतरा हजार...

नराधमाने हद पार केली मुलींनो सावधान

Image
श्रद्धा वालकर मर्डर प्रकरणावर अनेक जण आपलं मत मांडत आहे. अभिनेत्री केतकी चितळेनंतर अभिनेत्री आणि गायिकेनं तिचं मत मांडलं आहे.पाहा तिची पोस्ट   मुंबई, 16 नोव्हेंबर :   दिल्लीत झालेल्या   श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर देश चांगलाच हादरून गेला आहे. कामानिमित्त मुंबईला गेलेल्या श्रद्धाची बॉयफ्रेंड आफताबनं गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर नराधमानं श्रद्धाचे 35 तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले. दोघांमध्ये किरकोळ वाद झाले आणि त्या वादातून आफताबनं श्रद्धाची निर्घूण हत्या केली. आफताब पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्वसामान्य नागरिकांपासून सेलिब्रेटी देखील यावर आपलं मत मांडत आहे. काल अभिनेत्री केतकी चितळेनं याविषयी पोस्ट शेअर केली आहे. तर आज अभिनेत्री आणि गायिता केतकी माटेगावकर हिनं पोस्ट शेअर करत मुलींना प्रेमाचा सल्ला दिला आहे. सध्या केतकीची पोस्ट चर्चेत आहे. केतकीनं इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत दिल्ली हत्याप्रकरणावर भाष्य केलं आहे. केतकीनं म्हटलंय, 'एक सुंदर जग आपले आई वडिल आपल्याला देतात. सुख सोयींनी आणि उत्तम सुरक्षित असं. ...