वारी विधानभवनाची, लोकशाही च्या मंदिराची
प्रस्ताविक : वाचकहो नमस्कार मी सहदेव ताराबाई भिकाजी जाधव .. माझा एक अनोखा आणि माझ्या जीवनातील विशेष महत्वाचा अनुभव आपल्यासमोर घेऊन आलो आहे. "वारी विधानभवनाची, तथा मी सेवक लोकशाहीचा " खरे तर हा अनुभव खुंप रोमांचक आहे. तेवढाच महत्वाचा आहे. मी प्रथमच पत्रकार म्हणून विधानभवनात आलो आणि या अधिवेशनाचे कामकाज मी अतिशय अभ्यासपूर्ण हाताळले . विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच शेवटचे अधिवेशन असल्याने हे अधिवेशन वादळी झाले यात काही शंका नाही. नगर जिल्ह्यातून मी एकटाच पत्रकार मी तेथे दिसलो.
प्रथमच मला पत्रकार म्हणून पावसाळी अधिवेशनास जाण्याची संधी मिळाली. हे पावसाळी अधिवेशन जून २०२४ रोजी होते. या अधिवेशवनात मी पूर्ण कालावधी साठी वृत्तांकन केले. खरे तर मी दै .प्रहारचे मुख्य संपादक सुकृत खांडेकर, मनीष राणे सर, नाशिक विभागाचे संपादक कडलग सर यांच्यामुळे मला हि संधी मिळाली. संधीचे सोने करायचे म्हणून मी पहिल्या दिवसापासून विधानभवनात हजर होतो. येथील प्रत्येक अनुभव मी शब्दांकित करण्याचे ठरवले. विधानभवनात पास काढण्यापासून ते शेवटच्या दिवसा पर्यंत मी हा अनुभव शब्दांकित केला आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी तीन दिवस आधी मी दैनिक प्रहार च्या नाशिक कार्यालयाशी संपर्क साधला. नाशिक कार्यालयाचे संपादक कडलग सर यांनी मला अधिवेशनासाठी पत्र देण्याचे कबुल केले. अधिवेशनाच्या आधी मात्र त्यांनी मला हे पत्र मुंबईतील बांद्रा येथील कार्यालयातून घेण्यास सांगितले. दैनिक प्रहार चे मुख्य कार्यालयातून हे पत्र घेण्यास सांगितल्याने थोडे टेंशन आले. एकतर प्रथमच मुख्य कार्यालयाशी भेट देण्याचा यॊग आला होता. त्यातच पत्रकारिता क्षेत्रात ऋषीतुल्य असलेले आदरणीय सुकृत खांडेकर सर याना भेटण्याचा अमृत योग आला. मी जेव्हढा या कार्यालयाला भेटण्यास इच्छुक होतो तेव्हढेच ऑफिस मधील खांडेकर सर व मनीष राणे सर उत्सुख होते असे मला भासले. ऑफिस माहिती नसल्याने माझी त्रेधा त्रिपट उडाली, त्यातच मुंबईमधील पावसाने मला आणखीन परेशान केले. एकतर माझी या सर्व विभूतींना भेटण्याचा पहिलाच दिवस आणि त्यातच माझे या प्रवासात घरापासून ते बांद्रयापर्यंत झालेले अतोनात हाल. ऑफिस मध्ये मिळालेला अनुभव मात्र खूपच मजेशीर राहिला.
मी बांद्रयाच्या ऑफिसला पोहचलो लिफ्टने वर गेलो. लिफ्टमधून बाहेर पडताच रिसेपशन ला चौकशी करावी म्हणून तेथे गेलो. पावसाने थोडे भिजलोही होतो. स्वतःला सावरत रिसेपशन ला बसलेल्या व्यक्तीला मी विचारले सर मला खांडेकर सरांना किंवा मनीष सरांना भेटायचे आहे. परंतु पुढून त्यांनी विचारले खांडेकर सरांना भेटायचे की राणे सरांना. मी प्रतिउत्तरात जरा भांबावलो. पण लागलीच उत्तर दिले राणे सरांना.. तर ती व्यक्ती बोलू लागली काय काम आहे? मनात विचार आला याला काय करायचे आधीच उशीर झालाय आणि त्यात हा बाबा विचारतोय काय काम आहे? बर याना काम सांगावं तर हे महाशय म्हणतील येथे पत्रकार नाही का अधिवेशनासाठी. असे म्हणून खिल्ली उडवाया नको म्हणून प्रतिउत्तरात त्यांना म्हणालो माझे थोडे पर्सनल काम आहे त्यांना भेटायचं आहे. मनीष राणेंना ओळखता का तुम्ही ? असा मला पार्ट प्रतिप्रश्न आला आता मात्र मी नकारार्थी मन डोलावत नांतर हत्स्य मुद्रेने त्यांच्याकडे बघत म्हणालो सर आपण आहेत का मनीष सर.? मनीष सरानी होकारार्थी नजर माझ्यावर टाकली विलंबही न लावता त्यांच्या चारणाला स्पर्श करत नमस्कार घातला. मनीष सरानी लागलीच अरे तुला पत्र पाहिजे ना ? खांडेकर सर त्या कॅबिन मध्ये बसलेत त्यांच्याकडून घेऊन टाक. खांडेकर सरानी मला बघताच आलास का ? प्रवासात त्रासलेला दिसतोय ! बस आधी निवांत बस.. पाणी दिले. चहा कॉफी विचारली.. मी मात्र चहा पसंद केला.
साकूर ते विधान भवन व्हाया दैनिक प्रहार
सकाळी ६:४५ मिनिटांनी घरातून मुंबई कडे प्रस्थान ताहराबाद..म्हैसगाव..साकूर... कल्याण एसटी बस ने प्रवास सुरू...साकूर ते कल्याण १४५ रु तिकिट काढून प्रवासाला सुरुवात झाली एस टी महामंडळाच्या बसेस म्हणजे अगदी अलिशान प्रवास. अधिवेशनासाठी जायचे अधिवेशनातील प्रत्येक आमदारांचे व मंत्री महोदयांचे अधिवेशनातील कामकाज जनते पर्यंत मांडायचे आहे. अधिवेशनाची उत्सुकता तर नक्कीच लागून आहे. परंतु त्याहूनही अधिक उत्सुकता दै प्रहार च्या मुख्य कार्यालयाला भेट देण्याची लागून राहिली होती. दै प्रहार चे संपादक गुरुवर्य सुकृत खांडेकर यांनी अधिवेशनापूर्वी भेटीसाठी बोलावले होते. सहदेव जाधव ही व्यक्ती कोण आहे खास बघायचेय आहे. असा निरोप आमचे दै प्रहार चे उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे ब्युरो चीफ कुमार कडलग यांच्या कडे दिला होता. याच निरोपाने झोप उडाली होती. रात्री मनात विविध विचारांचे काहूर माजले गेले. अनेक प्रश्न पडायला लागली. कशासाठी बघायचं मला...कुणा आमदाराने तक्रार केली का
Comments
Post a Comment