Posts

राजसत्ता न्युज

दरोडा

पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथे गॅस गोडाऊनच्या घरपोडी गुन्ह्यात नऊ आरोपींची टोळी निष्पन्न  धाराशिव येथून एक आरोपीसह पाच लाख वीस हजार रुपये किमतीचे 130 गॅस टाकींस ताब्यात  स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची दमदार अशी कारवाई   पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील भारत गॅस कंपनीचं मोहटादेवी गॅस गोडाऊनचे अज्ञात आरोपींनी कुलूप तोडून भारत गॅस कंपनीच्या भरलेल्या गॅस टाक्या चोरून नेल्या होत्या याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 640/ 2025 बी एन एस कलम 305(अ) ३३१(4) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना देण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, व पोलीस अंमलदार दत्तात्रेय हिंगडे, बापूसाहेब फोलाने, सुरेश माळी, मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश लोंढे, संतोष लोंढे, गणेश धोत्रे, अरुण गांगुर्डे, फुरकान शेख, हृदय घोडके, सोमनाथ झांबरे, विजय ठोंबरे, किशोर शिरसाट, बाळासाहेब गुंजाळ, रोहित यमुल, रमीझराजा अत्तार...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना जाहीर, निवडणुका नवीन आरक्षण सोडतीनुसारच होणार

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना जाहीर, निवडणुका नवीन आरक्षण सोडतीनुसारच होणार अहिल्यानगर : अखेर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार, अहिल्यानगर जिल्हा परिषदेसाठी यंदा 75 गट आणि 150 पंचायत समिती गणांसाठी निवडणुका होणार आहेत. नवीन प्रभाग रचना तयार झाल्यानंतर नव्याने आरक्षण सोडत होऊन निवडणुका पार पडतील, अशी माहिती महसूल विभागातील सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ग्रामविकास विभागाने निवडणूक प्रक्रियेला गती दिली आहे. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी प्रभाग रचनेचे आदेश जारी केले आहेत. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आरक्षण सोडत त्यानुसार, 14 जुलै 2025 पर्यंत जिल्हाधिकारी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर करतील. यावर हरकती आणि सूचना मागवण्यासाठी 21 जुलैपर्यंत मुदत आहे. या हरकतींवर 28 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना अभिप्राय विभागीय आयुक्तांकडे सादर करायचे आहेत. 11 ऑगस्टपर्यंत हरकतींवर सुनावणी होऊन निर्णय घेतला जाईल, तर 18 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाक...

केदारनाथ

केदारनाथ मंदिर हे एक न सुटलेले कोडे आहे. केदारनाथ मंदिर कोणी बांधले याबद्दल बरेच काही सांगितले जाते. पांडवांपासून ते आदि शंकराचार्यांपर्यंत..!! केदारनाथ मंदिर कदाचित ८ व्या शतकात बांधले गेले असावे असे आजचे विज्ञान सुचवते. नाही म्हटलं तरी हे मंदिर किमान 1200 वर्षांपासून अस्तित्वात आहे..!! केदारनाथची भूमी २१व्या शतकातही अत्यंत प्रतिकूल आहे. एका बाजूला 22,000 फूट उंच केदारनाथ टेकडी, दुसऱ्या बाजूला 21,600 फूट उंच कराचकुंड आणि तिसऱ्या बाजूला 22,700 फूट उंच भरतकुंड आहे..!! मंदाकिनी, मधुगंगा, चिरागंगा, सरस्वती आणि स्वरंदरी या तीन पर्वतांमधून वाहणाऱ्या पाच नद्या आहेत. यातील काही या पुराणात लिहिलेले आहेत..!! हा परिसर "मंदाकिनी नदी" चे एकमेव जलसंग्रहण स्रोत आहे. हे मंदिर एक कलाकृती आहे. ज्या ठिकाणी हिवाळ्यात प्रचंड बर्फ पडतो आणि पावसाळ्यात पाणी खूप वेगाने वाहते अशा ठिकाणी या कलाकृतीसारखे मंदिर बांधणे किती अशक्यप्राय काम झाले असावे. आजही तुम्ही गाडीने त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही..!! मग अशा ठिकाणी हे मंदिर का बांधले? अशा प्रतिकूल परिस्थितीत 1200 वर्षांपूर्वी इतके अप्रतिम मंदिर कसे बांधले...

बायोडाटा कांचन

                   श्री गणेशाय नमः                         बायोडाटा             कु. कांचन भिमराज जाधव    जन्मतारीख: 08/12/2001   राशी:   कन्या   वार: मंगळवार जन्मवेळ: दुपारी 4:00 वाजता    जात: हिंदू न्हावी    कुलदैवत: कवठ्याची यमाई, जेजुरी चा खंडोबा    दैवक: सौंदड    रंग: निमगोरा    उंची: ५ फूट     शिक्षण:  Graduation - Bsc AERONAUTICS + AIRCRAFT MAINTENANCE ENGINEERING   Working - GMR AERO TECHNIC ( MRO) position - JUNIOR OFFICE PLANNING  वडिलांचे नाव: भिमराज भिकाजी जाधव (व्यवसाय सलून) आईचे नाव: ललिता भिमराज जाधव (गृहिणी)   भाऊ:  सुयोग भिमराज जाधव (विवाहित) बहिण: नाही चुलते :सहदेव भिकाजी जाधव (प्रसिद्धी प्रमुख, महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ) मुख्य संपादक: राजसत्ता न्यूज/तथा पत्रकार चुलते: अर्जुन भिमराज जाधव (सलून व...

कोलार घोटी रस्त्यावर अपघात

संगमनेर  तालुक्यातील कोकणगाव शिवारात कोल्हार-घोटी राज्यमार्गावर आज रविवारी (दि. 15) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. शिर्डीकडे जाणाऱ्या प्रवासी ट्रॅव्हल्स आणि आंबे घेऊन जाणाऱ्या ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे कोल्हार-घोटी राज्यमार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील कोल्हार घोटी महामार्गावरून ट्रॅव्हल एम. एच.46 सी. यु. 2754 प्रवाशांना घेऊन शिर्डी, शनिशिंगणापूर देवस्थानकडे जात असते. आज देखील गाडी संगमनेर वरून प्रवाशांना घेऊन सकाळी शिर्डीकडे जात होती. मोठ्या संख्येने यामध्ये प्रवाशी बसलेले होते. बहुतांश प्रवाशी हे देव दर्शनासाठी बाहेर गावांमधुन आले होते. सकाळी कोकणगाव मध्ये लोणीच्या दिशेने समोरून एम. एच....

शिव प्रभात ट्रस्ट चा भ्रष्टाचार उघड

सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांचे बहुचार्चित उपोषण काही दिवसांसाठी स्थगित... संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे यांच्या माहिती नुसार उद्या ट्रस्ट च्या पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस उपोषणाला बसू नये म्हणून दबाव टाकण्याचाही होतोय प्रयत्न.. साकूर वार्ताहर - संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक गावातील गट नंबर ११ या सरकारी जागेत शिव प्रभात सेवाभावी ट्रस्ट ने अनधिकृत अतिक्रमण करून शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करत शासनाच्या निधीचा गैरवापर केला आहे. त्यामुळे या ट्रस्टने शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करत सरकारी जागेत अनधिकृत अतिक्रमण केल्याप्रकरणी कारवाई करून ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह संबंधित स्थानिक प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा ३ एप्रिल २०२५ रोजी संगमनेर उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ता सुनिल इघे यांनी दिला होता.  दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सुनिल इघे यांच्या आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर तहसीलदारांनी थेट शिवप्रभात ट्रस्टच्या चौकशीचे आदेश काढले आहेत. तसेच शुक्रवार दि. ४ एप्रिल रोजी तहसील कार्यालयात चौकशी होणार आहे. त्यामुळे तहसी...

वारी विधानभवनाची, लोकशाही च्या मंदिराची

प्रस्ताविक : वाचकहो नमस्कार मी सहदेव ताराबाई भिकाजी जाधव .. माझा एक अनोखा आणि माझ्या जीवनातील विशेष महत्वाचा अनुभव आपल्यासमोर घेऊन आलो आहे. "वारी विधानभवनाची, तथा मी सेवक लोकशाहीचा " खरे तर हा अनुभव खुंप  रोमांचक  आहे. तेवढाच महत्वाचा आहे. मी प्रथमच पत्रकार म्हणून विधानभवनात आलो आणि या अधिवेशनाचे कामकाज  मी अतिशय अभ्यासपूर्ण हाताळले . विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या  अगोदरच शेवटचे अधिवेशन असल्याने हे अधिवेशन वादळी झाले यात काही शंका नाही. नगर जिल्ह्यातून मी एकटाच पत्रकार मी तेथे दिसलो.  प्रथमच मला पत्रकार म्हणून पावसाळी अधिवेशनास जाण्याची संधी मिळाली. हे पावसाळी अधिवेशन जून २०२४ रोजी होते. या अधिवेशवनात मी पूर्ण कालावधी साठी वृत्तांकन केले. खरे तर मी दै .प्रहारचे मुख्य संपादक सुकृत खांडेकर, मनीष राणे सर, नाशिक विभागाचे संपादक कडलग सर यांच्यामुळे मला हि संधी मिळाली. संधीचे सोने करायचे म्हणून मी पहिल्या दिवसापासून विधानभवनात हजर होतो. येथील प्रत्येक अनुभव मी शब्दांकित करण्याचे ठरवले. विधानभवनात पास काढण्यापासून ते शेवटच्या दिवसा पर्यंत मी हा अनुभव शब्दांकित केल...